मुंबई : विशेष प्रतिनिधी : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेले तथाकथित आरोपपत्र हे राजकीय षड्यंत्र आहे. गांधी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भाजपाकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. ईडी ही मोदी-शाह यांची वसुली गँग आहे आणि त्यांच्या आरोपपत्राला काँग्रेस भीक घालत नाही, असा हल्लाबोल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया आणि पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी सोमवारी (२१ एप्रिल) केला. (Congress slams BJP)
राजीव गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना ईडीच्या कारवाईवर भाजपावर तोफ डागली. ते म्हणाले की, नॅशनल हेरॉल्ड ही संस्था ना नफा तत्त्वावर चालते. या संस्थेच्या माध्यमातून कोणताही आर्थिक लाभ झालेला नाही, संस्थेतून एक पैसा किंवा मालमत्ता हस्तांतरित केलेली नाही. तरीही मनी लाँडरिंगचे आरोप लावले आहेत. बॅलन्स शीट कर्जमुक्त करण्यासाठी कर्जाचे इक्विटीमध्ये रूपांतर केले जाते. ही एक सामान्य आणि पूर्णपणे कायदेशीर पद्धत आहे. जेव्हा पैसेच नसतील, तेव्हा लाँडरिंग कुठे आहे? मोदी सरकार ईडीचा गैरवापर विरोधकांवर सूड उगवण्यासाठी करत आहे. (Congress slams BJP)
ईडी प्रकरणांमध्ये शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त १% आहे. ईडीने नोंदवलेल्या राजकीय प्रकरणांपैकी ९८% प्रकरणे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आहेत याकडे लक्ष वेधत खेरा म्हणाले, भाजपा सरकारने आम्हाला कितीही गप्प करण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही गप्प बसणार नाही. जे इतरांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात ते स्वतः घाबरतात. हे एक राजकीय षड्यंत्र आहे आणि काँग्रेस पक्ष त्याचा सामना करेल. शेवटी विजय सत्याचा विजय होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रॅम्प यांना जेवढे घाबरतात तेवढेच ते वस्तुस्थितीला घाबरतात. ९ एप्रिलपर्यंत आरोपपत्र दाखल केले नसते तर हे प्रकरण संपले असते म्हणून शेवटच्या दिवशी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले. ईडी कसे काम करते हे देशाने पाहिले आहे. महाराष्ट्रातील भाजपा युती सरकारमध्ये आज जे अर्थमंत्री आहेत त्यांच्यावर पंतप्रधान मोदींनीच ७० हजार कोटी रुपयांचा आरोप केला होता आणि त्याच व्यक्तीला सत्तेत सहभागी करून तिजोरीच्या चाव्या हाती दिल्या, असेही खेरा यांनी सांगितले.
यावेळी मुंबई काँग्रेस अध्यक्षा खा. वर्षा गायकवाड, प्रवक्ते चरण सप्रा,सुरेशचंद्र राजहंस, निजामुद्दीन राइन, आनंद शुक्ला, बब्बू खान व अर्शद आझमी उपस्थित होते.
हेही वाचा :
अमेरिकेत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घोटाळ्याची चर्चा
कुरूंदकरने वूडकटरने केले होते अश्विनींच्या मृतदेहाचे तुकडे