Home » Blog » Prisoners ran away: भूकंप झाला आणि दोनशे कैदी पळाले

Prisoners ran away: भूकंप झाला आणि दोनशे कैदी पळाले

by प्रतिनिधी
0 comments
Prisoners ran away

कराची : सोमवारी रात्री दक्षिण पाकिस्तानातील कराची शहरातील एका तुरुंगातून २०० हून अधिक कैदी पळून गेले. भूकंपांच्या धक्क्यानंतर कैद्यांना कोठडीतून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली होती, परंतु त्यांनी तुरुंग रक्षकांवर हल्ला केला, असे स्थानिक अधिकारी आणि पोलिसांनी सांगितले. (Prisoners ran away)

भूकंपाच्या धक्क्यांमुळे शेकडो कैद्यांना जिल्हा मालीर तुरुंगाच्या पटांगणात आणण्यात आले होते. त्यानंतर रात्र होताच कैदी तुरुंगातून पळून जाऊ लागले. मंगळवारी पहाटेपर्यंत हा प्रकार सुरू होता, असे प्रांतीय कायदा मंत्री झिया-उल-हसन लांजर यांनी मंगळवारी (३ जून) पत्रकारांना सांगितले. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

पोलिसांनी सांगितले की, कैद्यांनी तुरुंगातील कर्मचाऱ्यांकडून बंदुका हिसकावून घेतल्या. निमलष्करी सैनिकांवर रोखत त्यांनी मुख्य गेट उघडण्यास भाग पाडले. प्रांतीय पोलिस प्रमुख गुलाम नबी मेमन यांनी सांगितले की, या घटनेवेळी किमान एक कैदी ठार झाला आणि तीन रक्षक जखमी झाले. ‘‘मी बराच वेळ गोळीबार ऐकला आणि नंतर काही वेळाने कैदी चोहोबाजूंनी पळून गेले,’’ असे तुरुंगाच्या समोरील निवासी संकुलात राहणाऱ्या बख्श नावाच्या खाजगी सुरक्षा रक्षकाने रॉयटर्सला सांगितले. (Prisoners ran away)

त्यांनी असेही सांगितले की, काही कैदी अपार्टमेंट संकुलात घुसले. नंतर पोलिसांनी त्यांना पकडले.

मंगळवारी, तुरुंगाला भेट दिलेल्या रॉयटर्सच्या एका पत्रकाराने तुटलेल्या काचा आणि खराब झालेले इलेक्ट्रॉनिक उपकरणे पाहिली. कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी असलेल्या बैठकीच्या खोलीची तोडफोड करण्यात आली होती. या खोलीबाहेर चिंताग्रस्त कुटुंबातील सदस्य जमले होते.

तुरुंगातून पळून जाण्याची ही घटना पाकिस्तानातील आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या घटनांपैकी एक आहे, असे मंत्री लांजर म्हणाले. हा तुरूंग पाकिस्तानातील सर्वांत मोठ्या तुरूंगांपैकी एक आहे. येथे ६,००० कैदी ठेवण्याची व्यवस्था आहे. ते मालीर जिल्ह्यात आहे.

कैदी रात्रभर परिसरात धावत होते, त्यापैकी काही अनवाणी होते, पोलिस त्यांचा पाठलाग करत होते, असे स्थानिक टीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. पळून गेलेल्यांपैकी सुमारे ८० जणांना पकडण्यात आले आहे, असे प्रांतीय मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी सांगितले.

तुरुंग अधीक्षक अर्शद शाह यांनी पत्रकारांना सांगितले की रात्रीच्या वेळी २८ तुरुंग रक्षक ड्युटीवर होते. आणि ‘‘एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या कैद्यांपैकी फक्त काही जण पळून गेले,’’ तुरुंगात सुरक्षा कॅमेरे नव्हते, असे त्यांनी सांगितले. (Prisoners ran away) प्रांतीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तुरुंग अधिकाऱ्यांनी कैद्यांना त्यांच्या कोठडीतून बाहेर पडण्याची परवानगी देणे ही चूक होती.पळून गेलेल्या कैद्यांनी शरण यावे, अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

हेही वाचा :
दिलगिरी व्यक्त करा; कोर्टाची कमल हासन यांना सूचना
राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00