नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी सोमवारी (२१ जुलै) रात्री उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी आरोग्यविषयक कारण सांगितले आहे. आरोग्याची समस्या असल्याने वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्याची गरज असल्याचे त्यात त्यांनी म्हटले आहे.(Dhanakad resigns)
राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन “आरोग्यसेवेला प्राधान्य” देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “आरोग्यसेवेला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी संविधानाच्या कलम ६७(अ) नुसार तत्काळ प्रभावाने भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे. (Dhanakad resigns)
धनखड यांनी राष्ट्रपतींच्या “अटल पाठिंब्याबद्दल” कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. आपल्या कार्यकाळात पंतप्रधानांचा अमूल्य पाठिंबा मिळाला, असे त्यांनी म्हटले आहे.(Dhanakad resigns)
धनखड यांचे राजीनामा पत्र
सर्व माननीय संसद सदस्यांकडून मला मिळालेली मायेची उब, विश्वास आणि प्रेम नेहमीच माझ्या स्मृतीत राहील आणि माझ्या आठवणीत राहील, असे त्यांनी आपल्या कारकीर्दीविषयी म्हटले आहे. आपल्या कार्यकाळात भारताची उल्लेखनीय आर्थिक प्रगती आणि अभूतपूर्व विकास पाहणे हा एक संस्मरणीय अनुभव होता. पदभार सोडताना, त्यांनी देशाच्या भविष्यावर “अटल विश्वास” व्यक्त केला आणि भारताच्या जागतिक उदयाला “अभूतपूर्व” म्हटले आहे.
मेन स्टोरी
Lok Sabha adjourned : ऑपरेशन सिंदूरवर चर्चेसाठी विरोधक आक्रमक; लोकसभा तहकूब
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली. त्यामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारी (२१ जुलै) दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिलाच दिवस होता. मात्र चर्चेची मागणी विरोधकांनी जोरदारपणे लावून धरल्यामुळे दिवसभर कामकाज तहकूब करावे लागले. (Lok Sabha adjourned)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये शस्त्रविराम घडवून आणल्याचा दावा केला होता. त्या दाव्यावरुन लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीकडे विरोधकांचा गदारोळ झाला. दोन्ही सभागृहाचे कामकाज सुरु झाली तेव्हा पहलगाम अतिरेकी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमध्ये लागू करण्यात आलेल्या एसआयएआरवर चर्चा करा ही मागणी विरोधकांनी केली आणि हंगामा करण्यास सुरुवात केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षातील सदस्यांना प्रश्नोत्तराचा तास चालू द्या अशी विनंती केली. मात्र विरोधकांनी घोषणा सुरु ठेवल्या आणि ते सगळे वेलमध्येच उभे होते. त्यामुळे कामकाज तीनदा तहकूब करावे लागले. चौथ्यांदा कामकाज सुरू झाले तेव्हाही विरोधकांनी याच मुद्द्यावर चर्चेचा आग्रह धरला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केल्याची घोषणा अध्यक्षांनी केली. (Lok Sabha adjourned)
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ले केले. त्यावर चर्चा करण्याच्या मागणीवर विरोधी पक्षांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली.
त्यामुळे सभागृह वारंवार तहकूब करावे लागले. तिसऱ्या तहकूबानंतर दुपारी ४ वाजता सभागृह पुन्हा सुरू होताच, अध्यक्षस्थानी असलेले दिलीप सैकिया यांनी सदस्यांना गोवा विधानसभेच्या जागांच्या पुनर्समायोजनावरील विधेयक मांडण्यास परवानगी देण्याची विनंती केली. (Lok Sabha adjourned)
तत्पूर्वी, दुसऱ्यांदा तहकूब झाल्यानंतर दुपारी २ वाजता सभागृहाची बैठक झाली तेव्हा अध्यक्षांनी विरोधी सदस्यांना सभागृहाचे कामकाज सुरू ठेवण्याचे आवाहन केले. सततच्या घोषणाबाजीदरम्यान, संध्या रे यांनी कामकाज दुपारी ४ वाजेपर्यंत तहकूब केले.
सभागृहाचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या जगदंबिका पाल यांनी सदस्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी भाषण केले. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हस्तक्षेप केला. सभागृहाचे उपनेते असलेले श्री. सिंह यांनी सांगितले की, अध्यक्षांनी निर्णय घेतल्यास सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे. तथापि, विरोधी सदस्यांनी चर्चेची मागणी लावून धरली. (Lok Sabha adjourned)
पुन्हा कामकाज सुरू झाल्यानंतर, सभागृहाने आयकर विधेयक, २०२५ वरील निवड समितीचा अहवाल मांडला. भाजप खासदार बैजयंत पांडा यांनी सध्याच्या सहा दशकांच्या जुन्या कायद्यात बदल करण्यासाठी २८५ सूचनांचा अहवाल मांडला.
अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमान AI171 च्या अपघातासह इतर शोकसंदेशांचा सभागृहात उल्लेख झाल्यानंतर, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी वेलमध्ये येत पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी केली. यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी नियमांनुसार चर्चा होईल, असे सांगितले.
दुसरीकडे राज्यसभेतही अशीच परिस्थिती होती. प्रश्नोत्तराचा तास सुरू करण्यासाठी राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगे आणि इतर विरोधी पक्षातील खासदारांनी ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा करा अशी मागणी केली. नियम २६७ च्या अंतर्गत चर्चा करा अशी विनंतीही केली.
