- राकेश कायस्थ
धर्मेंद्र प्रधान ‘रिटायर्ड हर्ट’ झाले नाहीत, तर ‘रिटायर्ड आऊट’ झाले आहेत. दुखापत त्यांना नाही, तर नरेंद्र मोदींना झाली आहे. ही जखम खोल आहे; मात्र तिची चर्चा नंतर. ‘रिटायर्ड आऊट’ हा आधुनिक क्रिकेटमधील असा नियम आहे की, एखाद्या फलंदाजामुळे संपूर्ण संघाचा खेळ बिघडत असेल, तर कर्णधार आणि प्रशिक्षक त्याला परत बोलावून घेतात. (Shock Dharmendra Pradhan injured Modi)
धर्मेंद्र प्रधान नेमका कोणता खेळ बिघडवत होते? त्यांनी आपल्या संघाला शिक्षणाच्या अशा खेळपट्टीवर आणून उभे केले होते, जिथे संपूर्ण संघ हतबल झाला होता आणि सतत येणाऱ्या बाऊन्सर्समुळे रक्तबंबाळ होत होता. मोदी-शहा यांना वाटले होते की, इतर सर्व विरोधी आवाजांप्रमाणेच जनरेशन झेडचे आंदोलनही सहज चिरडता येईल. पण झाले नेमके उलटे. प्रत्येक दिवसागणिक सरकार अधिक जखमी आणि अधिक हतबल होत गेले.
‘गोदी मीडिया’चा ‘आयर्न डोम’
शिक्षण, आरोग्य आणि उत्तरदायित्व हे असे विषय आहेत की, ते समोर आले की या सरकारचा श्वासच अडकतो. गेली बारा वर्षे ‘गोदी मीडिया’ इस्रायलच्या ‘आयर्न डोम’प्रमाणे संरक्षण कवच बनून हे विषय सार्वजनिक चर्चेच्या केंद्रस्थानी येऊ नयेत, यासाठी प्रयत्न करत होता. पण जसा इराण युद्धात ‘आयर्न डोम’ निष्प्रभ ठरला, तसाच गोदी माध्यमांचाही संरक्षण कवच कोसळले. (Shock Dharmendra Pradhan injured Modi)
हेही वाचाः जंतरमंतर वर कॉक्रोच जनता पार्टी कडून धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
नरेंद्र मोदी यांनी सातत्याने हेच सिद्ध केले आहे की, हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाशिवाय त्यांच्याकडे दुसरा राजकीय अजेंडा नाही. तो मुद्दा बाजूला गेला की त्यांची अवस्था पाण्याबाहेर पडलेल्या माशासारखी होते. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राम मंदिरातील देणग्यांबाबतच्या कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे संपूर्ण संघ परिवार बचावात्मक स्थितीत होता आणि लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी त्यांना एखादा ‘अब्दुल’ही सापडत नव्हता.
ठिणगीचे वणव्यात रुपांतर
दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तयारी सुरू होती. ‘वंदे मातरम् अपमान’सारखे विधेयक आणून पुन्हा हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा अजेंडा पुढे रेटण्याची तयारी सुरू होती. त्याचबरोबर महिलांच्या आरक्षणाच्या नावाखाली परिसीमन विधेयक आणून ते मंजूर करून घेण्याचाही प्रयत्न होणार असल्याचे संकेत होते.
हेही वाचाः … आणि झुरळांनी मोदींची खुर्ची हलवली!
मात्र, घडले काही वेगळेच. शिक्षण व्यवस्थेच्या कथित अधोगतीमुळे अस्वस्थ झालेला देशातील युवक रस्त्यावर उतरला. सरकारला जी ठिणगी वाटत होती, ती वणव्यात रूपांतरित झाली आणि त्याची झळ थेट पंतप्रधान निवासापर्यंत पोहोचली. (Shock Dharmendra Pradhan injured Modi)
अखेर अनिच्छेने का होईना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जाणारे धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर अधिक तयारीने युवकांवर दबाव आणणे आणि पुन्हा हिंदू-मुस्लिम राजकारण सुरू करणे, अशी सरकारची रणनीती असू शकते. मात्र, जनरेशन झेड पुन्हा सरकारच्या अशा हालचालींकडे डोळेझाक करेल का?
मोदी सरकारवर युवकांचे लक्ष
आता ते शक्य वाटत नाही. मोदी सरकारच्या प्रत्येक हालचालीवर देशातील युवकांचे लक्ष असेल. गोदी माध्यमांतील अँकर विरोधी पक्षाच्या नेत्यांना विचारत आहेत—”धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने देशाची शिक्षण व्यवस्था सुधारेल का?”
हेही वाचाः दिल्लीतल्या लाठीमारानं देश शुद्धीवर आलाय का ?
या प्रश्नाला विरोधकांनी उत्तर द्यायला हवे की, “केवळ राजीनाम्याने शिक्षण व्यवस्था सुधारणार नाही. ती सुधारण्यासाठी काय करावे लागेल, यावर चर्चा आयोजित करा; मग आम्ही तुमच्या कार्यक्रमात येऊ.”
बारा वर्षांनंतर प्रथमच नरेंद्र मोदी उत्तरदायित्वाच्या खेळपट्टीवर उभे राहिले आहेत. त्यांचा प्रयत्न पुन्हा हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाकडे राजकीय चर्चा वळवण्याचा असेल. मात्र, जनरेशन झेडने जखमी झालेल्या सत्तेला उत्तरदायित्वाच्या प्रश्नावर सतत घेरून ठेवले पाहिजे. (Shock Dharmendra Pradhan injured Modi)
देश आधीच आर्थिक आणि शैक्षणिक संकटाच्या दलदलीत मोठ्या प्रमाणावर अडकला आहे. अर्थव्यवस्था आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर गंभीर चर्चा होत नाही. देशाला पुन्हा विकास आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर आणण्याची ही कदाचित शेवटची संधी आहे.
(लेखक हिंदीतील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक आहेत.)