मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न तज्ञ समितीची बैठक मंत्रालयात झाली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. सीमा भागातील नागरिकांच्या समस्या थेट मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत स्वतंत्र बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दर तीन महिन्यांनी तज्ज्ञ समितीची बैठका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. (MP Mane)
या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, सह-अध्यक्ष धनंजय महाडिक, सदस्य दिनेश ओउळकर, अॅड महेश बिर्जे, अॅड. शिवाजीराव जाधव, अॅड. संतोष काकडे तसेच अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा उपस्थित होत्या. (MP Mane)
बैठकीत सीमा प्रश्नासंदर्भातील महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा झाली. बैठकीदरम्यान विशेषतः सीमा भागातील मुलांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नांवर तसेच उच्च तंत्र शिक्षण महाविद्यालयांना मिळणाऱ्या अनुदानाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. तज्ञ समितीने घेतलेले निर्णय आता उच्चाधिकार समिती म्हणजेच हाय पावर कमिटीसमोर मांडण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले. याशिवाय तज्ञ समितीची बैठक दर तीन महिन्यांनी नियमित घेण्याचेही ठरले. सीमा भागातील नागरिकांच्या समस्या थेट मांडण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे या समस्या सोडवण्यासाठी विनंती करण्यात येईल, असेही बैठकीत ठरले. (MP Mane)