Karnataka HC takes suo motu: चेंगराचेंगरीची हायकोर्टाकडून दखल

Karnataka HC takes suo motu

बेंगळुरू : चिन्नास्वामी स्टेडियमजवळ बुधवारी (४ जून) झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची कर्नाटक उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. तसेच कर्नाटक राज्याला नोटीस बजावली. १० जूनपर्यंत सविस्तर स्थिती अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले. (Karnataka HC takes suo motu)

दरम्यान, आरसीबी टीमने बेंगळुरू चेंगराचेंगरीत बळी पडलेल्यांच्या अकरा कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

बुधवारी बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या आयपीएल विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी चाहते जमल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. ३३ जण जखमी झाले. स्टेडियमच्या प्रवेशद्वाराजवळ ही दुर्घटना घडली. १८ वर्षांनंतर आरसीबीच्या ऐतिहासिक पहिल्या विजेतेपदाच्या निमित्ताने २ लाखांहून अधिक चाहते येथे जमले होते. गर्दी आणि अरुंद रस्त्यांमुळे प्राणघातक गर्दी झाली होती. गर्दी इतकी प्रचंड होती की श्वास घेणेही मुश्किल झाले होते, असे तेथे उपस्थित असलेल्या एका चाहत्याने सांगितले होते.(Karnataka HC takes suo motu)

या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्यांपैकी बहुतेकांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. उपचार सुरू असलेल्या काही जणांची स्थिती धोक्याबाहेर आहे, असे रुग्णालय अधिकाऱ्यांनी गुरुवारी (५ जून) सांगितले. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई आणि जखमींना मोफत उपचार देण्याची घोषणा केली आहे.

संघाचा विजय साजरा करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सुमारे २.५ लाख चाहते उपस्थित होते. अनपेक्षित आणि एवढ्या मोठ्या गर्दीचे नियंत्रण करण्याची तयारी सरकारने केली नव्हती, अशी कबुली राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली.(Karnataka HC takes suo motu)

भाजपकडून राजकारण : डी.के. शिवकुमार

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार गुरुवारी (५ जून २०२५) चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत झालेल्या जीवितहानीबद्दल भावनिक झाले आणि म्हणाले की ११ जणांचा बळी घेणाऱ्या घटनेमुळे बेंगळुरूने आपली प्रतिमा गमावली आहे. भाजप या दुर्घटनेचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पोलिसांनी उत्सव साजरा करण्याची परवानगी दिली नसल्याच्या विरोधी पक्षाच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ‘‘मी भाजपच्या कोणत्याही व्यक्तीवर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. मी फक्त कर्नाटकच्या लोकांना आणि देशातील लोकांना उत्तरदायी आहे. भाजपचे सर्व लोक मूर्ख आहेत… ते या घाणेरड्या गोष्टींचे सूत्रधार देखील आहेत.’’

हेही वाचा :
अमेरिकेकडून १२ देशांतील नागरिकांना प्रवेशबंदी
राफेलचे पार्ट्स टाटा तयार करणार

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर