‘होय होय वारकरी, पाहे, पाहे रे पंढरी’. आळंदी आणि देहू येथून निघालेल्या वारकऱ्यांचा दिंडीचा अंतिम प्रवास सुरू झाला आहे. वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागली आहे. राज्यभरातून सर्व संताच्या आणि गावागावातील दिंड्या पंढरीच्या सीमेवर आल्या आहेत. पंढरपूरजवळ वाखरी गावात संत ज्ञानेश्वरांची पालखी पोचली. वाखरी येथे आज संत ज्ञानेश्वरांच्या पालखी रिंगण सोहळा भक्तीभावाने उत्साहात पार पडला. हा रिंगण सोहळ्यात शेकडो वारकरी शिस्तबद्धपणे सहभागी झाले होते. तर हजारो वारकऱ्यांनी हा सोहळा डोळ्यात साठवत पंढरीकडे वाटचाल सुरू केली आहे. हा सोहळा वारकऱ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा क्षण असतो. (सर्व छायाचित्रे : दीपक कुंभार) (Vakhari)
