श्रीनगर : लडाखला राज्य आणि सहाव्या अनुसूचीचा दर्जा मिळावा यासाठी सुरू असलेल्या निदर्शनांवेळी बुधवारी (२४ सप्टेंबर) चौघांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले, अशी भीती व्यक्त केली जात आहे. लडाखचे लेफ्टनंट-गव्हर्नर कविंदर गुप्ता यांनी दूरचित्रवाणीवरील भाषणात मृतांची पुष्टी केली, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून कर्फ्यू लागू करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. (Curfew in Ladakh)
केंद्रीय गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, एका बेशिस्त जमावाने सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली आणि पोलिसांवर हल्ला केला. ज्यामध्ये सुमारे ३० सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यामध्ये दुर्दैवाने काही जणांचे बळी गेले आहेत, असे त्यात म्हटले आहे.
गृह मंत्रालयाने सांगितले की, हिंसाचार सकाळी ११.३० वाजता सुरू झाला. दुपारी ४ वाजेपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आली. राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीचा दर्जा मिळावा या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आणि मंत्रालयाशी बराच काळ चर्चा न झाल्याने ही निदर्शने करण्यात आली. (Curfew in Ladakh)
लेहमध्ये बुधवारी पोलिस आणि निमलष्करी दलांनी केलेल्या गोळीबारात चार निदर्शकांचा मृत्यू झाला. आणि ५८ जण जखमी झाले. (Curfew in Ladakh)
सोनम वांगचुक म्हणाले की, मंगळवारी दोन उपोषणकर्त्यांची तब्बेत खालावली. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तरुण संतापले. ‘‘यामुळे लडाखमधील तरुणांना धक्का बसला आणि ते बुधवारी हजारोंच्या संख्येने लेहमधील शहीद मैदानावर एकता व्यक्त करण्यासाठी बाहेर पडले,’’ वांगचुक म्हणाले. “त्यापैकी काहींना हातपाय गमावले आहेत.”
त्यांनी सांगितले की सुमारे २००० जण मोठ्या गर्दीतून बाहेर पडले आणि त्यांनी मोर्चा काढला, त्यांनी पोलिसांचे वाहन, एक सरकारी कार्यालय आणि भाजपचे कार्यालय जाळल्याचा आरोप आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जमावाने दगडफेक केल्यावर पोलिसांनी सुरुवातीला अश्रूधुराचा वापर केला आणि लाठीमार केला आणि त्यानंतर थेट गोळीबार केला. ज्यामध्ये किमान २० सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.