नवी दिल्ली : दिवा-मुंब्रादरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वे बोर्डाने सोमवारी (९ जून) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे डब्यातून पडून प्रवाश्यांचा मृत्यू होणार नाही किंवा ते जखमी होणार नाहीत. या निर्णयाच्या घोषणेचे निवेदनही रेल्वे बोर्डाने जाहीर केले आहे. (Railway’s decision)
रेल्वे बोर्डाच्या या निर्णयानुसार, मुंबईच्या उपनगरीय नेटवर्कसाठी तयार होणाऱ्या सर्व नवीन रॅकमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद करण्याची यंत्रणा असेल जेणेकरून प्रवासी चालत्या गाड्यांतून पडणार नाहीत. याशिवाय प्रवासीही दरवाजाबाहेर लटकून प्रवास करणार नाहीत.
ठाणे जिल्ह्यातील दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान सोमवारी झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला. सोमवारी गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनमधून पडून किमान पाच प्रवासी मृत्युमुखी पडले आणि अनेक जण जखमी झाले आहेत. (Railway’s decision)
मुंबईच्या गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनप्रवासादरम्यान सुरक्षा सुधारणे आणि उघड्या दरवाज्यांमुळे होणारे अपघात रोखणे हे या निर्णयाचे उद्दिष्ट आहे.
मुंबई उपनगरीय नेटवर्कवर सध्या सेवेत असलेल्या सर्व रॅकची पुनर्रचना केली जाईल, असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे. (Railway’s decision) ‘‘सध्या सेवेत असलेल्या सर्व रॅकची पुनर्रचना केली जाईल आणि मुंबई उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या रॅकमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद करण्याची सुविधा प्रदान केली जाईल,’’ असे बोर्डाने पुढे म्हटले आहे.
हेही वाचा :
रेल्वेतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू
कॉन्ट्रॅक्ट किलर्सना सुपारी देऊन नवविवाहितेनेच केला पतीचा खून