गांधीनगर : गुजरातमध्ये मालवाहू रोपवेची केबल तुटून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. पंचमहल जिल्ह्यातील पावगड टेकडी मंदिराजवळ दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Pavagadh Hill)
पोलिस अधीक्षक हरेश दुधाट यांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केली आणि सांगितले की पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य करत आहेत, असे पीटीआयने वृत्त दिले आहे.
पंचमहलचे जिल्हाधिकारी अजय दहिया म्हणाले की, हा अपघात मालवाहू रोपवेशी संबंधित होता, जो साहित्य वाहून नेण्यासाठी वापरला जातो. “विविध वस्तू वाहून नेण्यासाठी बनवलेला रोपवे सहा जणांसह उतारावरून जात होता तेव्हा ही घटना घडली,” सुमारे ८०० मीटर उंचीवर असलेल्या महाकालिका मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले पावगड टेकडी मंदिर दरवर्षी लाखो यात्रेकरु दर्शनासाठी येतात. शिखरावर पोहोचण्यासाठी भाविक सहसा सुमारे दोन हजार पायऱ्या चढतात किंवा केबल कार वापरतात. (Pavagadh Hill)
या घटनेबद्दल गुजरातचे आरोग्य मंत्री आणि सरकारचे प्रवक्ते ऋषिकेश पटेल म्हणाले, “…पावागडमध्ये, एक रोपवे प्रवाशांसाठी आहे आणि दुसरी रोप वे माल वाहतूक करण्यासाठी आहे. प्राथमिक माहितीनुसार, टॉवर क्रमांक एक जवळ, सहा कामगारांना घेऊन जाणाऱ्या बोगीचा तार तुटला आणि संपूर्ण बोगी खाली पडली. त्यावर बसलेल्या सहा कामगारांचा मृत्यू झाला. त्यांचे सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि ते पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत . अधिकाऱ्यांनी सांगितले की, खराब हवामानामुळे शनिवारी सकाळी प्रवासी रोपवे बंद होता. (Pavagadh Hill)
चंपानेरपासून जवळच असलेली सुमारे १,४७१ फूट उंचीची पठार असलेली पावगड टेकडी आहे. गुजरातमधील सर्वाधिक भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक असलेल्या कालीचे मंदिर आहे जिथे दरवर्षी सुमारे २५ लाख भाविक येतात. (Pavagadh Hill)