दोन अस्वलांचा शेतकरी दाम्पत्यावर हल्ला, शेतकरी गंभीर

बेळगाव : शेतात काम करत असलेल्या शेतकरी जोडाप्यावर दोन अस्वलांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमींपैकी शेतकऱ्याची प्रकृती गंभीर आहे. खानापूर तालुक्यातील माण गावातील शिवारात ही घटना घडली.

अस्वलांच्या हल्ल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. शेतकरी पती-पत्नी काम करत असताना दोन अस्वले शेतात आली. त्यांनी पती-पत्नीवर हल्ला केला. यावेळी प्रसंगावधान राखून शेतकऱ्याच्या पत्नीने पळ काढून आरडा-ओरड करून लोकांना बोलावले. अस्वलांनी शेतकऱ्याच्या पायाचे लचके तोडले. तर, पत्नी किरकोळ जखमी झाली आहे. सखाराम महादेव गावकर (६३) असे अस्वलांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जखमी शेतकऱ्याला बेळगावच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Related posts

समाजवादी शवपेटीवर गडहिंग्लजला शेवटचा खिळा

मंत्र्यांना शेतकरी आत्महत्याचे काहीच सोयर सुतक नाही :  डॉ.श्रीपाल सबनीस, दमसा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

गडहिंग्लज येथे दमसा साहित्य संमेलनाचे आयोजन; शनिवारी, रविवारी भरगच्च कार्यक्रम