नवी दिल्ली : हवाई दुर्घटनांमध्ये आतापर्यंत अनेक नेते आणि महत्त्वाच्या व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा, काँग्रेसचे नेते माधवराव शिंदे, वायएसआर, संजय गांधी यांच्यासह सीडीएस जनरल बीपीन रावत यांनी अशा दुर्घटनांमध्ये प्राण गमावले आहेत. गुरुवार (१२ जून)च्या विमान दुर्घटनेत गुजरात माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासह २४१ जणांचा मृत्यू झाला. (Aircrash)
या पार्श्वभूमीवर पीटीआयने अशा दुर्घटनांची आणि यात मृत्युमुखी पडलेल्या प्रमुख व्यक्तींची यादी दिली आहे.
* होमी भाभा (१९६६)
भारताच्या अणुकार्यक्रमाचे प्रणेते अणुभौतिकशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांचे २४ जानेवारी १९६६ रोजी एअर इंडिया फ्लाइट १०१ मध्ये एका अपघातात दुःखद निधन झाले. जिनेव्हा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी झालेल्या चुकीच्या संपर्कामुळे विमान स्विस आल्प्समधील माँट ब्लँक येथे कोसळले. (Aircrash)
* संजय गांधी (१९८०)
काँग्रेस नेते आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचे २३ जून १९८० रोजी अपघातात निधन झाले. सफदरजंग विमानतळाजवळ दिल्ली फ्लाइंग क्लबच्या विमानात हवाई स्टंट करण्याचा प्रयत्न करताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते कोसळले.
* माधवराव सिंधिया (२००१)
ज्येष्ठ काँग्रेस नेते माधवराव सिंधिया, जे स्वतः माजी नागरी विमान वाहतूक मंत्री होते यांचे ३० सप्टेंबर २००१ रोजी कानपूर येथे एका राजकीय रॅलीदरम्यान विमान अपघातात निधन झाले. त्यांना घेऊन जाणारे १० आसनी खाजगी विमान उत्तर प्रदेशातील मणिपुरीजवळ खराब हवामानामुळे कोसळले. (Aircrash)
* जीएमसी बालयोगी (२००२)
लोकसभा अध्यक्ष आणि तेलुगू देसम पक्षाचे नेते जीएमसी बालयोगी यांचा ३ मार्च २००२ रोजी अशाच अपघातात मृत्यू झाला. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील भीमावरम येथून त्यांना घेऊन जाणारे खाजगी हेलिकॉप्टर आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कैकलूरजवळील तलावात कोसळले.
* सायप्रियन संगमा (२००४)
मेघालयाचे ग्रामीण विकास मंत्री सायप्रियन संगमा आणि इतर नऊ जणांचा राज्याच्या राजधानीपासून फक्त २० किमी अंतरावर असलेल्या बारापाणी तलावाजवळ हेलिकॉप्टर कोसळून मृत्यु झाला. २२ सप्टेंबर २००४ रोजी ही दुर्घटना घडली.
* के. एस. सौम्या (२००४)
सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री के. एस. सौम्या १७ एप्रिल २००४ रोजी एका विमान अपघातात मृत्युमुखी पडली. ‘सूर्यवंशम’ मधील तिची भूमिका अत्यंत गाजली होती. सौम्या तिच्या भावासोबत बेंगळुरूहून करीमनगरला विमानाने जात होती. त्यावेळी हा अपघात झाला.
* ओ. पी. जिंदाल आणि सुरेंदर सिंग (२००५)
उद्योगपती आणि हरियाणाचे मंत्री ओम प्रकाश (ओपी) जिंदाल २००५ मध्ये कृषी मंत्री सुरेंदर सिंग यांच्यासह एका हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडले. त्यांचे हेलिकॉप्टर दिल्लीहून चंदीगडला जात असताना उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये कोसळले. (Aircrash)
* वाय. एस. रेड्डी (२००९)
आंध्र प्रदेशचे तत्कालीन लोकप्रितय मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी (२००९) यांचे २ सप्टेंबर २००९ रोजी निधन झाले. त्यांचे बेल ४३० हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे घनदाट अशा नल्लामला जंगलात कोसळले. ते वायएसआर म्हणून प्रसिद्ध होते.
* दोरजी खांडू (२०११)
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू आणि इतर चार जणांचा ३० एप्रिल २०११ रोजी पश्चिम कामेंग जिल्ह्यात अपघाती मृत्यू झाला. तवांगहून इटानगरला घेऊन जाणाऱ्या त्यांचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. * सीडीएस जनरल बिपिन रावत (२०२१) भारताचे पहिले संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे ८ डिसेंबर २०२१ रोजी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. ही घटना तामिळनाडूतील कुन्नूरजवळ घडली. जनरल रावत त्यांच्या पत्नी आणि इतर ११ जणांसह सुलूरहून वेलिंग्टनला जात होते.
हेही वाचा :
इराणवरील हल्ल्यानंतर एअर इंडियाकडून १६ विमाने रद्द
मी जिवंत कसा बाहेर पडलो ?