नवी दिल्ली : दरभंगा येथे इंडिया आघाडीच्या ‘मतदार अधिकार यात्रे’ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कथितपणे अपशब्द वापरण्यात आल्यानंतर शुक्रवारी (२९ ऑगस्ट) काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. (A war of words)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आणि माफी मागण्याची मागणी केली.
गुवाहाटी येथे एका सभेला संबोधित करताना शाह म्हणाले, ‘‘घुसपैठिया बचाओ यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींबद्दल अपमानास्पद शब्द वापरून काँग्रेस नेत्यांनी सर्वांत निंदनीय कृत्य केले आहे. मी त्याचा निषेध करतो. प्रत्येक काँग्रेस नेत्याने पंतप्रधान मोदींबद्दल अपमानास्पद शब्द वापरले आहेत.’’ (A war of words)
‘‘मी राहुल गांधींना आग्रह करेन की जर थोडीशीही लाज शिल्लक असेल तर त्यांनी मोदीजी, त्यांच्या दिवंगत आई आणि देशातील लोकांची माफी मागावी,’’ अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, राहुल गांधी यांनी या घटनेबद्दल ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. (A war of words)
एक्सवरील सोशल मीडिया पोस्टमध्ये राहुल म्हणाले, ‘‘सत्य आणि अहिंसा जिंकते, खोटेपणा आणि हिंसाचार टिकूच शकत नाही.’’
‘‘तुम्हाला कितीही प्रहार करायचे असतील ते करा, तोडा – आम्ही सत्य आणि संविधानाचे रक्षण करत राहू. सत्याचाच विजय होतो,’’ असे त्यांनी पुढे म्हणाले. याव्यतिरिक्त, काँग्रेस नेते पवन खेरा म्हणाले की, पंतप्रधानांविरुद्धची अपमानजनक टिप्पणी ‘‘भाजप एजंट्स’’ ने आमच्या यात्रेवरून लक्ष विचलित करण्यासाठी केली आहे.