ताडोबात सोडलेल्या तीन गिधाडांचा मृत्यू

चंद्रपूर : ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात सोडलेल्या तीन गिधाडांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. बोटेझरी जंगलात ही गिधाडे सोडली होती. याच वर्षीच्या जानेवारीत हरियाणातील पिंजोर येथून आणलेल्या संकटग्रस्त व नामषेश होण्याच्या मार्गावर असलेल्या १० गिधाडांना जीएसम ट्रान्समिशन ट्रॅकिंग डिव्हाईस लावून बोटेझरी येथे सोडले होते. ही घटना गुरुवारी उजेडात आली आहे. वनविभागाने मृत गिधाडांचे अवशेष अधिक तपासणीसाठी पाठविले आहे. (Tadoba)

Related posts

रास्त मुद्दे, तरी अवसानघातकी `पवार` वेळ

तुरुंगात जाण्याचं स्वप्न

अफवांच्या बाजारात सुप्रिया सुळे, जयंत पाटील मैदानात