प्रदूषणामुळे शाळांना सुट्टीचे आदेश

जयपूरः राजस्थान आणि मध्य प्रदेशसह देशातील चार राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. जयपूरमध्ये दिवसाही धुके दिसून येत होते. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर खैरथळ-तिजारा जिल्ह्यातील सरकारी व खासगी शाळांना २३ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमध्ये भोपाळ-इंदूरसह २८ शहरांमध्ये तापमान सामान्यपेक्षा कमी झाले आहे. दिल्ली, पंजाब आणि चंदीगड या उत्तर भारतातील राज्यांमध्ये प्रदूषण वाढले आहे. पंजाबमध्ये असे ५ जिल्हे आहेत, जिथे प्रदूषण पातळी सामान्यपेक्षा चारपट जास्त आहे. दिल्ली आणि हरियाणातील अनेक शाळा ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. (Air pollution)

Related posts

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?

नरेंद्र मोदींना हरवता येऊ शकतं… !