लोकसंख्या वाढीचा भागवत यांचा सल्ला!

Mohan Bhagwat

नागपूरः लोकसंख्या वाढीच्या दरात (प्रजनन दर) घट झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी चिंता व्यक्ती केली आहे. लोकसंख्येच्या दरात होत असलेली घट चिंतेचा विषय आहे. लोकसांखिकीच्या नियमानुसार लोकसंख्येचा वृद्धीदर २.१ पेक्षा कमी नसावा, असे ते म्हणाले.
नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की, आधुनिक लोकसंख्या विज्ञानानुसार, जेव्हा एखाद्या समाजाची संख्या (प्रजनन दर) २.१ पेक्षा कमी होते, तेव्हा तो समाज जगातून नष्ट होतो. त्या समाजावर कोणतेही संकट न येताही तो समाज नामशेष होतो. याचप्रकारे अनेक भाषा, अनेक समाज नष्ट झाले. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर २.१ च्या खाली जाता कामा नये. आपल्या देशाने १९९८ किंवा २००२ मध्ये लोकसंख्या धोरण तयार केले.

लोकसंख्येचा वृद्धी दर २.१ च्या खाली जाता कामा नये, असे त्यात नमूद करण्यात आले आहे. जर आपण लोकसंख्या वाढीचा दर २.१ विचारात घेतला, तर आपल्याला दोनपेक्षा अधिक मुलांची गरज आहे. तीन तर असायलाच हवीत. लोकसंख्येचे विज्ञान हेच सांगते. समाज टिकायला हवा यासाठी संख्या महत्त्वाची आहे.

भारतात आदर्श प्रजनन दर २.१ इतका आहे. याचा अर्थ एका महिलेने तिच्या जीवन काळात सरासरी २.१ मुलांना म्हणजेच २ पेक्षा अधिक मुलांना जन्म द्यायला हवा. हा आकडा जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केला आहे. देशातील लोकसंख्या स्थिर राखण्यासाठी २.१ प्रजनन दर गरजेचा आहे. असे न झाल्यास लोकसंख्येचे असंतुलन बिघडू शकते. एका महिलेला सरासरी किती मुले यावरून त्या देशाचा किंवा समाजाचा प्रजनन दर समजतो.

हिंदूंना अधिक मुले असावीत

देशात एक समान लोकसांखिकी योजना नसल्यास देशातील लोकसंख्येचा संतुलन बिघडण्याचा धोका आहे. त्यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचे संघाकडून सातत्यानं सांगण्यात येत आहे. हिंदूंना अधिक मुले असावीत, अशी विधाने भाजपचे काही नेते करत सांगतात. विशेष म्हणजे संघाशी अधिक जवळीक असणाऱ्या भाजप नेत्यांकडूनच अशी विधाने केली जातात.

Related posts

Nagpur Riots : नागपूरला दंगलींचा शंभर वर्षांचा इतिहास

Shaktipeeth Mahamarg

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्ग समर्थक आमदारांची नावे जाहीर करा

murder

murder : शेती करायला सांगताय, खूनच करतो!