TMC slams Modi : मोदींकडून निर्लज्जपणे ‘सिंदूर’ चे राजकारण : तृणमूल

TMC slams Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मूमध्ये असताना त्यांनी पहेलगाममध्ये मारल्या गेलेल्या पर्यटकांचा कसलाही विचार केला नाही. ते निर्लज्जपणे ‘सिंदूर’चे राजकारण करत आहेत, अशी घणाघाती टीका तृणमूल काँग्रेसने केली आहे. (TMC slams Modi)

राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी त्यांच्या एक्स-हँडलमध्ये म्हटले आहे की, “पंतप्रधान मोदींनी कटरा ते श्रीनगर या वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केले. ‘‘त्यांच्या नसांमध्ये सिंदूर वाहतो’’ म्हणून ते किमान एक काम करू शकले असते ते म्हणजे त्यांनी ट्रेनमधून प्रवास करून श्रीनगर आणि नंतर पहलगाम, पूंछ आणि उरी येथे जाऊन पाकिस्तानी गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांशी संवाद साधला असता.’’

‘‘जम्मू-काश्मीरमध्ये आमच्या पक्षाचे अस्तित्व नसतानाही, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निर्देशानुसार पाच सदस्यीय शिष्टमंडळ पाठवणारा आमचा पक्ष पहिला पक्ष होता. का? कारण, भारतीय म्हणून, बंगालला जम्मू-काश्मीरच्या वेदनांची काळजी आहे. जर पंतप्रधान मोदी आपल्या सशस्त्र दलांच्या विजयाचे श्रेय चोरण्यासाठी देशभर फिरू शकतात, तर त्यांना आपल्याच लोकांचे दुःख वाटणे इतके कठीण का आहे?,’’ असा सवालही खा. गोखले यांनी केला. (TMC slams Modi)

‘‘पंतप्रधान मोदी निर्लज्जपणे ‘सिंदूर’ चे राजकारण करू इच्छितात, पण त्यांना पाकिस्तानी गोळीबारातील बळींबद्दल काहीही काळजी नाही.’’

‘‘ते आज स्वतःच्या जनसंपर्कासाठी जम्मू-काश्मीरला गेले होते. निष्पाप बळींचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. हा असा माणूस आहे जो स्वतःशिवाय कोणाचीही चिंता करत नाही,’’ अशी टीकाही त्यांनी केली.

येथे हे देखील नमूद केले पाहिजे की, ऑपरेशन सिंदूर नंतर दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी परदेशात जाणाऱ्या सर्वपक्षीय खासदार शिष्टमंडळात पक्षाचे खासदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी सहभागी झाले होते. त्यांनीही काश्मीरमधील पर्यटनाचा प्रचार केला होता. (TMC slams Modi)

“पर्यटन रोजगार निर्माण करते. पर्यटन लोकांना जोडते. पण दुर्दैवाने, आपला शेजारी देश मानवतेच्या विरोधात आहे, सौहार्दाच्या विरोधात आहे आणि पर्यटनाच्या विरोधात आहे. इतकेच नाही – तो असा देश आहे जो गरिबांच्या उपजीविकेच्याही विरोधात आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये जे घडले ते याचे स्पष्ट उदाहरण आहे. पाकिस्तानने पहलगाममध्ये मानवता आणि काश्मिरीयत या दोन्हींवर हल्ला केला. त्याचा हेतू भारतात दंगली भडकवणे हा होता. त्याचा उद्देश काश्मीरमधील कष्टकरी लोकांची कमाई थांबवणे हा होता. म्हणूनच पाकिस्तानने पर्यटकांना लक्ष्य केले. या हल्ल्यांद्वारे, पाकिस्तान काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला धक्का देऊ इच्छित होता – आम्ही एकत्रितपणे उलट घडेल याची खात्री करू,’’ असे ते म्हणाले. “या हल्ल्यांद्वारे, ते आपली अर्थव्यवस्था बिघडवू इच्छित होते. म्हणून आता काश्मीरची भरभराट आणि समृद्धी सुनिश्चित करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. माझे नम्र आवाहन आहे की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही भारताला भेट द्याल तेव्हा स्थानिक लोकांना पाठिंबा देण्यासाठी आणि पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी काश्मीरमध्ये ३-४ दिवस घालवा,’’ असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले होते.

हेही वाचा :
महाराष्ट्रानंतर बिहारात ‘मॅच फिक्सिंग’

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर