मुंबई : प्रतिनिधी : भारतीय जनता पक्ष हा मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारा पक्ष आहे. भाजपला दुखवटा, दु:ख याच्याशी काहीही संबध नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील घडामोडीना वेग आला आहे. सुनेत्रा पवार राज्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या घडामोडी राऊत यांनी भाजपवर टीका केली. (MP Raut criticizes BJP)
खासदार राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, राष्ट्रवादी हा अजितदादांचा स्वतंत्र गट आहे, तो त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे, हे शरद पवार बोलतात ते योग्य आहे. पण अजित पवारांच्या निधनानंतर छगन भुजबळ, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यासमवेत चर्चा केली. जोपर्यंत अजित पवारांचा दुखवटा संपणार नाही तोपर्यंत आम्ही या विषयावर राजकीय भाष्य करणार नाही. बोलण्यासारखे भरपूर आहे पण आम्ही बोलणार नाही. मात्र भाजप हा मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारा पक्ष आहे. भाजपला दुखवटा दु:ख याच्याशी काहीही संबध नाही अशी टीका केली. (MP Raut criticizes BJP)
अजित पवार गेल्याचे दुःख घराघरात आहे. आमच्या घरात देखील दुःख आहे. अजित पवार घरा-घरातला चेहरा होता. हे राजकारण कौटुंबिक आहे. त्याचा पक्ष निर्णय घेईल. फारफार तर अमित शाह निर्णय घेतील”, असेही संजय राऊत म्हणाले. (MP Raut criticizes BJP)