उपसभापती हरिवंश यांनी विरोधकांना सभागृहाचे कामकाज सुरू करण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले, परंतु घोषणाबाजी सुरूच राहिली. विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केल्याने सभागृहाचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केले. श्री. धनखड यांनी कामकाज पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले, परंतु विरोधी पक्ष आक्रमक राहिले. “सरकार व्यापक चर्चेसाठी तयार आहे. मी नेत्यांशी भेटून चर्चेसाठी तोडगा काढेन. आणि तुम्हाला हवा तितका वेळ मी पूर्ण चर्चा सुनिश्चित करेन,” असे धनखड म्हणाले. सोमवार (२१ जुलै, २०२५) पासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकार ऑपरेशन सिंदूरसह संसदेत सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्याच वेळी, या विषयावरील कोणतीही चर्चा निर्धारित नियम आणि प्रक्रियांमध्येच झाली पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला.
सदन में सरकार के लोगों को बोलने देते हैं, लेकिन अगर विपक्ष कुछ बोलना चाहता है तो उन्हें इजाजत नहीं है।
— Congress (@INCIndia) July 21, 2025
मैं नेता विपक्ष हूं, सदन में बोलना मेरा हक है, लेकिन मुझे भी बोलने नहीं देते हैं।
: नेता विपक्ष श्री @RahulGandhi pic.twitter.com/IdDJFdmCwW
SC slams ED : ईडी सर्व मर्यादा ओलांडतेय; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सर्व मर्यादा ओलांडत आहे, असे निरीक्षण सरन्यायाधीश बी. आर. गवई यांनी सोमवारी (२१ जुलै) नोंदवले. (SC slams ED)
ईडीविरूद्ध आधीच मोठ्या प्रमाणात आक्षेप घेण्यात येत आहेत. त्याला चालना देणारे कोणतेही “सामान्य” निरीक्षण करू नये, असे आवाहन सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला केले असतानाच न्या. गवई यांनी हे निरीक्षण नोंदवले.
अरविंद दातार आणि प्रताप वेणुगोपाल या दोन वरिष्ठ वकिलांना व्यावसायिक सल्ला दिल्याबद्दल ईडीने समन्स बजावले आह. याची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत सु – मोटो दाखल करून घेतलेल्या खटल्याची सुनावणी झाली. यावेळी मुख्य न्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांचा समावेश असलेल्या खंडपीठ आणि सॉलिसिटर जनरल मेहता यांच्यात शाब्दिक चकमक झाली. (SC slams ED)
‘‘आपण जे केले ते निश्चितच चुकीचे आहे याची जाणीव ईडीला झाली आहे,’’ असे अॅटर्नी जनरल आर. वेंकटरमणी यांनी सौम्य स्वरात सांगितले. तसेच दोघा वकिलांना बजावलेले समन्स नंतर मागे घेण्यात आल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
या सुनावणीदरम्यान, ‘‘तुमचे अधिकारी सर्व मर्यादा ओलांडत आहेत,’’ असे मुख्य न्यायाधीश गवई यांनी श्री. वेंकटरमणी यांना उद्देशून म्हटले. (SC slams ED)
त्यावर मेहता यांनी हस्तक्षेप करत, जरी या प्रकरणात दोन्ही वकिलांना समन्स बजावायला नको होते, तरी न्यायालयाकडून अशा निरीक्षणांचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची आणि एक संस्था म्हणून ईडीविरुद्ध वापर होण्याची शक्यता आहे, असे न्यायालयाला सांगितले.
‘‘असे असले तरी ईडी अनेक प्रकरणांमध्ये मर्यादा ओलांडत आहे असे आम्हाला आढळले आहे, असे उत्तर सीजेआयने मेहता यांना दिले.
सॉलिसिटर जनरल म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय सुनावणीसाठी केस घेण्यापूर्वीच ईडीविरूद्ध कथा रचल्या जातात. ‘‘उदाहरणार्थ, मी ३,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सहभागी असलेला राजकारणी आहे. अशावेळी मी अनेक मुलाखतींद्वारे [ईडीबद्दल] खोटे कथानक तयार करू शकतो,’’ असे मेहता यांनी स्पष्ट केले. (SC slams ED)
त्यावर, न्यायालयाला ईडीच्या प्रकरणांमध्ये राजकीय प्रभाव असलेल्या जमिनीवरील वास्तवाची जाणीव आहे, असे स्पष्ट शब्दांत मुख्य न्यायाधीशांनी सूचित केले. ‘‘अशी काही प्रकरणे आहेत ज्यात उच्च न्यायालयाने योग्य आदेश दिल्यानंतरही ईडी अपील दाखल करते. हे केवळ अपील दाखल करण्यासाठी केले जाते,’’ असे मुख्य न्यायाधीश गवई यांनी निदर्शनास आणून दिले.
मेहता यांनी उत्तर दिले की, ‘‘या जमिनीवरील वास्तवांना नंतर प्रकरणातील तथ्ये आणि पुराव्यांवरून दाखवावे लागते. व्यापक निरीक्षणे चुकीचा संदेश देतात.’’
न्यायमूर्ती चंद्रन यांनी मेहता यांना या “कथा” न्यायालयावर कसा प्रभाव पाडतात हे सांगू शकता का, असा प्रश्न केला.
“जर आपल्याला त्या अजिबात दिसत नसतील तर या कथनांचा आपल्यावर कसा प्रभाव पडेल असे तुम्हाला वाटते? कथा होत राहतील, परंतु त्यांचा प्रभाव पडेल असे तुम्ही गृहीत धरू शकत नाही,” न्यायाधीशांनी श्री. मेहता यांना सांगितले.
न्यायालयाने बाह्य प्रभावाच्या आधारे न्यायालयीन निर्णय दिला होता अशा घटनेचा पुरावा सादर करण्यास मुख्य न्यायाधीशांनी श्री. मेहता यांना सांगितले.
