प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीत कृत्रिम पाऊस

नवी दिल्ली : दिल्लीत मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी दाट धुके पसरले आणि प्रदूषणाची पातळी अत्यंत गंभीर राहिली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार, दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सकाळी ९ वाजता ४८८ नोंदवला गेला. राजधानीतील ३२ निरीक्षण केंद्रांपैकी ३१ ने ४८० पेक्षा जास्त ‘एक्यूआय’ पातळी नोंदवली. अलीपूर आणि सोनिया विहार या दोन केंद्रांमध्ये ते कमाल ५०० इतके होते. मंद वारा आणि घसरलेले तापमान यामुळे प्रदूषक कणांना गाळणे कठीण झाले आहे. याबाबत दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय म्हणाले, की दिल्लीचे प्रदूषण कृत्रिम पावसाने दूर केले जाऊ शकते.

Related posts

आसाममधील ग्रामपंचायतीचे स्वयंपूर्ण कचरा व्यवस्थापन

इंडिया टुडे समूहाने घेतले १२० कर्मचाऱ्यांचे राजीनामे

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा