Home » Blog » Uddhav opposes Hindi: हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही

Uddhav opposes Hindi: हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही

त्रिभाषा सूत्राला तीव्र विरोध : उद्धव ठाकरे

by प्रतिनिधी
0 comments
Uddhav oppose Hindi

मुंबई : महाराष्ट्रावर हिंदी भाषेची सक्ती कदापी खपवून घेणार नाही. आमचा पक्ष इतर भाषांचा आदर करतो, तथापि हिंदी लादता कामा नये, अशी भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (१९ एप्रिल) बोलून दाखवली. (Uddhav opposes Hindi)

त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून महाराष्ट्रावर अनावश्यकरित्या हिंदी लादण्यात येत आहे. आमच्या पक्षाला हिंदी भाषेचा तिटकारा नाही परंतु राज्याच्या अभ्यासक्रमात तिचा समावेश करण्याची गरज आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ठाकरे यांनी विद्यार्थ्यांवर हिंदीची सक्ती का केली जात आहे असा प्रश्न उपस्थित केला. तसेच आमचा पक्ष भाषेचा आदर करत असला तरी, या निर्णयामुळे स्थानिक भाषा आणि संस्कृतीला धक्का बसू नये, असे ठाकरे म्हणाले. (Uddhav opposes Hindi)

राज्यातील सरकारी शाळांसाठी त्रिभाषिक धोरण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी  मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तिन्ही भाषा अनिवार्य करण्यात आल्या आहेत. इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमात कोणताही बदल झालेला नाही, तर हा नवीन नियम २०२४ साठी सुधारित राज्य अभ्यासक्रम आराखड्याशी (SCF) सुसंगत आहे.

शिक्षण विभागाने म्हटले आहे की नवीन धोरणाची अंमलबजावणी २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. त्याचा उद्देश एकात्मिक एनसीईआरटी आणि राज्य मंडळ अभ्यासक्रम समाविष्ट करून शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे आहे. दरम्यान, पुणे शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष नितीन मेमाणे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी या बदलाचे समर्थन केले. तसेच हा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक सुधारणांशी सुसंगत आहे. स्पर्धात्मक परीक्षा संसाधनांमध्ये प्रवेश वाढवून विद्यार्थ्यांना, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फायदा होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. (Uddhav opposes Hindi)

तीन भाषांची सक्ती

शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या नवीन धोरणात मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी ही तिसरी भाषा म्हणून शिकवण्याची तरतूद करण्यात आली आहे. या पूर्वी फक्त दोन भाषा शिकण्याची सक्ती होती. त्या पद्धतीपेक्षा ही पद्धत लक्षणीयरीत्या वेगळी आहे. टीकाकारांच्या मते, हा निर्णय प्रादेशिक भाषेच्या प्राधान्यांकडे दुर्लक्ष करतो. तसेच या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अनावश्यक ओझे लादले जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मतप्रदर्शन केले.

हेही वाचा :

हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा भाजपचा अजेंडा

You may also like

error: Content is protected !!