Home » Blog » BSF’s alert:  दहशतवादी पुन्हा सक्रीय

BSF’s alert:  दहशतवादी पुन्हा सक्रीय

by प्रतिनिधी
0 comments
BSF’s alert

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवादी व्याप्त काश्मीरमधील त्यांच्या लॉन्चपॅड आणि छावण्यांमध्ये परतत असल्याची माहिती मिळाल्याचा दावा सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) मंगळवारी केला. (BSF’s alert)

पत्रकार परिषदेत, बीएसएफचे महानिरीक्षक शशांक आनंद म्हणाले की, नियंत्रण रेषा (एलओसी) आणि जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरीचे प्रयत्न होण्याची शक्यता गुप्तचर माहितीवरून आहे. त्यामुळे सुरक्षा दलांनी सतर्क राहावे.

गुप्तचरांनी दहशतवाद्यांच्या हालचाली अलीकडेच पाहिल्या आहेत. आमच्या काश्मीर आणि जम्मू भागातील नियंत्रण रेषा आणि जम्मू क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून आम्हाला सातत्याने गुप्तचर माहिती पुरवत आहेत, असे ते म्हणाले. (BSF’s alert)

‘‘दहशतवादी कधी घुसखोरीचा प्रयत्न करू शकतात याबद्दल आम्हाला कोणतीही विशिष्ट माहिती मिळालेली नाही, परंतु आम्हाला सतत माहिती मिळत आहे की दहशतवादी संघटना तसे प्रयत्न करत आहेत. ते त्यांच्या छावण्यांमध्ये परतत आहेत, प्रशिक्षण घेत आहेत आणि जिथे त्यांना दक्षतेचा अभाव जाणवेल तिथे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतील. नियंत्रण रेषा असो किंवा आंतरराष्ट्रीय सीमा, आपल्या सुरक्षा दलांनी सर्व भागात सतर्क राहण्याची गरज आहे,’’ असे ते पुढे म्हणाले.

दरम्यान, सशस्त्र दलांनी केलेल्या अचूक हल्ल्यांमध्ये पीओके आणि पाकिस्तानमध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यांनंतर सशस्त्र दलांनी पाकिस्तानचे ड्रोन हल्ल्यांचे प्रयत्नही हाणून पाडले आहेत.

सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या चार दहशतवाद्यांनाही ठार मारले. याव्यतिरिक्त, दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. (BSF’s alert)

दरम्यान, बीएसएफने सांबा सेक्टरमधील एका चौकीचे नाव ‘सिंदूर’ आणि १० मे रोजी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या जवानांचे नाव दोन चौक्यांना देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ‘‘१० मे रोजी सकाळी पाकिस्तानने आमच्या चौक्यांना लक्ष्य करण्यासाठी कमी उंचीचे ड्रोन पाठवले. अशाच एका घटनेदरम्यान एक दुःखद घटना घडली. बीएसएफचे उपनिरीक्षक मोहम्मद इम्तियाज, कॉन्स्टेबल दीपक कुमार आणि भारतीय लष्कराचे नाईक सुनील कुमार ड्रोन परतवत असताना  त्याने एक पेलोड टाकला, त्यामुळे तिघेही मृत्युमुखी पडले. आम्ही आमच्या दोन चौक्यांना आम्ही गमावलेल्या जवानांचे नाव देण्याचा आणि सांबा सेक्टरमधील एका चौकीला ‘सिंदूर’ असे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे, ’’ असे आनंद म्हणाले.

हेही वाचा :
सावरकरांसंदर्भातील याचिका फेटाळली
एकाच कुटुंबातील सात जणांचे कारमध्ये मृतदेह

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00