त्यानंतर मेहता यांची भाषा सौम्य झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचे विधानसभेतील गटनेते जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वादामुळे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे धिंडवडे निघाले आहेत, ही गोष्ट खरीच. परंतु ती गोष्ट तेवढ्यापुरती मर्यादित नाही. लोकप्रतिनिधींचा वर्तनव्यवहार, सत्तेचा माज आणि विधिमंडळासारख्या लोकशाहीच्या मंदिराचे संचलन करणाऱ्यांचा पक्षपाती व्यवहार अशा सगळ्याच गोष्टी यात मिसळल्या आहेत. या सगळ्या प्रकाराला दोन आमदारांमधील किंवा त्यांच्या समर्थकांमधील वाद असे सरधोपटपणे म्हणणे कुणावर तरी अन्याय केल्यासारखे आणि कुणाचा तरी बचाव केल्यासारखे होईल. आतापर्यंत हा विषय तुकड्या तुकड्यांनी समोर आला आहे. त्यामुळे अनेक गैरसमज झाले आहेत. म्हणूनच या प्रकरणाची क्रोनॉलॉजी समजून घ्यायला हवी. (Awhad-Padalkar)
-डॉ. विजय चोरमारे
जितेंद्र आव्हाड किंवा गोपीचंद पडळकर यांचा राजकीय भूतकाळ काय, त्यांची विचारसरणी काय वगैरे तपशीलात आता जाण्याचे कारण नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनाही विधिमंडळाची अप्रतिष्ठा झाली असे वाटते, त्या प्रकरणापुरतेच आपण बोलणार आहोत. ही अप्रतिष्ठा केवळ पडळकर आणि आव्हाड यांच्यामुळे झाली, की राहुल नार्वेकर आणि राम शिंदे आणि विधिमंडळ प्रशासनामुळेही झाली, याचाही ऊहापोह करण्याची गरज आहे. (Awhad-Padalkar)
विषय सुरू कुठून झाला?
हा विषय सुरू कुठून झाला? तर उपलब्ध माहितीनुसार जनसुरक्षा विधेयक मंजूर झाले तेव्हापासून हा विषय सुरू झाला. त्यादिवशी पडळकर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना तिथून जाणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून त्यांनी अर्बन नक्षल वगैरे टिप्पणी केल्याचे सांगतात. परंतु हा भाग ठळकपणे पुढे येत नाही. जितेंद्र आव्हाड विधानभवनाच्या रेड कार्पेटवरून चालताना, ‘मंगळसूत्र चोराचा…’ अशा घोषणा देत चालले आहेत, इथून या प्रकाराची सुरुवात झाल्याचे दिसते. परंतु ती आव्हाड यांची प्रतिक्रिया होती. पडळकर यांनी जनसुरक्षा विधेयसासंदर्भात बोलताना त्यांना उद्देशून अर्बन नक्षल अशी टिपणी केली होती, त्याची प्रतिक्रिया होती. अर्थात पडळकर यांच्यासारख्या नवख्या आमदाराला जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या सहा टर्मच्या आमदाराने महत्त्व द्यावे का, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. एखादा माणूस आपले वय, उंची, पद या कशाचाच विचार न करता मोकाट सुटल्यासारखा कुणावरही काहीही बोलत सुटतो. विरोधकांबद्दल अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरतो. सभागृहात पीठासीन अधिकाऱ्याला नडतो. आपल्याच सरकारच्या मंत्र्यांना नडतो. सुरक्षा व्यवस्थेला फाट्यावर मारून रेकॉर्डवरचे गुन्हेगार विधानभवनाच्या आवारात घेऊन येतो. आणि हे सगळे तो कशाच्या बळावर करतो, तर त्याला माहिती असते दुसरे कुणीही आपल्याइतक्या खालच्या पातळीवर उतरू शकत नाही. आपल्यासारखी टपोरीगिरी करू शकत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण खून केला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या केसाला धक्का लागू देणार नाहीत, असा विश्वास त्याला असल्यामुळेच. कुठे याच्या नादाला लागून घाणीत दगड मारायचा म्हणून विरोधी पक्षातले लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आले. त्यामुळे पडळकर जितेंद्र आव्हाडांच्या नादाला लागायला गेले. तिथेच ते फसले. आव्हाडांनी स्वतः नियमांच्या चौकटीत वागत त्यांना जशास तसे उत्तर दिले. आव्हाडांनी विधानभवनाच्या आवारातील नियमांचे उल्लंघन केले नाही. त्याचमुळे ते कारवाईच्या कचाट्यात सापडू शकले नाहीत. पडळकर त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकत गेले. परिणामी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी वाघाचे मांजर झालेले पाहायला मिळाले. (Awhad-Padalkar)
आव्हाडांचा जुना किस्सा
जितेंद्र आव्हाड काय आहेत, हे समजावे म्हणून आव्हाडांचा एक जुना किस्सा मुद्दाम सांगावासा वाटतो.
१९९९ ची घटना आहे. शिवसेना-भाजप युतीची सत्ता गेली आणि पुन्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. सत्ता गेल्यामुळे नारायण राणे पिसाटल्यासारखे झाले होते. विधिमंडळात आणि बाहेरही शिवसेना स्टाईल त्यांचे राडे सुरू होते. एकदा त्यांनी आणि शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाचे प्रवेशद्वारच रोखले. सत्ताधाऱ्यांना सभागृहात जाऊ द्यायचे नाही असे ठरवले. सत्ताधारी पेचात पडले होते. तेव्हा असा काही प्रकार घडल्याचे ठाण्यात कळले. ठाण्यातून जितेंद्र आव्हाड कार्यकर्ते घेऊन आले. त्यांनी पुढाकार घेतला आणि विरोधकांना तुडवत सत्ताधारी आमदार, मंत्री विधानभवनात गेले. ठाण्यात एकदा मोठी दंगल झाली असताना प्रचंड तणाव असताना आणि पोलिस नको म्हणत असताना आव्हाड एकटे दंगलग्रस्त गल्लीत गेले आणि तिथल्या लोकांशी बोलले. ठाण्याच्या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसेचे उदात्तीकरण केल्याचे कळल्यावर फक्त एका नगरसेवकासोबत संमेलनस्थळी येऊन स्मरणिकेची होळी केली होती. (Awhad-Padalkar)
वाढत्या वयाबरोबर त्यांनी अधिक प्रगल्भपणे वागायला पाहिजे, असे त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत असते. परंतु प्रगल्भ म्हणजे तडजोडवादी का, असा त्यांचा प्रश्न असतो.
गाडीचा दरवाजा उघडताना आव्हाडांना धक्का लागणे, पडळकरांनी नेहमीच्या स्टाईलने शिविगाळ करणे इथपर्यंत ठीक होते. अर्थात शिविगाळ निषेधार्हच. पण थेट गुंडांना विधानभवनात आणून हल्ला करायला लावणे हा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातला कळसाध्याय म्हणावा लागेल. काळा अध्याय म्हणावा लागेल.
विधिमंडळातील प्रवेशासाठी पोलिसांची यंत्रणा असते. त्याचप्रमाणे विधिमंडळाची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा असते. ज्या दिवशी विधानभवनाच्या आवारात हाणामारी झाली, त्यादिवशीचा घटनाक्रम बघा.
नितीन देशमुख हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद्चंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे. तो अधिवेशन काळात विधानभवनात असतो. तो आव्हाडांचा निकटवर्तीय आहे का, तर आहे. पण तो त्यांचे शेपूट धरून फिरतो असे नाही. त्यामुळे आव्हाड जे म्हणाले की, तो माझ्यासोबत आला नव्हता, ते खरेच आहे.
गोपीचंद पडळकर यांनी आपल्यासोबत जे कार्यकर्ते आणले होते, त्यांनी विधानभवनात नितीन देशमुख याच्यावर हल्ला केला. हा हल्ला करण्यासाठीच पडळकर त्यांना आत घेऊन आले होते का, याची चौकशी झाली पाहिजे. आव्हाड यांनी केलेल्या आरोपानुसार ही मंडळी आव्हाडांवरच हल्ला करायला आली होती. या सगळ्या बाबींची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी होती. हवी आहे. अध्यक्ष आणि सभापती निष्पक्ष असते तर कदाचित ती झाली असती. परंतु आजच्या काळात त्यांच्याकडून ती अपेक्षा करणे गैर आहे. (Awhad-Padalkar)
हृषिकेश उर्फ सर्जेराव टकले हा पडळकरांचा कार्यकर्ता रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळते. अशा व्यक्तिला घेऊन आमदार विधानभवनात कसे काय येऊ शकतात, याचे उत्तर पडळकर यांनी नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला पाहिजे. (Awhad-Padalkar)
विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती आणि विधिमंडळ प्रशासन पक्षपाती आहे, असे मी म्हणतो, त्याचे कारण असे की त्यादिवशीच्या मारामारीनंतर झालेल्या कारवाया. जी गोष्ट संपूर्ण जगाने पाहिली. ती म्हणजे पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. तर ज्यांनी हल्ला केला त्यापैकी एकावरही त्यादिवशी कारवाई झाली नाही. कारवाई कुणावर झाली तर ज्याच्यावर हल्ला झाला त्याच्यावरच. हा उफराटा न्याय आहे. एकूण सगळ्यांनी मिळून कायदा धाब्यावर बसवायचे ठरवले आहे, हेच यातून दिसते.
मारामारी की हल्ला ?
प्रारंभी चित्र असे रंगवले गेले की, आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांच्याच हाणामारी झाली. तशा बातम्या चालवल्या गेल्या. त्याच सुमारास आव्हाड माध्यमांशी बोलायला बाहेर आले. त्यांनी माध्यम प्रतिनिधींकडूनच वदवून घेतले की, मारामारी नव्हे, तर पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. त्यानंतर जितेंद्र आव्हाड भडकले. जर तुम्ही विधानसभेत गुंडांना प्रवेश देणार असाल, ते आमच्यावर हल्ला करणार असतील तर आमचे लोक सुरक्षित नाहीयेत. मला शिवीगाळ केली, मारण्याची धमकी दिली, असं आव्हाड म्हणाले. हे सगळे मलाच मारण्यासाठी आले होते, असंही ते म्हणाले.
प्रसारमाध्यमांचे लोकही अत्यंत सुमार वार्तांकन करतात. सरधोपट निवेदन करतात. त्यामुळे वस्तुस्थिती लोकांसमोर येत नाही. पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, असे आव्हाडांनी माध्यम प्रतिनिधींकडून वदवून घेतले नसते, तर दोन गटात हाणामारी झाली असेच चित्र गेले असते. पडळकर आत घेऊन आलेल्या लोकांनी हल्ला केला. म्हणजे त्यासाठीच ते गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आत घेऊन आले होते. म्हणजे आता मुंबईच्या अंडरवर्ल्डसारखी अवस्था महाराष्ट्राच्या विधिमंडळाची झाली आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो.
आणि इतका गंभीर प्रकार होऊनसुद्धा केवळ दिलगिरीवर मिटवले जाते, हा तर पक्षपातीपणाचा कहर आहे.
कल्पना करा की हेच जर उलटे घडले असते तर जितेंद्र आव्हाडांची आमदारकी रद्द करण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांची मजल गेली असती. परंतु या सगळ्या प्रकरणादरम्यान त्यांनी कुठेही नियमभंग केला नाही. `मंगळसूत्र चोराचा….` या घोषणापुरतीच त्यांची कृती मर्यादित होती. त्याचे समर्थन करता येणार नाही. परंतु ती कुठेही नियमाच्या चौकटीच्या बाहेर नव्हती, त्याचमुळे सत्ताधारी या संपूर्ण प्रकरणात बॅकफूटवर दिसले.
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत विधानभवनात आलेल्या आणि नितीन देशमुखवर हल्ला करणाऱ्या लोकांना त्याच दिवशी का अटक केली नाही. त्यांना सोडून नितीन देशमुख यालाच का अटक केली, याची उत्तरे विधिमंडळ प्रशासनाने आणि पोलिसांनीही द्यायला हवीत.
एखाद्या आमदाराच्या विरोधात मग तो कुठल्याही पक्षाचा असो, कुणी बाहेरच्या व्यक्तिने ब्र जरी काढला तरी सगळी विधानसभा त्याच्याबाजूने उभी राहात असे. तो कोणत्या पक्षाचा आहे, हे पाहिले जात नसे. विधिमंडळाची ती परंपरा होती. परंतु पडळकर यांच्या एका समर्थकाने जितेंद्र आव्हाड सभागृहात असताना त्यांना मेसेज करून शिविगाळ केली. ठार मारण्याची धमकी दिली. तरीसुद्धा विधिमंडळाची कातडी थरथरली नाही. सभागृहाचे कामकाज इतके पक्षपाती बनले आहे. उगाच लोकशाहीचे मंदिर वगैरे उदात्तीकरण करण्यात काहीच अर्थ नाही.
विधिमंडळात गँगवॉर सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गँग सध्या फॉर्मात आहे. कारण आपले कुणी काही वाकडे करू शकत नाही, याची त्यांना खात्री आहे. अशा प्रवृत्तींना खतपाणी घालणारे फडणवीस वर पुन्हा राजकीय संस्कृती, सभागृहाची प्रतिष्ठा वगैरे भाषण झोडताहेत. सगळा आनंदी आनंद आहे.
हेही वाचा :
हनीट्रॅपचे धागेदारे समृद्धीच्या भ्रष्टाचारापर्यंत : सपकाळ यांचा आरोप
मोदींनी ४२ देशांना भेट दिली, पण मणिपूरला नाही : खरगेंची टीका
Sapkal slams CM : हनीट्रॅपचे धागेदारे समृद्धीच्या भ्रष्टाचारापर्यंत : सपकाळ यांचा आरोप
मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील काही अधिकारी व मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत हे सत्य आहे. त्याचे धागेदोरे समृद्धी महामार्गातील २० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारापर्यंत पोहोचलेले असून तो उघड होऊ नये म्हणून सरकारकडून तो दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी शनिवारी (१९ जुलै) केला. (Sapkal slams CM)
पावसाळी अधिवेशनात सरकारने जनतेच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम केले असल्याची टीकाही त्यांनी केली.
टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, ड्रग्जचा सुळसुळाट जोरात सरु आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी यातील एकाही प्रश्नावर ना सविस्तर चर्चा झाली ना काही निर्णय. (Sapkal slams CM)
मारामारीच्या प्रकाराला मुख्यमंत्रीच जबाबदार
हे अधिवेशन लक्षात राहिले ते फक्त विधानभवनाच्या इमारतीत झालेल्या तुंबळ हाणीमारीच्या घटनेने… रस्त्यावरील गुंड, मवाली आता थेट विधानभवनात घुसले आणि त्याला फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत. त्याला पायश्चित म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.
पेरले तेच उगवले
ते म्हणाले,’ विधिमंडळ अथवा संसदेत जनता आपले लोकप्रतिनिधी पाठवते ती त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पण अलिकडे हे चित्र बदलत चालले आहे. कालपर्यंत जे रस्त्यावर होत होते ते आज लोकशाहीच्या पवित्र मंदिरात घडले. भाजपाने ही नवी संस्कृती जाणीवपूर्वक आणली आहे. अक्कलकोटमध्ये प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या मकोकाच्या गुंडाला भाजपाचे नेतेच ‘भिवू नकोस मुख्यमंत्री तुझ्या पाठीशी आहेत’ असे सांगत आहेत. तर आमदार निवासाच्या कँन्टीमध्येही एका आमदाराने असेच ‘डब्लूडब्लूएफ’ केले. आका, कोयता गँग आता जुने झाले. भाजपाने जे पेरले तेच उगवले आहे. असा हल्लाबोल सपकाळ यांनी केला. (Sapkal slams CM)
समृद्धीत २० हजार कोटींचा भ्रष्टाचार
राज्यातील काही अधिकारी व मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकले आहेत हे सत्य आहे. मुख्यमंत्री असे काही घडलेले नाही असे म्हणत असले तरी ते नेहमीप्रमाणे खोटे बोलत आहेत. या हनीट्रॅपचे धागेदोरे समृद्धी महामार्गातील २० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारापर्यंत पोहोचले आहेत. हा घोटाळा उघड होऊ नये म्हणून तो दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, फडणवीस जे बोलले ते धादांत खोटे आहेत, असा आरोपही सपकाळ यांनी केला.
‘जनसुरक्षा’ला विरोधच
जनसुरक्षा कायद्यावर ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून यावर हरकत घेतलेली असून काँग्रेसचा या विधेयकाला विरोध आहे. या विधेयकासाठी नियुक्त केलेल्या समितीतही अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. बजरंग दल, आरएसएस या संघटनाही या कायद्याच्या कक्षेत येतात का?, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काही बोलत नाहीत, आमचा या विधेयकाला विधिमंडळाच्या आत व बाहेरही विरोधच राहील असे काँग्रेस सांगितले.
नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. त्यानंतर भारत पाकिस्तान तीव्र संघर्ष झाला. या युद्धाच्या संदर्भाने पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धात पाच जेट विमाने पाडण्यात आली असा दावा केला आहे. दोन अणवस्त्रधारी राष्ट्रे एकमेकांवर हल्ला करत असताना व्यापारी चर्चेद्वारे तणाव कमी करण्यात आला असे ट्रम्प म्हणाले. (Five jets shot down)
व्हाईट हाऊसमध्ये रिपब्लिकन खासदारासोबत एका खासगी डिनर कार्यक्रमात बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आम्ही बरीच युद्धे थांबवली. या युद्धांनी गंभीर स्वरुप् घेतले होते. भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युद्ध चालू होते. दोन्ही देश अणवस्त्रधारी आहेत. ते एकमेकांवर हल्ले करत होते. विमानातून हवेत गोळीबार होता होता. या युद्धात चार ते पाच नव्हे तर मला वाटते प्रत्यक्षात पाच जेट विमाने पाडण्यात आली. असेही ट्रम्प म्हणाले.
युद्ध उग्र रुप धारण करण्यापूर्वी आणि दोन्ही देशात तणाव कमी करण्यासाठी व्यापारी वाटाघाटीचा दावा केला. ते म्हणाले, भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरोधात वाद घालत होते. हे वाद दिवसेदिवस वाढत होते. आणि हे वाद आम्ही व्यापाराद्वारे सोडवले. आम्ही म्हणालो, तुम्हाला व्यापार करायचा आहे, असे ट्रम्प म्हणाले. जर तुम्ही शस्त्रे आणि कदाचित अणवस्त्रांचा वापर करणार असाला तर आम्ही व्यापार करार करणार नाही. (Five jets shot down)
इराणचा अणुकार्यक्रमही उद्धवस्त केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. इराणची अणु क्षमता पूर्णपणे नष्ट केली असेही ट्रम्प म्हणाले.
दरम्यान ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान युद्धात पाच जेट विमाने पाडली असा दावा केल्याने सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून हा प्रश्न उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तान युद्ध आपण थांबवले असा अनेकवेळा दावा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. संसदेत स्वत: पंतप्रधान उत्तर देतात की अन्य केंद्रीय मंत्री उत्तर देतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे. (Five jets shot down)
Raj Thackeray warns : महाराष्ट्रात मस्ती कराल, तर दणका बसणारच : राज ठाकरे
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रात राहत आहात तर शांततेत राहा आणि मराठी शिका. परंतु इथे मस्ती करणार असाल तर दणका बसणार म्हणजे बसणारच, असा इशारा मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसैनिकांनी एका अमराठी व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरुद्ध मोर्चा काढला होता. त्यानंतर मराठी मनसेच्या मराठीतच्या समर्थमनात निघणाऱ्या मोर्चाला विरोध झाल्याने संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आज राज ठाकरे यांनी मीरारोडला भेट दिली. (Raj Thackeray warns)
मीरा रोड परिसरात राज ठाकरे यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत करण्यात आले. मीरा रोडच्या नित्यानंद नगर येथील मनसेच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर सभेला संबोधित केले.
राज ठाकरे म्हणाले की, मीरा-भाईंदरला मी मुद्दाम आलो आहे. कारण त्या दिवशी मिठाईवाल्यासोबत काही तरी झालं होते. पण कानावर मराठी बसत नसेल तर कानाखाली बसणारच, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. त्यांनी असेही म्हटले की, त्या घटनेनंतर इथल्या व्यापाऱ्यांनी संप पुकारला. कुठल्या तरी पक्षाचे ऐकून हे संप वगैरे काढणार, दुकानं बंद करणार. पण दुकानं बंद करून किती वेळ राहणार? तुम्हाला काय वाटले, मराठी व्यापारी नाही का? महाराष्ट्रात राहत आहात तर शांततेत राहा आणि मराठी शिका. परंतु इथे मस्ती करणार असाल तर दणका बसणार म्हणजे बसणारच, असा इशाराही त्यांनी दिला. (Raj Thackeray warns)
राज ठाकरे म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राचा प्रचंड मोठा लढा झाला. मुंबईला महाराष्ट्रापासून बाजूला करायचा गुजराती व्यापऱ्यांचा आणि गुजराती नेत्यांचा डाव होता. वल्लभभाई पटेल यांनी मुंबई महाराष्ट्राला मिळू नये, असे म्हटले होते. त्यांना आपण लोह पुरुष मानतो. आपण त्यांना आदर्श मनात होतो, पण त्यांनी आपल्या महाराष्ट्राला विरोध केला. मोरारजी देसाई यांनी गोळीबार करून मराठी माणसाला ठार मारले होते. कारण या लोकांचा अनेक वर्षांपासून मुंबईवर डोळा आहे, असा आरोप त्यांनी केला. (Raj Thackeray warns)
मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत फ्री स्टाइल हाणामारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (१८ जुलै) महत्त्वाचे विधान केले आहे. गुरुवारी पडळकर-आव्हाड समर्थकांत झालेल्या मारहाणीनंतर राज्यातील जनतेच्या काय भावना आहेत, हेच मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. (CM expressed his anger)
ते म्हणाले, ‘‘लोक म्हणतायत, सगळे आमदार माजलेत!’’ काल येथे जे काही झाले त्यामुळे केवळ एका माणसाची प्रतिष्ठा गेलेली नाही. संपूर्ण सभागृहाच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले आहे. हे काही बरे नाही. आज बाहेर एकट्या पडळकरला शिव्या पडत नाहीत. लोक आपल्या सर्वांनाच शिव्या देत आहेत. लोक म्हणतायत की सगळे आमदार माजलेत,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात संताप व्यक्त केला. (CM expressed his anger)
