कोल्हापूर : प्रतिनिधी : अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किंमत मोजावीच लागते, ती ज्याच्या त्याच्या वकुबाप्रमाणे चुकवावी लागते. त्यासाठी तयारी ठेवली पाहिजे, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक यांनी सोमवारी (२५ ऑगस्ट) येथे व्यक्त केले. (Girija Oak)
‘महाराष्ट्र दिनमान’च्या साहित्य उत्सवात संवादक सौमित्र पोटे यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी गिरीजा ओक यांनी अभिनेत्री म्हणून झालेला प्रवास उलगडला. बालसाहित्यापासून गंभीर साहित्याकडे त्या कशा वळल्या आणि वाचनाने त्यांचे व्यक्तिमत्व कसे समृद्ध होत गेले ते त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केली. त्याचवेळी उत्तम साहित्य तुमच्या व्यक्तिमत्वाला नक्कीच पैलू पाडत असते, असे त्या म्हणाल्या.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेच पाहिजे, वाद-संवाद असलाच पाहिजे, त्यातून समाजात सौहार्दाचे वातावरण राहते, असे म्हणाल्या. (Girija Oak)
या मुलाखतीची लिंक