Five jets shot down : भारत पाकिस्तान युद्धात पाच जेट विमाने पाडली

Five jets shot down

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. त्यानंतर भारत पाकिस्तान तीव्र संघर्ष झाला. या युद्धाच्या संदर्भाने पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धात पाच जेट विमाने पाडण्यात आली असा दावा केला आहे. दोन अणवस्त्रधारी राष्ट्रे एकमेकांवर हल्ला करत असताना व्यापारी चर्चेद्वारे तणाव कमी करण्यात आला असे ट्रम्प म्हणाले. (Five jets shot down)

व्हाईट हाऊसमध्ये रिपब्लिकन खासदारासोबत एका खासगी डिनर कार्यक्रमात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आम्ही बरीच युद्धे थांबवली. या युद्धांनी गंभीर स्वरुप् घेतले होते. भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युद्ध चालू होते. दोन्ही देश अणवस्त्रधारी आहेत. ते एकमेकांवर हल्ले करत होते. विमानातून हवेत गोळीबार होता होता. या युद्धात चार ते पाच नव्हे तर मला वाटते प्रत्यक्षात पाच जेट विमाने पाडण्यात आली. असेही ट्रम्प म्हणाले.

युद्ध उग्र रुप धारण करण्यापूर्वी आणि दोन्ही देशात तणाव कमी करण्यासाठी व्यापारी वाटाघाटीचा दावा केला. ते म्हणाले, भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरोधात वाद घालत होते. हे वाद दिवसेदिवस वाढत होते. आणि हे वाद आम्ही व्यापाराद्वारे सोडवले. आम्ही म्हणालो, तुम्हाला व्यापार करायचा आहे, असे ट्रम्प म्हणाले. जर तुम्ही शस्त्रे आणि कदाचित अणवस्त्रांचा वापर करणार असाला तर आम्ही व्यापार करार करणार नाही. (Five jets shot down)

इराणचा अणुकार्यक्रमही उद्धवस्त केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. इराणची अणु क्षमता पूर्णपणे नष्ट केली असेही ट्रम्प म्हणाले.

दरम्यान ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धात पाच जेट विमाने पाडली असा दावा केल्याने सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून हा प्रश्न उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तान युद्ध आपण थांबवले असा अनेकवेळा दावा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. संसदेत स्वत: पंतप्रधान उत्तर देतात की अन्य केंद्रीय मंत्री उत्तर देतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे. (Five jets shot down)


Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर