दस-याची तयारी

नवरात्रोत्सवाच्या काळात घराच्या स्वच्छतेला विशेष महत्त्व असते. घर स्वच्छ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते. त्यामुळे घरातील अंथरुण-पांघरूणे धुण्यासाठी सगळीकडे नदीवर झुंबड उडालेली असते. सांगली जिल्ह्यातील भिलवडी (ता. पलूस) येथील कृष्णानदीच्या घाटावर धुण्यासाठी भिलवडी व आसपासच्या १२ वाड्या आणि गावातील लोक येत असतात. वाळत घातलेल्या रंगीबेरंगी अंथरूण- पांघरुणांमुळे घाटाचे सौंदर्य खुलले आहे. (छायाचित्र: अशोक जाधव, चिंचोली)

Related posts

समाजवादी शवपेटीवर गडहिंग्लजला शेवटचा खिळा

मधुमेहामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर ११.४ लाख कोटी डॉलर्सचा बोजा

मंत्र्यांना शेतकरी आत्महत्याचे काहीच सोयर सुतक नाही :  डॉ.श्रीपाल सबनीस, दमसा साहित्य संमेलनाचे उद्घाटन