Alarm of possible attack: पर्यटकांवर संभाव्य हल्ल्याची पूर्वसूचना दिली होती

Alarm of possible attack

नवी दिल्ली : गुप्तचर संस्थांनी श्रीनगरच्या निसर्गरम्य डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या पर्यटकांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली होती, असे पीटीआयने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. पहेलगाममध्ये झालेल्या क्रूर हत्याकांडात दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेच्या काही दिवस आधी गुप्तचर संस्थांनी ही पूर्वसूचना दिली होती. (Alarm of possible attack)

या माहितीच्या आधारे, सुरक्षा दलांनी दाचीगाम, श्रीनगर आणि निशातसारख्या भागात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह गस्त वाढवली.

प्राथमिक अहवालानुसार, खोऱ्यातील पहेलगाममधील पर्यटकांमध्ये दोन स्थानिक दहशतवादी मिसळले होते.(Alarm of possible attack)

गोळीबार सुरू झाला तेव्हा त्यांनी या गटाला एका फूड कोर्टमध्ये नेले. तिथे दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

अधिकाऱ्यांना हा हल्ला भीती निर्माण करण्याचा आणि भारताच्या इतर भागांतील लोकांच्या मनात काश्मिरींविरुद्ध सूड उगवण्याचा प्रयत्न असल्याचे वाटते. या घटनेनंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्वरित हस्तक्षेप केला. नवी दिल्लीशी समन्वय साधला. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना काश्मिरी रहिवाशांची काळजी घेण्याचे आदेश दिले. यामुळे अन्य राज्यांत काम आणि शिक्षणानिमित्त राहत असलेल्या काश्मिरींच्या जीविताला असलेला धोका टळला.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाच्या स्वरूपातील बदलही अधोरेखित केला आहे. कारण सुरक्षा दलांना अफगाणिस्तानात मागे राहिलेल्या ‘नाटो’च्या साठ्यातील एम-सिरीज रायफल्स आणि चिलखत-भेदी गोळ्यांसह प्रगत शस्त्रे सापडली आहेत.(Alarm of possible attack)

दरम्यान, गेल्या ऑक्टोबरमध्ये सोनमर्गच्या गंगानगीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. किमान दोन आठवडे ही शोधमोहीम सुरू होती. मात्र या घटनेतील दहशतवाद्यांचा शोध लागला नाही. त्यामुळे ज्या दिवशी पहेलगाम येथे हल्ला झाला त्याच दिवशी शोधमोहीम रद्द करण्यात आली.(Alarm of possible attack)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १९ एप्रिल रोजी काश्मीरचा दौरा होता. कटरा ते श्रीनगर या पहिल्या ट्रेनला ते हिरवा झेंडा दाखविणार होते. हा उपक्रम काश्मीरला देशाच्या उर्वरित भागाशी जोडणारा आहे. या नियोजित दौऱ्यात अडथळा आणण्याचा दहशतवाद्यांचा हेतू असावा असा अधिकाऱ्यांचा संशय आहे. पंतप्रधानांचा १९ एप्रिल रोजी होणारा हा दौरा खराब हवामानामुळे पुढे ढकलण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानस्थित घटक हिंसाचार घडवून या दौऱ्यावर दहशतवादाचे सावट टाकू इच्छित असावेत.

हेही वाचा :
कर्नाटकचा मंत्री म्हणाला, मी युद्धावर जातो…
पाकिस्तानची बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचणीची तयारी
पाकिस्तानवर आयात बंदी

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर