नवी दिल्ली : जगदीप धनखड यांनी सोमवारी (२१ जुलै) रात्री उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या पत्रात त्यांनी आरोग्यविषयक कारण सांगितले आहे. आरोग्याची समस्या असल्याने वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्याची गरज असल्याचे त्यात त्यांनी म्हटले आहे.(Dhanakad resigns)
राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, आरोग्यविषयक समस्या लक्षात घेऊन “आरोग्यसेवेला प्राधान्य” देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “आरोग्यसेवेला प्राधान्य देण्यासाठी आणि वैद्यकीय सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी संविधानाच्या कलम ६७(अ) नुसार तत्काळ प्रभावाने भारताच्या उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा देत आहे. (Dhanakad resigns)
धनखड यांनी राष्ट्रपतींच्या “अटल पाठिंब्याबद्दल” कृतज्ञता व्यक्त केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. आपल्या कार्यकाळात पंतप्रधानांचा अमूल्य पाठिंबा मिळाला, असे त्यांनी म्हटले आहे.(Dhanakad resigns)
धनखड यांचे राजीनामा पत्र
सर्व माननीय संसद सदस्यांकडून मला मिळालेली मायेची उब, विश्वास आणि प्रेम नेहमीच माझ्या स्मृतीत राहील आणि माझ्या आठवणीत राहील, असे त्यांनी आपल्या कारकीर्दीविषयी म्हटले आहे. आपल्या कार्यकाळात भारताची उल्लेखनीय आर्थिक प्रगती आणि अभूतपूर्व विकास पाहणे हा एक संस्मरणीय अनुभव होता. पदभार सोडताना, त्यांनी देशाच्या भविष्यावर “अटल विश्वास” व्यक्त केला आणि भारताच्या जागतिक उदयाला “अभूतपूर्व” म्हटले आहे.
Tag: