Flight cancelled: इराणवरील हल्ल्यानंतर एअर इंडियाकडून १६ विमाने रद्द

Flight cancelled

नवी दिल्ली : इस्रायलने इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले केल्यानंतर त्यांचे हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी (१३ जून) एअर इंडियाने १६ विमाने रद्द केली, त्यातील काहींचे मार्ग वळवण्यात आले आहेत. (Flight cancelled)

एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे, ‘‘या अनपेक्षित व्यत्ययामुळे आमच्या प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला वाईट वाटते. प्रवाशांना राहण्याची सोय करण्यासह त्यांची गैरसोय कमी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. विमानाचे बुकिंग रद्द केल्यास संबंधित प्रवाशांचे पैसे परत दिले जातील. वेळापत्रकात बदल केल्यास चार्ज आकारण्यात येणार नाही. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.’’ (Flight cancelled)

गुरुवारी (१३ जून) दुपारी अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच लंडनला जाणारे एअर इंडियाचे एक विमान कोसळले. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह २४२ प्रवासी आणि कर्मचारी होते. एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीवर हे विमान कोसळले.

भारताने व्यक्त केली चिंता

इस्रायलने इराणमधील अणुऊर्जा संशोधन केंद्रांसह अनेक लक्ष्यांवर हल्ले केल्याचा दावा केल्यानंतर पश्चिम आशियातील परिस्थितीबद्दल भारताने चिंता व्यक्त केली आहे. तेहरान आणि तेल अवीवमधील भारतीय दूतावासांनी भारतीय नागरिकांना या प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी (१३ जून) तसे निवेदन जारी केले आहे. (Flight cancelled)

‘‘नुकत्याच इराण आणि इस्रायलदरम्यान घडलेल्या घडामोडींबद्दल आम्हाला खूप चिंता आहे. आम्ही अणुकेंद्रांवरील हल्ल्यांशी संबंधित माहिती घेत आहोत. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. दोन्ही देशांनी कोणतेही तणावपूर्ण आणि टोकाची पावले उचलू नयेत, असे आवाहन केले आहे,’’ असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

यापूर्वी इराणमधील भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सर्व अनावश्यक हालचाली टाळण्याचे आवाहन केले होते. भारतीय दूतावासाने इराणमधील भारतीय नागरिकांना मिशनच्या सोशल मीडिया अकाउंटचे अनुसरण करण्याचे आवाहन केले होते. इस्रायलमधील भारतीय दूतावासानेही असाच सल्ला जारी केला होता. यामध्ये भारतीयांना सावधगिरी बाळगण्याचे, देशात अनावश्यक प्रवास टाळण्याचे आणि सुरक्षित आश्रयस्थानांच्या जवळ राहण्याचे आवाहन केले होते. ‘‘भारत दोन्ही बाजूंना कोणतेही तणावपूर्ण पाऊल न उचलण्याचे आवाहन करतो. तणावाची परिस्थिती कमी करण्यासाठी आणि मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी संवाद आणि राजनैतिकतेच्या विद्यमान माध्यमांचा वापर केला पाहिजे. भारताचे दोन्ही देशांशी जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि आमच्या बाजूने आम्ही शक्य ते सर्व करण्यास तयार आहोत, ’’ असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :
इस्त्रायलचे इराणच्या अणुभट्टी, लष्करी स्थळावर हल्ले
मी जिवंत कसा बाहेर पडलो ?

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी