Rahul attacks on BJP : भित्र्यांना घाबरायचे नसते हे बाळकडू घरातूनच मिळाले : राहुल गांधी

Rahul attacks on BJP

नवी दिल्ली : माझी बहीण (प्रियंका गांधी) मला नेहमीच ‘तू आगीशी खेळतोयस, तुला भीती वाटत नाही का,’ असे विचारत असते, असे सांगून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी म्हणाले, ‘‘भित्र्यांना घाबरायचे नसते हे बाळकडू आम्हाला घरातूनच मिळाले आहे,’’ अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजप विरोधात लढण्याचा निर्धार शनिवारी (२ ऑगस्ट) पुन्हा एकदा बोलून दाखवला. (Rahul attacks on BJP)

मोदी सरकारने लादलेल्या कृषी कायद्यांचा संदर्भ देऊन राहुल गांधी म्हणाले, ‘‘अरूण जेटली आता हयात नाहीत, त्यांच्याबद्दल आता काही बोलू नये. पण मला आठवते की जेव्हा मी कृषी कायद्यांविरुद्ध लढत होतो तेव्हा अरुण जेटलीजींना मला धमकी देण्यासाठी पाठवण्यात आले होते. ते म्हणाले होते की, जर तुम्ही शेती कायद्यांबाबत विरोध करत राहिलात तर आम्हाला तुमच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल. मी म्हणालो की, मला वाटत नाही की तुम्ही कोणाशी बोलत आहात हे तुम्हाला माहिती आहे. आम्ही काँग्रेस आहोत, भित्रे नाही. ब्रिटिश आम्हाला वाकवू शकले नव्हते.’’(Rahul attacks on BJP)

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) कायदा, मानवाधिकार आणि माहिती अधिकार यावरील वार्षिक परिषदेत ते बोलत होते.

तथापि, राहुल गांधी यांचे विधान अरुण जेटली यांचे पुत्र रोहन जेटली यांनी खोडून काढले आहे. तशी पोस्टही त्यांनी ‘X’ वर केली आहे.(Rahul attacks on BJP)

“माझ्या वडीलांनी धमकी दिल्याचे राहुल गांधी आता सांगताहेत. मी त्यांना आठवण करून देतो की, माझ्या वडीलांचे निधन २०१९ मध्ये झाले आहे आणि कृषी कायदे २०२० मध्ये लागू करण्यात आले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, विरोध केल्याबद्दल धमकावणे हे माझ्या वडिलांच्या स्वभावात नव्हते. ते एक कट्टर लोकशाहीवादी होते आणि नेहमीच एकमत निर्माण करण्यावर विश्वास ठेवत असत,” असे रोहन जेटली यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल

दरम्यान, राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ७० ते १०० जागांवर फेरफार झाल्याचा काँग्रेस पक्षाला संशय आहे, असे ते म्हणाले.

भारतातील निवडणूक व्यवस्था आधीच मृतावस्थेत आहे. तसे पुरावे आमच्याकडे आहेत. गांधी यांनी एका मतदारसंघाचे उदाहरण दिले. येथे ६.५ लाख मतदारांनी मतदान केले होते, त्यापैकी १.५ लाख बोगस होते, असे ते म्हणाले. “भारताचे पंतप्रधान हे खूपच कमी बहुमत असलेले पंतप्रधान आहेत. लोकसभा निवडणुकीत मतांची फेरफार कशा पद्धतीने केली जाऊ शकते हे येत्या काही दिवसांत आम्ही तुम्हाला सिद्ध करुन दाखवणार आहोत.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर