Home » Blog » Tharoor slams Trump: काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण होण्याचा धोका

Tharoor slams Trump: काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण होण्याचा धोका

काँग्रेस नेते शशी थरूर यांची ट्रम्प यांच्या टिप्पण्यांवर टीका

by प्रतिनिधी
0 comments
Tharoor slams Trump

नवी दिल्ली : काँग्रेस नेते शशी थरूर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-पाकिस्तान तणावावरील अलिकडच्या टिप्पण्यांवर टीका केली आहे. या टिप्पण्या भारतासाठी ‘‘खूप निराशाजनक’’ आहेत. किंबहुना, त्यामुळे काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण होण्याचा धोका आहे, अशी भीतीही थरूर यांनी व्यक्त केली आहे. (Tharoor slams Trump)

संघर्ष थांबवला नाही तर दोन्ही देशांदरम्यानचा (भारत-पाकिस्तान) व्यापार थांबवू, असा इशारा मी दिला होता. त्यामुळे दोन्ही देशांनी संघर्ष थांबवला, अशा अर्थाची टिप्पणी ट्रम्प यांनी केली होती.

ट्रम्प यांच्या वक्तव्याचा चार प्रमुख मुद्द्यांच्या आधारे थरूर यांनी समाचार घेतला आहे. तशी पोस्ट त्यांनी ‘एक्स’वर केली आहे.

थरूर यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये इशारा दिला आहे की ट्रम्प यांच्या टिप्पण्यांमुळे भारताने अनेक दशके खपून मिळवलेल्या राजनैतिक प्रगतीला उलटे फिरवण्याचा धोका आहे. (Tharoor slams Trump)

थरूर यांच्या मते, ‘‘ते (अमेरिका आणि ट्रम्प) पीडित आणि गुन्हेगार यांना एकाच मापात जोखत आहेत. सीमापार दहशतवादाशी पाकिस्तानच्या संबंधांविरुद्ध असलेल्या स्वत:च्या अढळ भूमिकेकडे अमेरिका दुर्लक्ष करते.’’

दुसरे म्हणजे, ‘‘या वक्तव्यांमुळे पाकिस्तानला वाटाघाटीसाठी एक अयोग्य चौकट मिळाली आहे. ते पाकिस्तानला वाटाघाटीसाठी एक चौकट देते जी त्याने निश्चितच मिळवलेले नाही. भारत कधीही दहशतवाद्यांशी वाटाघाटी करणार नाही.”

थरूर म्हणाले की, या विधानांमुळे काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण होण्याचा धोका आहे, जो दहशतवादी उद्दिष्टांमध्ये भूमिका बजावतो. “तिसरे म्हणजे, ते दहशतवाद्यांचे स्पष्ट उद्दिष्ट असलेल्या काश्मीर वादाचे ‘आंतरराष्ट्रीयीकरण’ करते. भारताच्या दृष्टीने ही अंतर्गत बाब आहे. भारताने कधीही पाकिस्तानसोबतच्या समस्यांवर कोणत्याही परदेशी देशाची मध्यस्थी करण्याची विनंती केलेली नाही आणि करण्याची शक्यताही नाही.” (Tharoor slams Trump)

ट्रम्प यांच्या विधानामुळे भारत आणि पाकिस्तानला राजनैतिकदृष्ट्या समान मानण्याच्या जुन्या पद्धतीकडे परत जाण्याचा धोका आहे. “आणि चौथे, ते जागतिक कल्पनेत भारत आणि पाकिस्तानला ‘पुन्हा जोडते.’ गेल्या अनेक दशकांपासून, जागतिक नेत्यांना भारताच्या भेटींना पाकिस्तानच्या भेटींशी जोडू नये असे प्रोत्साहन दिले जात आहे. २००० मध्ये राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांच्या भेटीपासून कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने असे केले नाही. पण ट्रम्प यांच्या टिप्पण्यांमुळे एक मोठे पाऊल मागे पडलेले आहे.’’ अशी टीका थरूर यांनी केली आहे.

ट्रम्प यांनी काय म्हटले?

व्यापार संधी रोखण्याची धमकी देऊन तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांवर दबाव आणला असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले होते. ‘‘मी म्हणालो, ‘चला, आम्ही तुमच्यासोबत खूप व्यापार करणार आहोत. चला ते (संघर्ष) थांबवूया. जर तुम्ही थांबवले तर आम्ही व्यापार करू आणि थांबवले नाही तर आम्ही कोणताही व्यापार करणार नाही.’ आणि अचानक ते म्हणाले, ‘मला वाटते की आम्ही थांबवू,’ आणि त्यांनी ते केले आहे,’’ असे ट्रम्प म्हणाले होते.

हेही वाचा :
‘लष्कर’च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा
युद्ध म्हणजे सिनेमा नव्हे

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00