Rohit Harolikar : १७ मुलांना ओलिस ठेवणारा रोहित आर्य कोण होता?

Rohit Harolikar

सरकारने विश्वासघात केल्याची भावना निर्माण झाल्यावर रोहित आर्यने माथेफिरु कृत्य करताना १७ मुलांना ओलिस ठेवल्याने देशाची आर्थिक राजधानी मुंबईत खळबळ उडाली. तब्बल अडीच तास मुंबई पोलिसांनी रोहित आर्य ला बोलण्यात गुंतवून ठेवत ऑपरेशन राबवले. बाथरुमच्या खिडक्यांचे ग्रील कापून पोलिसांनी पवईतील आरए रेकॉर्ड स्टुडियोमध्ये प्रवेश केला आणि राहूल आर्यवर गोळी झाडून शेवट केला. या ऑपरेशननंतर १७ मुले, एक आजी आणि एका स्टुडिओ कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका झाली. इतका टोकाचा निर्णय घेणारा राहूल आर्य कोण होता. त्याने हे कृत्य का केले? सरकारमधील मंत्री आणि अधिकाऱ्यांनी त्याचा कसा छळ केला याची माहिती पुढे येऊ लागली आहे.

सतीश घाटगे

रोहित मुळचा पुण्याचा असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचे नाव रोहित हरोळीकर. सिम्बोयोसिस आणि आयएसबी मुंबई मध्ये त्याचे शिक्षण झाले होते. रोहीत एक सामाजिक संस्था चालवत होता. २०१३ पासून शैक्षणिक क्षेत्रात नवीन उपक्रम राबवत होता.  तसेच तो सामाजिक विषयावर फिल्मही करायचा. त्याने दिपावली दिवशी आरक्षणावर चित्रपट बनवला होता. त्यासाठी त्याने उच्चवर्णीय आडनाव सोडले असावे असा मानले जाते. २०१३ मध्ये रोहित आर्यने लेटस चेंज  अभियानातून हा प्रकल्प राबवला होता. त्यांची संकल्पना तत्कालिन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनाही भावली होती. त्यांनी या अभियानाचे कौतुकही केले होते. २०२२ मध्ये दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना हेच अभियान महाराष्ट्रात राबवण्यात आले. (Rohit Harolikar)

अशा या रोहित आर्यने तीन वर्षापूर्वी स्वच्छता मॉनिटर कार्यक्रम सुरू केला होता. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाअंतर्गत पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्प राबवला होता. शाळकरी मुलांना स्वच्छता दूत करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवले होते.  नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून स्वच्छता चळवळ असा हा उपक्रम होता. या योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छ भारत मोहिमेचे सैनिक म्हणून काम करायचे होते. कचरा टाकणाऱ्या लोकांना पकडायचे होते. सोशल मिडियावर अशा घटनांची माहिती जमा करायची. त्यासाठी शाळांसाठी गुण मिळणार होते. जी शाळा चांगले काम करत त्यांना बक्षिस देण्यात येत होते. राहूल आर्य यांच्या संकल्पनेतून झालेला या उपक्रमात शेकडो शाळां सहभागी झाल्या. पण प्रत्यक्षात निकाल लागला तेव्हा राहूल आर्य याला निकालात तफावत दिसून आली.

राहूल आर्यने तयार केलेली विजेत्यांची यादी आणि शिक्षण विभागाने तयार केलेली यादी जुळत नव्हती. राहूलने एका मुलाखतीत असे सांगितले होते की शून्य किंवा एक गुण मिळालेल्या शाळांना पुरस्कार दिले होते. या शाळांचे संबध उच्चपदस्थांशी संबध होते. मला विश्वास बसत नव्हता.

जेव्हा राहूल आर्यने निकालावर आक्षेप घेतला तेव्हा शिक्षण विभागाने त्याला त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांचे पेमेंट रोखण्यात आल्याचा आरोपही त्याने केला. पण त्यानंतर त्याला सांगण्यात आले की नवीन शैक्षणिक वर्षात त्याचा स्वच्छता मॉनिटर हा कार्यक्रम राबवण्यात येईल. आणि त्याची संस्था हा उपक्रम राबवण्यासाठी महत्वाची संस्था असेल.

