‘लेम डक प्रेसिडेंट’सारखी मोदींची अवस्था ; राज ठाकरे यांचा हल्लाबोल 

Modi's status as 'lame duck president'

जमीर काझी : मुंबई : लेम डक’ प्रेसिडेंट.  हा शब्दप्रयोग इंग्रजीमध्ये  केला जातो. त्याचा  अर्थ ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरु असतो ते  निवांत असतात, जगभर दौरे करतात, आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची अवस्था तशी  झाली आहे, असा कडाडून हल्लाबोल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी केला. (Modi’s status as ‘lame duck president’)

मानसिक रुग्ण झालेल्या सरकारला रुग्णालयात भरती करण्याची गरज

दिल्लीतील जंतर मंतर आंदोलन मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याचा  तीव्र निषेध करीत राज ठाकरे यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करीत मोदी व केंद्र सरकारवर कडाडून हल्ला त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,’ केंद्र सरकारने  १८ जुलैला सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात ज्या पद्धतीने फरफटत नेले. त्यावरून सरकारला वांगचुक यांची काळजी नव्हती हे नक्की. त्यानंतर काल आंदोलकांवर केलेला बेफाम लाठीचार्ज  पाहून हे सरकारच मानसिक रुग्ण झाले आहे आणि त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे असे दिसते. मोदी यांना आजूबाजूच्या इतर राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्याच भाषा येत नसताना फक्त कॅमेऱ्यासाठी गडगडाटी हास्य करून जगभरातील राष्ट्राध्यक्षांना ते सांगण्याची हौस सध्या  जडली आहे , असा टोला लगावला. (Modi’s status as ‘lame duck president’)

विद्यार्थ्यांना कोण विचारते?

राज ठाकरे यांनी असे म्हटले आहे की, मुळात धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले की ज्यांचा राजीनामा घेणं हे सरकारला स्वतःच अपयश वाटत आहे ? मणिपूर पेटलेलं असताना त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना बिरेन सिंग यांना पण याच सरकारने  अभय दिले  त्यांच्याबद्दल वरच्या दोन सत्ताधीशांना शून्य प्रेम आहे. आम्ही काय करायचं हे कोणी सांगायचं नाही, मग ते विरोधी पक्षांनी पण नाही आणि जनतेने तर नाहीच नाही. कारण तुमच्या मतांवर आम्ही थोडी निवडून येतो. आम्ही निवडून येतो ते सगळ्या यंत्रणा, मतदार याद्यातील गोंधळ आणि अर्थात ईव्हीएमच्या जोरावर. मग विद्यार्थ्यांना कोण विचारते ?

उत्तरधिकारी सगळा कारभार हाकत असतो

काल पंतप्रधान हा मुद्दा सोडून सगळं बोलले.इंग्रजीत एक शब्दप्रयोग आहे, ‘लेम डक’ प्रेसिडेंट. म्हणजे ज्या पंतप्रधानांचा किंवा राष्ट्राध्यक्षांचा शेवटचा कार्यकाळ सुरु असतो ते पंतप्रधान हे निवांत असतात, जगभर दौरे करतात, आणि त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो आणि त्यांचा उत्तराधिकारीच सगळा कारभार हाकत असतो. सध्या मोदींची अवस्था अशी झाली आहे असं दिसतंय. मोदींच्या मनात या सगळ्याबद्दल समजा कृती करण्याची इच्छा जरी असली तरी उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत असलेली शक्ती त्यांना दुर्लक्ष करायला भाग पाडत असावी. अर्थात मोदी पंतप्रधान असताना विद्यार्थ्यांचं आंदोलन निर्दयीपणे चिरडलं गेलं हे इतिहास लक्षात ठेवेलच ! तशीच प्रतिमा व्हावी अशी कोणाची इच्छा असेल आणि मोदी त्याला बळी पडणार असतील तर मग प्रश्नच संपला.

पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करावी

राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती आहे. ती ‘परीक्षा पे चर्चा’ इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करा. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. धर्मेंद्र प्रधान आणि सरकारचा इगो यापेक्षा या देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्वाचा आहे.  हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांचे, एका परीक्षेपुरतं नाही आहे. लोकांच्या मनात सरकारच्या कारभाराबद्दल राग आहे, ज्या पद्धतीने एकाच उद्योगपतीला मोठं केलं जात आहे, त्याच्या घशात संपूर्ण देश घातला जात आहे, ज्या पद्धतीने महागाईने कळस गाठला आहे, जंगल तोडून कंत्राटदारांच भलं केलं जात आहे , शहरच्या शहर विकासाच्या नावाखाली गुदमरली आहेत, रुग्णालय खच्चून भरली आहेत , अशा अनेक गोष्टींच्या  विरोधातील हा आक्रोश आहे. गृहखात्याच्या आदेशावरून आंदोलकांना जसं निर्दयीपणे मारलं जात आहे आणि तरीही आंदोलक मुलं-मुली इंचभर हलत नाही आहेत यावरून एक नक्की की हे धैर्य एका मुद्द्यावरच्या रागातून नाही तर देशातील एकूणच परिस्थितीतून आलेल्या नैराश्यातून आहे. त्यामुळे सरकारने निर्दयीपणा सोडून समजूतदारपणा दाखवावा. 

आज सर्वांच्या दारावर टकटक सुरू झाली आहे

लोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून मिळवलेली सत्ता विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून जायला लागणार हे निश्चित . २०१८/१९ पासून मी जनतेला सांगत होतो की मी काय या सरकार बद्दल बोलतोय हे तुम्हाला आज नाही कळणार पण ज्या दिवशी तुमच्या दरवाजावर अन्यायाची टकटक होईल तेव्हा मी काय सांगत होतो हे समजेल ! आज सर्वांच्याच दरवाजावर टकटक सुरू झाली आहे ! 

या सगळ्यात विद्यार्थ्यांनी जो संघर्ष उभा केला आहे त्याचं मनापासून कौतुक. शेजारच्या श्रीलंकेत २०२२ ला विद्यार्थ्यांनी असंच आंदोलन उभं केलं होतं. २०११ चं अरब स्प्रिंग, नेपाळ मध्ये देखील तेच. ही सगळी अगदी ताजी उदाहरण आहेत. जय प्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचं आंदोलन उभं केलं त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता. आज आपल्या देशातील विद्यार्थ्यांच्या या धैर्याला पण सलाम.,मनसेने या मागण्यांना पाठींबा आधीपासून होता आणि यापुढे राहील. असे त्यांनी म्हटले आहे. (Modi’s status as ‘lame duck president’)

Related posts

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी १२.७६ हेक्टर जागा सुपूर्द

पोलिसांनी राहूल गांधी, प्रियांका, अखिलेश यांना घेतले ताब्यात

पंतप्रधान निवास्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन ; राहूल, प्रियांकांचा ठिय्या