Agni-5 : भारताच्या संरक्षण क्षमतेत वाढ; अग्नि-५ची यशस्वी चाचणी

Agni-5

नवी दिल्ली : भारताने बुधवारी (२० ऑगस्ट) ओडिशाच्या किनाऱ्यावरील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रावरून अग्नि-५ मध्यम-श्रेणीच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. त्यामुळे देशाच्या धोरणात्मक संरक्षण क्षमतेत लक्षणीय वाढ झाली.(Agni-5)

स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या प्रक्षेपणाने क्षेपणास्त्राच्या सर्व ऑपरेशनल आणि तांत्रिक बाबींची पडताळणी केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेले, अग्नि-५ हे ५,००० किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याचे अणु-सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे अग्नि मालिकेतील सर्वांत प्रगत आहे. ते जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचे एक महत्त्वाचे अंग आहे. (Agni-5)

मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (MIRV) तंत्रज्ञानाने सुसज्ज, अग्नि-५ अनेक अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. प्रत्येक अण्वस्त्र वेगवेगळ्या लक्ष्यावर मारा करण्यास सक्षम आहे. त्यामुळे त्याची धोरणात्मक परिणामकारकता मोठ्या प्रमाणात वाढते.

रिंग लेसर जायरोस्कोप-आधारित इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टम (RLG-INS) आणि मायक्रो इनर्शियल नेव्हिगेशन सिस्टम (MINGS) असल्यामुळे ते अचूक लक्ष्यभेद करत. ते भारताच्या NavIC आणि US GPS सारख्या उपग्रह नेव्हिगेशन सिस्टमद्वारे काम करते.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर