नवी दिल्ली : भारत सरकारने तैवानबाबतचे आपले धोरण बदललेले नाही, मंगळवारी (१९ ऑगस्ट) स्पष्ट केले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने असा दावा करण्यात आला होता की परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या बैठकीत तैवान चीनचा आहे असे म्हटले होते. त्यावर भारत सरकारने स्पष्ट केले. (India on Taiwan)
सोमवारी संध्याकाळी (१८ ऑगस्ट) मंदारिन चिनी भाषेत जारी केलेले हे निवेदन मंगळवारी (१९ ऑगस्ट) इंग्रजीतही प्रसिद्ध झाले. परराष्ट्र मंत्रालयाने कोणतेही निवेदन जारी केले नाही किंवा चीन सरकारच्या या भाष्याचा अधिकृतपणे इन्कारही केला नाही. (India on Taiwan)
मंगळवारी मात्र (१९ ऑगस्ट) सरकारने तैवानबाबतचे आपले धोरण बदललेले नाही यावर जोर दिला.
२०२१ नंतर चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पहिल्याच भारत दौऱ्यात आणि ३१ ऑगस्ट २०२५ रोजी तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन दौऱ्यापूर्वी, या टिप्पणीवरून झालेले मतभेद हा एक वेगळाच मुद्दा पुढे आला. (India on Taiwan)
“परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, दोन्ही देशांच्या नेत्यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली, भारत-चीन संबंध पुढे जात आहेत. आता ते सुधारत आहेत आणि विकसित होत आहेत. दोन्ही बाजूंमधील देवाणघेवाण आणि सहकार्य सामान्यीकरणाकडे वाटचाल करत आहे,” असे बीजिंगमध्ये जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. “स्थिर, सहकार्यात्मक आणि दूरदृष्टी असलेले भारत-चीन संबंध दोन्ही देशांच्या हिताचे आहेत. तैवान हा चीनचा भाग आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.