अंकली पुलावरून कार कोसळली; पती-पत्नी सह तिघांचा मृत्यू

सांगली : अंकली येथील कृष्णा नदीवरील जुन्या पुलावरून कार कोसळून पती-पत्नी सह तिघांचा मृत्यू झाला. तर तीन प्रवाली जखमी झाले. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. अपघातातील मृत आणि जखमी सांगलीचे आहेत. याबाबत जयसिंगपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. (Sangli)

प्रसाद भालचंद्र खेडेकर (वय ३५), प्रेरणा प्रसाद खेडेकर (वय ३६ दोघे रा. गावभाग, सांगली), वैष्णवी संतोष नार्वेकर (वय २१ रा. आकाशवाणी केंद्रजवळ, सांगली) अशी मृत्यू व्यक्तींची नावे आहेत. कोल्हापूरातून लग्न सोहळा आटपून हे कुटुंबीय सांगलीकडे येत होते. अंकली पुलावर आल्यावर गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी पुलावरून सुमारे ३५ फूट खाली कोसळली. यात तिघांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले.

समरजीत प्रसाद खेडेकर (वय ७), वरद संतोष नार्वेकर (वय १९), साक्षी संतोष नार्वेकर वय (४२, सर्व रा. सांगली) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी स्थानिक नागरिक व जयसिंगपूर पोलीसांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना सांगलीच्या सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

Related posts

बेळगावच्या कित्तूरमध्ये पावसाने दाणादाण

समाजवादी शवपेटीवर गडहिंग्लजला शेवटचा खिळा

मंत्र्यांना शेतकरी आत्महत्याचे काहीच सोयर सुतक नाही :  डॉ.श्रीपाल सबनीस, दमसा साहित्य संमेलनाचे उद्घाटन