गुरुवारी विधानसभेत झालेल्या राड्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि आ. जितेंद्र आव्हाड यांना सभागृहात खेद व्यक्त करण्यास सांगितले. मात्र, आव्हाड यांनी यावेळी त्यांना आलेल्या धमकीचा उल्लेख केला. त्यावर सत्ताधारी आमदारांनी आव्हाडांना रोखलं आणि मूळ विषयावर बोलण्यास सांगितले. त्यानंतर विरोधी बाकांवरील सदस्यांनी, आव्हाडांना बोलू द्या, त्यांना रोखू नका यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (CM expressed his anger)
सीसीटीव्ही फुटेज पाहून कारवाई : नार्वेकर
दरम्यान, विधिमंडळ परिसरातील हाणामारीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचा अहवाल आल्यावर हाणामारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडतील : राज ठाकरे
आमदार रोहित पवारांनी भरला पोलिस अधिकाऱ्याला दम
मुंबई : प्रतिनिधी : विधीमंडळाच्या परिसरात गुरुवारी सायंकाळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थक कार्यकर्त्यामध्ये राडा झाला. त्यानंतर मध्यरात्री आणखीन एक ड्रामा झाला. राड्यातील संशयित नितिश देशमुख याला पोलिस घेऊन जात असताना आमदार आव्हाड यांनी अटकाव करताना पोलिसांच्या वाहनांसमोर आडवे झाले. अखेर पोलिसांना बळाचा वापर करुन आव्हाडांना फरफडत बाजूला केले. यावेळी विधीमंडळाच्या आवारात प्रचंड गोंधळ उडाला. आमदार रोहित पवारही यावेळी उपस्थित होते. (Jitendra Awhad)
सायंकाळच्या राड्यानंतर पोलिसांनी आव्हाड यांचा कार्यकर्ता नितिन देशमुख आणि पाडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले याला विधान भवन परिसरात असलेल्या पोलिसांच्या खोलीत नेले. त्यानंतर पोलिसांनी दोनही कार्यकर्त्यांचे जबाब नोंदवून घेतले. तसेच घटनास्थळावरील उपस्थित कर्मचाऱ्यांची साक्ष घेण्यात आली. विधानसभा अध्यक्षांनी पोलिसांकडे वस्तुस्थिती मांडणार अहवाल मागितला. रात्री नऊ वाजता विधानसभा अध्यक्षांकडे पोलिसांनी अहवाल दिला. अहवालात दोन्ही बाजूकडून दिलगिरी व्यकत करण्यात आल्याची माहिती पुढे आली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना दोघांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. (Jitendra Awhad)
मध्यरात्री साडेबारा वाजता नितिन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना घेऊन वाहनाने जात असताना आमदार आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांचे वाहन रोखले. वाहनांसमोर आव्हाडाला ठिय्या मांडला. यावेळी घटनास्थळी आमदार रोहित पवारही पोचले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. पण जितेंद्र आव्हान पोलिसांच्या वाहनासमोर आडवे झाले. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करुन आव्हाडांना फरफडत वाहनांच्या समोरुन उचलून बाजूला नेले. नितिन देशमुख यांना मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात घेऊन गेले. देशमुख आणि ऋषिकेश टकलेवर गुनहा दाखल करण्यात आला. (Jitendra Awhad)
Clashes in Vidhan Bhavan lobby : विधानभवनाच्या लॉबीत हाणामारी; आव्हाड, पडळकर समर्थक भिडले
मुंबई : प्रतिनिधी : विधानभवनाच्या लॉबीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत गुरुवारी (१७ जुलै) तुफान हाणामारी झाली. सुरक्षारक्षकांनी धाव घेत राडा थांबवला. या घटनेने विधानभवनात तणाव निर्माण झाला. त्याचे पडसाद विधानसभा आणि विधान परिषदेत उमटले. यावर निवेदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी आणि कडक कारवाई करावी, अशी भूमिका मांडली. (Clashes in Vidhan Bhavan lobby)
आमदार आव्हाड आणि आमदार पडळकर यांच्यातील वाद आता विधानभवनापर्यंत पोहोचला आहे. विधानभवनाच्या लॉबीमध्ये दोघांचेही कार्यकर्ते भिडले. याचे पडसाद विधानसभेतदेखील उमटले. अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरु असताना भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, “काही गुंडांनी आपसात मारामारी केली, मला जे काही समजले त्यात गोपीचंद पडळकर यांना मारण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. विधानभवनात आमदारांवर हल्ला होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी.” अशी मागणी त्यांनी केली.
आमदार रोहित पवार विधानसभेत म्हणाले, “विधानभवनात आमदार हा महत्त्वाचा असतो. पण बाहेरुन आलेल्या कार्यकर्त्यांनी हाणामारी केली. कोणी हाणामारी केली? त्याचा शोध घ्यावा आणि संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी.” अशी मागणी त्यांनी यावेळी केली. याला मंत्री आशिष शेलार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, “गृहराज्य मंत्र्यांनी आमदारांनी मांडलेल्या मुद्द्याची दखल घेतली आहे. या सगळ्या घटना या विधानभवनात झाल्या आहेत. या प्रकरणाची सरकार चौकशी करेलच. पण या प्रांगणामध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. माझी विनंती आहे की, आज ज्यांना पास देण्यात आले त्याचीही चौकशी झाली पाहिजे.” अशी मागणी त्यांनी यावेळी केली. (Clashes in Vidhan Bhavan lobby)
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “घडलेली घटना एकदम चुकीची आहे. अशाप्रकारचे इथे घटना घडने योग्य नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद सभापती राम शिंदे यांच्याअंतर्गत हा परिसर येतो. त्यामुळे अध्यक्ष आणि सभापतींनी याची गंभीर दखल घ्यावी. यासंदर्भात कडक कारवाई अध्यक्षांनी करावी, अशी मी विनंती केली आहे. एकतर मोठ्या प्रमाणात लोक जमा होतात आणि मारामारी करतात, हे विधानसभेला शोभत नाही. त्यामुळे निश्चित कारवाई झाली पाहिजे.
