म्हैसूर : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ४२ देशांना भेटी दिल्या, पण मणिपूरला नाही. ईशान्येकडील हे राज्य गेल्या एका वर्षापेक्षा जास्त काळ जातीय अशांततेने तावून सुलाखून गेले आहे, मात्र मोदींना या राज्यात भेट द्यावी असे वाटत नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी (१९ जुलै) येथे केली. (Kharge slams Modi)
विरोधी पक्ष केंद्र सरकारच्या या मणिपूरवर आलेल्या संकटाची हाताळणी योग्य प्रकारे करण्याचा आग्रह वारंवार धरत आहे, त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत. मात्र मोदी सरकार हा प्रश्न गांभीर्याने घ्यायला तयार नाही, याकडेही खरगे यांनी लक्ष वेधले.
काँग्रेसच्यावतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. (Kharge slams Modi)
खरगे यांनी असेही ठामपणे सांगितले की, भारतातील जनता भाजप आणि आरएसएसला संविधान बदलू देणार नाही. ” संविधान बदलण्याचा प्रयत्न देशातील जनता हाणून पाडेल. भाजप आणि आरएसएसचे हा डाव जनता सहन करणार नाही, ” असे ते म्हणाले.
“काँग्रेस पक्षात लोक काम करतात, तर मोदींच्या भाजपमध्ये लोक फक्त बोलतात,” अशा शब्दांत त्यांनी दोन्ही पक्षांतील फरक लोकांच्या नजरेस आणून दिला. (Kharge slams Modi)
कर्नाटक सरकार आर्थिक अडचणीत आहे या दाव्यांना उत्तर देताना, कर्नाटक सरकार दिवाळखोर नाही, असे सांगत खरगे यांनी राज्याच्या भूमिकेचे समर्थन केले. तसेच भाजप नेत्यांनी सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनावर केलेल्या आरोपांनाही त्यांनी चोख उत्तर दिले.
हेही वाचा :
विधानसभेला ‘मी’पणा नडला : उद्धव ठाकरे
भारत पाकिस्तान युद्धात पाच जेट विमाने पाडली