चार राज्यांना चक्रीवादळाचा धोका

चेन्नई : बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या फेंगल वादळाचे आज चक्रीवादळात रूपांतर झाले आहे. येत्या दोन दिवसांत ते तमिळनाडूकडे सरकणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, या काळात ७५-८० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. चेन्नई, चेंगलपेट, कांचीपुरम, तिरुवल्लूर, कुड्डालोर, नागापट्टिनम येथे संततधार पाऊस सुरू आहे. या सहा जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी वादळाच्या प्रभावाबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. तिरुवरूर, मायिलादुथुराई, नागापट्टिनम आणि कुड्डालोर जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रतिसाद दलाच्या सात तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

दिल्ली पोलिसांचे क्रौर्य चिंताजनक

धक्का धर्मेंद्र प्रधानांना, जखम मोदींना