सावित्रीबाईंवर  शेणाचे गोळे  फेकणाऱ्या प्रवृत्तीचा राहूल गांधींच्या कार्यक्रमाला  विरोध

Kanhaiya Kumar criticizes the BJP in Pune

जमीर काझी : मुंबई : मुलींच्या शिक्षणासाठी देशातील सर्वात पहिली शाळा ज्या पुण्यात सावित्रीबाई फुले यांनी सुरु केली त्याच पुण्यात सावित्रीच्या लेकींशी संवाद साधण्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी  २२ ऑगस्टला येत आहेत. राहुल गांधींचा भाजपाने एवढा धसका घेतला आहे की ते कार्यक्रमात आडकाठी आणत आहेत, हे तेच लोक आहेत ज्यांनी सावित्रीमाईंवर शेण व दगडगोटे फेकले. पण भाजपाने कितीही अडवणूक केली, अपप्रचार केला तरीही ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार, असा दावा काँग्रेस नेते कन्हैयाकुमार यांनी शुक्रवारी केला. (Kanhaiya Kumar criticizes the BJP in Pune) 

महागडे शिक्षण परवडणार कसे?

पुण्यात ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम शनिवारी होत असून राहुल गांधी विद्यार्थीनींशी संवाद साधणार आहेत, या पार्श्वभूमीवर पुण्यातील पत्रकार परिषदेत कन्हैयाकुमार बोलत होते. भाजपा सरकारच्या शैक्षणिक धोरणावर तोफ डागत ते  म्हणाले की, मनुवादी विचाराने देशातील शिक्षण व्यवस्था बरबाद केली आहे. देशात दर एक तासाला दोन जवान आत्महत्या करत आहेत, २५ शाळा बंद होत आहेत, अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडत आहेत. ‘ना पढे है, ना पढने देंगे’, असे यांचे धोरण असून यांचे पदवी प्रमाणपत्रही नकली आहे. भाजपा नेत्यांची मुले परदेशात जाऊन शिक्षण घेत आहेत म्हणून त्यांना फरक पडत नाही. आज शिक्षण महागडे झाले आहे, ते सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पदवीसाठी ३० लाख रुपये खर्च करावे लागत असतील आणि ८० कोटी जनता ५ किलो धान्यावर जगत असेल तर त्यांना हे महागडे शिक्षण कसे परवडणार? असा सवाल कन्हैयाकुमार यांनी केला. (Kanhaiya Kumar criticizes the BJP in Pune) 

महागडे शिक्षण घेऊनही नोकरीची शाश्वती नाही

खाजगी शाळांना आमचा विरोध नाही पण सरकारी शाळा बंद होता कामा नये. महागडे शिक्षण घेऊनही नोकरीची शाश्वस्ती नाही. परिक्षांचे पेपर फुटत आहेत, या सरकारला दहावीची परिक्षासुद्धा घेता नाहीत. सीबीएससी च्या परिक्षेतही घोटाळा झाला. शिक्षण आमचा अधिकार आहे.  तो विषेशाधिकार बनवला जात आहे, असे  सांगून कन्हैयाकुमार म्हणाले की,’ राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाचा भाजपाने धसका घेतला आहे. कोटापासून सुरु झालेला कार्यक्रम प्रत्येकवेळी अडवण्याचा, त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला पण हे सर्व कार्यक्रम यशस्वी झाले. (Kanhaiya Kumar criticizes the BJP in Pune) 

अमित शाहपुढे न झुकणारे राहूल गांधी फडणवीसांपुढे कसे झुकतील

पुण्यातही परवानगी देताना अनेक अटी घालण्यात आल्या आहेत.  पण अशा प्रयत्नाने कार्यक्रम थांबणार नाही तो मोठ्या प्रमाणात यशस्वी होणार यात शंका नाही. सोशल मीडियावर भाजपाने एक व्हिडिओ अपलोड करून ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाबद्दल अपप्रचार सुरु केला आहे .पण या कार्यक्रमाला पैसे देऊन कोणाला आणण्याची गरज नाही, ते स्वतः येत आहेत. कितीही अडथळा आणला तरी राहुल गांधी येणार आणि कार्यक्रमही होणारच. राहुल गांधी अमित शाह यांच्यासमोर झुकले नाहीत तर फडणवीस यांच्यासमोर कशाला झुकतील? असाही टोला त्यांनी लगावला. यावेळी  काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (Kanhaiya Kumar criticizes the BJP in Pune) 

Related posts

राहुल गांधी आले, पुण्यात आग लावून गेले

राहुल गांधींचे राजकारण नव्या दिशेने

राहुल गांधींनी राजकारणाचा सिलॅबस बदलला!