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं, “जर तुम्ही विधानभवनात गुंडांना प्रवेश देणार असाल तर आणि ते हल्ले करणार असतील तर आमचे जीव सुरक्षित नाहीत. मी स्वत: ट्विट केले आहे. मला आया बहिणींवरून शिवीगाळ करण्यात आली. हे सगळे मलाच मारण्यासाठी आले होते. विधिमंडळाच्या आवारात आमदार सुरक्षित नसतील तर कशाला आमदार राहायचे? आमचा काय गुन्हा आहे? कुणीतरी मवाल्यासारखा येतो आणि आमच्या आय बहिणीवरून शिव्या देतो. असंसदीय शब्द वापरले जातात. त्याला संसदीय शब्द म्हणून जाहीर करा. सत्तेचा एवढा माज आणि मुजोरपणा?” असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला आहे. (Clashes in Vidhan Bhavan lobby)
विधान परिषदेतही पडसाद
अनिल परब म्हणाले की, सभागृहात कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा सुरू आहे. पण विधीमंडळाच्या आवारात मारामारी झाली आहे. गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सभागृहाच्या खालील लॉबीत आता मारामारी सुरू आहे. हे सर्व काय चाललं आहे? मला माहित नव्हतं मारामारी होणार आहे, नाहीतर मी लिखित दिलं असतं. मारामारी पण पूर्वसूचना न देता करतात. जर सूचना दिली असती तर सभागृहात सांगितलं तरी असतं, असे म्हणत अनिल परब यांनी खिल्ली उडवली.
सभापती राम शिंदे म्हणाले, अशा काही गोष्टींसाठी भविष्यात नवीन आयुध निर्माण करण्याची गरज आहे. यावर अनिल परब म्हणाले की, पॉईंट ऑफ इन्फामॅशनच्या माध्यमातून सरकारला मारामारीवर निवेदन करायला सांगावं. सभागृहामध्ये कायदा व्यवस्थेची चर्चा सुरू आहे आणि खाली आमदार मारामारी करत आहेत. अनिल परब यांच्या मागणीवर राम शिंदे यांनी शासनाच्या वतीने मंत्र्यांना माहिती देण्यास सांगितले. यावर मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती घेऊन सभागृहात उपस्थित करतो, असे उत्तर दिले. (Clashes in Vidhan Bhavan lobby)
दोन दिवस धुमसतोय वाद
जितेंद्र आव्हाड यांनी विधीमंडळ परिसरात गोपीचंद पडळकर यांना पाहून ‘मंगळसूत्र चोराचा…’ अशी घोषणाबाजी काही दिवसापूर्वी केली होती. त्यामुळे पडळकर संतापले होते. बुधवारी विधानभवनाच्या गेटवर दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला आहे. जितेंद्र आव्हाड हे विधिमंडळ गेटवरून पायी जात होते. त्यावेळी पडळकर यांची कार थेट आव्हाड यांच्या दिशेने आली. यावेळी कारचा दरवाजा आपल्याला लागला म्हणत आव्हाड यांनी पडळकरांना जाब विचारला आणि दोन्ही नेत्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. ‘मी एकटाच आहे. कधीही ये… तुझ्यासारखी अशी कुत्री घेऊन मी फिरत नाही,’ असे पडळकर म्हणाले. त्यावर आव्हाड यांनीही तशाच शब्दांत प्रत्युत्तर दिले. ‘मी आयुष्यभर मुंबईत राहिलो. धमकी कुणाला देतो.’ या घटनेनंतर आव्हाड आणि पडळकर यांचे समर्थक गुरुवारी विधानसभेच्या आवारात आले होते. त्यातून दोन्ही गटांमध्ये राडा झाला. (Clashes in Vidhan Bhavan lobby)
सखोल अहवाला मागविला : अध्यक्ष नार्वेकर
ही घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण व गंभीर असून याबाबत आपण सुरक्षा विभागाकडून सखोल अहवाल मागितला आहे. तो आल्यानंतर आपण योग्य ती कारवाई करू, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
तातडीने कारवाई करावी : उद्धव ठाकरे
विधानभवनात हाणामारी करणारे समर्थक आहेत की गुंड आहेत, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. ही परिस्थिती राज्यात आली असेल तर विधानभवनाला अर्थ काय? ज्यानं पास दिले असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. हा अधिकार अध्यक्षांचा असतो, त्यांची दिशाभूल केली गेली का असा सवाल आहे. अशी गुंडगिरी विधानभवनापर्यंत पोहोचली असेल तर अवघड आहे. गृहमंत्र्यांनी या गुंडांवर आणि गुंडांच्या पोशिंद्यांवर कारवाई केली पाहिजे, तरच तुम्ही राज्याचे तरच पालक, मुख्यमंत्री म्हणण्यास पात्र आहात असे ते म्हणाले.
जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
विधानभवनाच्या लॉबीत जो प्रकार घडला त्याबाबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत घडलेल्या घटनेबाबत तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील भेट घेत तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे.
पडळकर यांच्याकडून दिलगिरी
विधानसभेच्या प्रांगणात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, याचं अतीव दु:ख विधानसभेचा सदस्य म्हणून मला आहे. विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती हा आवार त्यांच्या कक्षेत असल्यानं दिलगिरी व्यक्त करतो. याविषयी आमच्या नेतेमंडळींशी चर्चा करुन तुमच्या सगळ्यांशी बोलतो, असे पडळकर यांनी सांगितले.