Home » Blog » Satya Pal Malik passes away : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

Satya Pal Malik passes away : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

by प्रतिनिधी
0 comments
Satya Pal Malik passes away

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे वयाच्या ७९ वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. नवी दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये मंगळवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. त्यांची प्रकृती नाजूक झाल्यानंतर ११ मे रोजी राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले.

गोवा, मेघालय, ओडिशा आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून त्यांनी आपली कार्यभार सांभाळला. तत्पूर्वी आमदार ते राज्यपाल असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त होत आहे. पंतप्रधान, राष्ट्रपतीसह केंद्रीय मंत्री आणि मान्यवरांनी त्यांना श्रद्धाजंली वाहिली. (Satya Pal Malik passes away)

सत्यपाल मलिक यांचा प्रवास समाजवादी पक्षातून सुरु झाला होता, ते काही काळ भाजपमध्येही कार्यरत होते. मात्र, अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट टीका केल्याने त्यांच्याकडे देशभरातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७०हटवल्यानंतर मोठी तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी सत्यपाल मलिक जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते. अशा महत्त्वाच्या क्षणी प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राज्यपाल म्हणून सत्यपाल मलिक यांच्याकडे होती. सत्यपाल मलिक यांच्याच कार्यकाळात जम्मू काश्मीर आणि लडाख असे भाग करण्यात आले होते. दरम्यान, सत्यपाल मलिक यांना तीन नोव्हेंबर २०१९ ला गोव्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, पुलवामामध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकावर गंभीर आरोप केले होते, जवानांना हेलिकॉप्टर देण्याऐवजी बसने पाठविण्यात आल्याचे सांगत त्यांनी सरकारला लक्ष्य केलं होतं. त्यांच्या या आरोपानंतर ते दशभरात चर्चेत आले होते. (Satya Pal Malik passes away)

पुलवामा हल्ल्यावरुन केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप करणाऱ्या मलिक यांनी ऑपरेशन सिंदूरवर समाधान व्यक्त केलं होतं.  मलिक यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट लिहिले होते की, भारतीय सैन्य दलाचा अभिमान आहे. पक्षीय राजकारणापासून दूर होत भारतातील विविध पक्षाच्या नेत्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या हद्दीतील दहशवादी ठिकाणांवर हल्ले केले. त्याबद्दल भारत माता की जय आणि जय हिंद… असे ट्विट मलिक यांनी केले होते. (Satya Pal Malik passes away)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00