नवी दिल्ली : जिथे जिथे एसआयआर आहे, तिथे मतांची चोरी सुरू आहे. गुजरातमध्ये एसआयआरच्या नावाखाली जे काही केले जात आहे ती कोणत्याही प्रकारची प्रशासकीय प्रक्रिया नाही, तर ती एक सुनियोजित, संघटित आणि धोरणात्मक मत चोरी आहे, असा हल्लाबोल राहूल गांधीनी निवडणूक आयोगावर केला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी शनिवारी भाजप आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर हल्ला चढवला आहे. मतदार यादीतील विशेष सघन सुधारणा (एसआयआर) हे मतदारांचा मतदान हरण करण्यासाठी शस्त्र बनवले आहे असा आरोप केला आहे. निवडणूक आयोग लोकशाहीचा रक्षक नसून मतदान चोरीच्या कटात मुख्य भागीदार आहे. असा आरोप केला आहे. एसआयआर ‘एक व्यक्ती, एक मत’ या तत्वांचे उल्लंघन करत असून सत्तेत कोण राहते हे मतदारांऐवजी भाजपा ठरवण्याची परवानगी देते असा आरोप केला आहे. ‘एक व्यक्ती, एक मत’ हा अधिकार नष्ट करण्यासाठी एसआयआर हे एक शस्त्र बनवले आहे, असा आरोप केला आहे.
काँग्रेसला पाठिंबा देणारे मतदार गायब
काँग्रेसला पाठिंबा देणारे विशिष्ट समुदाय आणि बुथमधून निवडणूक मते काढून टाकण्यात आली आहेत. जिथे भाजपला पराभव दिसते तिथे मतदारांना व्यवस्थेतून गायब केले जात आहे. असेही ते म्हणाला. अलंडमध्ये हाच प्रकार दिसून आला. राजुरामध्येही असाच प्रकार घडला. आणि आता गुजरात, राजस्थान आणि ज्या ज्या राज्यात एसआयआर लागू करण्यात आला आहे या प्रत्येक राज्यात हाच आराखडा लागू केला जात आहे. गुजरात काँगेरसनेही राज्यात एसआयआर प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचा आरोप केल्यानंतर राहूल गांधीचे वक्तव्य आहे आहे. (Wherever there is SIR, there is vote rigging)
गुजरातमध्ये मतचोरीचा खेळ उघडकीस
गुजरात काँग्रेस पक्षाने एक्स वरील एका पोस्टमध्ये, असा दावा केला आहे की, “निवडणुकीत हेराफेरी म्हणजे तुमच्या मतदानाच्या अधिकाराची चोरी आहे आणि गुजरातमध्ये हा नवा खेळ उघडकीस आला आहे. नियमांनुसार, एसआयआर नंतर निवडणूक आयोगाने मसुदा यादी जाहीर केली आणि १८ जानेवारी ही अंतिम तारीख ठरवून हरकती स्वीकारण्यास सुरुवात केली. १५ जानेवारीपर्यंत मोजकेच हरकती प्राप्त झाल्या, परंतु खरा खेळ त्यानंतर सुरू झाला. एका कटाच्या अंतर्गत, लाखो हरकती (फॉर्म ७) अचानक सादर करण्यात आल्या. “प्रदेश काँग्रेसने पुढे असा आरोप केला की जेव्हा मुख्य विरोधी पक्षाने निवडणूक आयोगाकडून आक्षेपांची माहिती मागितली तेव्हा त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.”निवडणूक आयोगाने आपली जबाबदारी आणि जबाबदारी दोन्ही सत्ताधारी पक्षाकडे गहाण ठेवल्यामुळे असे घडले आहे,” असा दावा गुजरात काँग्रेसने केला. (Wherever there is SIR, there is vote rigging)