जमीर काझी : मुंबई : ‘ कैसे हराया…..?’आणि पुरा मुंब्रा हरा करेंगे ” या दोन उपरोधिक टोल्यामुळे केवळ राज्यातच नव्हे तर पूर्ण देशात चर्चेत आलेल्या मुंब्रा महापालिकेतील एमआयएम पक्षाची नवनियुक्त नगरसेविका सहर शेख हिला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. मुंब्र्याचा रंग तिरंगा असून तो कायमच तिरंगा राहील, असे सांगत बालिश वक्तव्यावर बोलणे योग्य नाही, असे सांगितले.
जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुकीचे तिकीट नाकारल्याने अखेरच्या क्षणी एमआयएममधून उमेदवार मिळवित सहर शेख हिने आपल्यासह पॅनेल मधील पक्षाचे चारही जणांना निवडून आणले. त्याबद्दल झालेल्या विजयी रॅली मध्ये त्यांनी आव्हाड यांना उद्देशून कैसे हराया…?, असे म्हणत हिणवले होते. तर त्यानंतर येत्या पाच वर्षात मुंब्रा हिरवा करू, असे वक्तव्य केले. त्यामुळे भाजपाकडून त्याच्या या विधाना विरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने राज्यात हा विषय चर्चेचा विषय ठरला. (Jitendra Awhad’s response)
मात्र आव्हाड यांनी त्याबद्दल काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विजयी नगरसेववकांची रॅली काढण्यात आली. यावेळी आव्हाड यांनी सहर शेखच्या हिला एक लहान मुलगी म्हणत तिचे वक्तव्य बालिशपणाचे असल्याचेही सांगितले. ते म्हणाले, ‘मुंब्रा हा तिरंगा आहे, इथे तिरंगाच राहणार आज काल प्रत्येक गल्लीबोळात ही घोषणा असते, हे नवीन पोरं जे असतात ते अशा कल्पक घोषणा करतात. काहींनी आव्हान दिले. ते त्यांचे काम असते. आपण त्यासाठी काही करत नाही, आपण आपल्या मनाप्रमाणे वागत असतो, असे म्हणत या वक्तव्यावर अधिक बोलणे आव्हाड यांनी टाळले. तसेच, ‘हाथी चले अपली चाल, कुत्ते भोके हजार’ म्हणत असे एखादी लहान पोरगी मिश्किलपणाने बोलते तर तिचं फार म्हणजे सोशल मीडियावरती तिच्या बालिशपणाची क्रेझ आहे, तिच्या त्या वक्तव्याला खूप काही अर्थ नाही. म्हणजे माझी लहान पोरगी हसत हसत म्हटली… चॉकलेट लाया.. तर तेही गाजेल त्यात काय विशेष नाही, असा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं. तसेच, मुंब्रा तिरंगा है, हा देश तिरंगा आहे, हा महाराष्ट्र तिरंगा आहे आणि मुंब्रा तिरंगा आहे. संविधानाने तिरंगा रंग दिलाय, तुम्ही कुठल्याही एका रंगाची मोनोपॉली या देशात आणू शकत नाही. असेही त्यांनी सांगितले. (Jitendra Awhad’s response)