राहूल आर्य याने एप्रिलमध्ये शासनाकडे नवीन प्रस्ताव केला. पण जूनपर्यंत कसलीच हलचाल न झाल्याने हताश झालेल्या राहूलआयने स्वच्छता मॉनिटर हा उपक्रम खासगी पद्धतीने राबवण्याचा निर्णय घेतला. शाळांना कामकाजाचा खर्च भागवण्यासाठी प्रत्येकी ५०० रुपये देण्यास सांगितले. कोणताही उपक्रम राबवण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. जर सरकार मला पाठींबा देत नसेल तर मला दुसरा मार्ग शोधावे लागला असे त्यांने एका मुलाखतीत सांगितले. त्यांच्या या कृतीवर शासकीय अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. यातून नफा कमावण्याचा त्याचावर आरोप केला. असा उपक्रम तुम्ही वैयक्तिक उपक्रम कसे सुरू करु शकता असा प्रश्न विचारला. त्यावर आर्य यांनी त्यांच्या वेबसाईटवर स्पष्ट केले जर राज्य सरकारने या मोहिमेत पुन्हा सहभागी होण्यासाठी मला निवडले तर शाळांचे शुल्क परत करतील. परंतु राज्याने समांतर स्वच्छता मोहिम सुरू केली. या योजनेला पाच कोटी रुपये वाटले गेले. माझ्या कल्पनेवर आधारित असलेली हा उपक्रम माझ्याकडून काढून घेतले. माझी कल्पना, माझे प्रयत्न, माझे काम, एका रात्रीत गेले अशी भावना त्याने एका मुलाखतीत व्यक्त केली. (Rohit Harolikar)

रोहित आर्य आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यातील संबंध त्यांच्या प्रकल्पाच्या शुभारंभानंतर लगेचच बिघडले.२०२४ मध्ये त्यांनी लिहिलेल्या पत्रांवरून असे दिसून येते की त्यांनी अधिकाऱ्यांवर त्यांना बाजूला सारण्याचा, निधी रोखण्याचा आणि पोचपावती किंवा पैसे न देता त्यांच्या संकल्पनेचा गैरफायदा घेण्याचा आरोप केला होता.ऑगस्ट २०२४ मध्ये पुण्यातील एका पत्रकार संघटनेला लिहिलेल्या एका पत्रात, आर्य यांनी दावा केला की त्यांचा सक्रिय सहभाग आणि त्यांच्या कामाची अधिकृत मान्यता असूनही, सरकारने वचन दिलेला निधी जारी करण्यात अपयशी ठरले.सुरुवातीचा खर्च स्वतः करावा लागला, असे त्याने सांगितले.”शालेय शिक्षण विभाग माझ्यावर आणि माझ्या पीएलसी स्वच्छता निरीक्षकावर अन्याय करत आहे. यासाठी मी २४ जुलैपासून उपोषणाला बसलो होतो. ३ ऑगस्टच्या रात्री मंत्री दीपक केसरकर घरी आले आणि त्यांनी माझ्या मागण्या रास्त असल्याचे आणि ५ ऑगस्टपर्यंत हे प्रकरण सोडवण्याचे आश्वासन दिले. मी त्यांचा आदर केला आणि माझे उपोषण संपवले,” असे त्यांनी लिहिले.आर्य यांच्या मते, माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी आरोप केला की आयुक्त सूरज मांढरे, समीर सावंत आणि तुषार महाजन – वरिष्ठ विभाग अधिकारी त्यांच्या कामात अडथळा आणत राहिले आणि निधी वितरित करण्यास विलंब करत राहिले. (Rohit Harolikar)

त्यांचे पेमेंट मिळत नसल्याने  त्याने उपोषण सुरू केले. ४५ दिवस अन्नाशिवाय राहिल्याचा दावा त्याने केला. नंतर त्याने पाणी पिणेही बंद केले. राज्य शासन आपले ६० लाख रुपये देणे आहे असा त्याचा दावा होता. त्यानंतर माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हस्तक्षेप केला. त्यांनी त्याला सात लाख आणि ८ लाख २६ लाख रुपयांचे दोन धनादेश दिले. केसरकरांनी त्याच्या उपक्रमाला वैयक्तिक पाठिंबा दिला. पण शासन दोन कोटी रुपये देणे आहे हा त्याचा दावा निराधार होता असे केसरकरांनी सांगितले.

