मुंबई : ‘‘दिशा सालियन प्रकरणात शेवटी सत्य समोर आलेले आहे. आता सर्वांत आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला हवी. त्यानंतर नारायण राणे यांचा मंत्री असलेल्या मुलाने नाक घासून माफी मागायला पाहिजे. ज्यांनी बदनामी केली त्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागितली पाहिजे,” अशी मागणी असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (३ जुलै) केली. (Raut attacks Rane)
दिशा सालियनची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यांतून सिद्ध झालेले नाही, असा दावा मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून केला. (Raut attacks Rane)
या प्रकरणावर संजय राऊत म्हणाले, “पोलीस तर आमचे नाहीत, एसआयटी आमची नाही. आपणच ती स्थापन केली होती. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे युवा नेते आहेत. त्यांचे नेतृत्व खच्ची करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले, त्यांना बदनाम करण्यात आले. आता सत्य समोर आले आहे. आणि फडणवीस आणि नारायण राणे यांचा मंत्री असलेल्या मुलाने नाक घासून माफी मागायला पाहिजे.”
राणेंना कुणी गांभीर्याने घेत नाही
शिवसेना-मनसेच्या मेळाव्यावर टीका करणाऱ्या नारायण राणे यांचाही राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. ज्या व्यक्तीने दोन-तीन वेळा पक्ष बदललेला आहे. जी व्यक्ती स्वत:चा पक्ष चालवू शकली नाही. अशा व्यक्तीला महाराष्ट्र फार गांभीर्याने घेत नाही, असे ते म्हणाले. राणे यांनी भाजपात जाऊन कोकणातील मराठी माणसाचे नुकसान केले आहे. नारायण राणे तुमच्यासारखे सगळे गुलाम नसतात, असेही राऊत यांनी ठणकावले. (Raut attacks Rane)
उद्धव आणि राज एकाच मंचावर येणार
वरळी डोम येथे होणारा मेळावा यशस्वी होणारच, असा निर्धारही राऊत यांनी यावेळी बोलून दाखवला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एकाच मंचावर येणार असल्याने महाराष्ट्राला आकर्षण आहे. ते महाराष्ट्राला एक संदेश देतील. हा आनंदाचा क्षण आहे. राज्याच्या आयुष्यात नवीन पाडवा आणि दसरा उगवणार असेल तर लोकांची भूमिका असेल तर जास्तीत जास्त लोकांनी, सर्व पक्षातील मराठी नेत्यांनी उपस्थित रहावे असे खुले आवाहन केलेले आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सहीची निमंत्रण पत्रिका सर्वत्र गेलेली आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. हा कार्यक्रम झाल्यानंतर महाराष्ट्राच्या हितासाठी काय पावले टाकायची ते पाहू, असेही राऊत म्हणाले.
जाधवच काय, कुणाचाच अहवाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही
हिंदी सक्तीच्या निर्णयाला कडाडून विरोध झाल्यानंतर फडणवीस-शिंदे सरकारने अध्यादेश रद्द केला. तसेच शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा समावेश करण्याबाबतचे धोरण ठरविण्यासाठी अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यावर बोलताना नरेंद्र जाधवच नाही तर भैयाजी जोशी, दत्तात्रय होसबळे आले तरी समितीचा अहवाल स्वीकारणार नाही, असे राऊत यांनी ठणकावले. नरेंद्र जाधवांचा संघ परिवाराशी संबंध आहे. त्यांना देशाचे उपराष्ट्रपती व्हायचे होते आणि संघ त्यांच्यासाठी प्रयत्नही करत होता. अशा व्यक्तीला महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी नेमले जाते तेव्हा लोकांच्या मनात संशय येणारच, असे राऊत म्हणाले.
हेही वाचा :
बेदरकारपणे वाहन चालवताना मृत्यू आल्यास विमा भरपाई नाही : सर्वोच्च न्यायालय
कुरिअर बॉयकडून युवतीच्या तोंडावर स्प्रे मारुन अत्याचार