शालेय शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या मुंबई मिररला सांगितले की, “सरकार आणि रोहित आर्य यांच्यात कधीही कोणताही वर्क ऑर्डर किंवा पेमेंट करार झाला नव्हता. उपलब्ध परिपत्रके आणि जीआरमध्ये फक्त प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी त्यांची मदत मागण्याचा उल्लेख आहे, कारण त्यांनी शाळांमधील स्वच्छतेशी संबंधित ‘लेट्स चेंज’ या प्रकल्पात सरकारला मदत करण्यासाठी स्वेच्छेने प्रस्ताव सादर केला होता – जो मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा २०२३ मोहिमेचा फक्त एक घटक आहे. हा प्रकल्प अजूनही सुरू आहे. आर्य संपूर्ण उपक्रमाची जबाबदारी घेऊ इच्छित होते, परंतु या संदर्भात कधीही निविदा प्रक्रिया किंवा औपचारिक वर्क ऑर्डर जारी करण्यात आली नाही.

अखेर हताश झालेल्या रोहितेने १२ ते १५ वयोगटातील मुलांना ओलीस ठेवण्याचा निर्णय घेतला.  संघर्षादरम्यान रिलीज झालेल्या व्हिडिओमध्ये आर्यचा सुरवातीला सूर संयमी होता.”आत्महत्या करण्याऐवजी, मी एक योजना आखली आहे आणि काही मुलांना ओलीस ठेवले आहे,” तो म्हणाला. “माझ्या अगदी साध्या मागण्या आहेत – नैतिक आणि नैतिक मागण्या. मला काही लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. जर त्यांनी उत्तर दिले तर मी उलट प्रश्न विचारेन. मी दहशतवादी नाही. माझ्याकडे पैशाची मागणी नाही. मी अनैतिक नाही.”तो जिवंत राहिला किंवा नाही तरी त्याचा नवीन कार्यक्रम – चला बदलूया – चालूच राहील असा त्याने आग्रह धरला. “जर मी जिवंत असेन तर मी ते करेन,” तो म्हणाला. “जर मी मेलो तर दुसरे कोणीतरी ते करेल. पण ते घडेल.” मग, त्याचे शब्द गडद झाले. “जर कोणी हस्तक्षेप केला तर,” त्याने इशारा दिला, “या मुलांसोबत असेच घडेल जर त्यांना इजा झाली नाही. तुमच्याकडून थोडीशीही चूक झाली तर मी या जागेला आग लावेन आणि त्यातच मरेन.”

या घटनेची माहिती कळता  पोलिसांनी तात्काळ त्याच्याविरोधात ऑपरेशन राबवले. त्याच्यावर पोलिसांनी गोळी झाडल्यावर त्याला हॉस्पटलमध्ये नेण्यात आले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी स्टुडिओमधून एक एअर गन, एक लायटर, आणि एक ज्वलनशील रबर सोल्युशन सापडले.

ऑपरेशनची माहीती देताना पोलिस म्हणाले की आर्यने प्रथम एअर गनमधून गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसरंक्षणार्थ प्रत्युत्तर देताना फायरिंग केले. एक गोळी त्याच्या छातीत लागली. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. तिथेच त्याचा मृत्यू झाला. यावेळी झालेल्या झटापटीत ७५ वर्षीय बंधक मंगल पाटणकर यांच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच हातावर खोल जखम झाली. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

राहूल आर्यच्या कृत्यावर मानसशास्त्रज्ञ अशा व्यक्तींना “गोंधळलेले” म्हणतात – जे त्यांच्या कामात जास्त गुंतून जातात आणि ते त्यांच्या आयुष्यात आणि आवडीत बदलतात.

माजी शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले, “रोहित आर्य यांचा स्वच्छता मॉनिटर ही सरकारच्या माझी शाळा सुंदर शाळा योजनेअंतर्गत एक संकल्पना होती. शालेय शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमांतर्गत त्यांनी काही शाळांशी संपर्क साधला होता आणि त्यांच्याकडून पैसे गोळा केले होते. जर बिले किंवा देयकांबाबत काही समस्या असतील तर त्यांनी संबंधित विभागासमोर मांडायला हवे होते आणि योग्य माध्यमातून ते सोडवायला हवे होते. सरकारच्या सर्व कामांसाठी एक निश्चित प्रक्रिया आहे आणि ती त्या प्रक्रियेनुसार काटेकोरपणे काम करते. आता जे घडले आहे (ओलीस ठेवण्याची घटना) ते चुकीचे आहे.”

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर