नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैन्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (४ ऑगस्ट) स्थगिती दिली.(SC SLAMS RAHUL GANDHI)
त्याचवेळी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एजी मसीह यांच्या खंडपीठाने राहुल गांधी यांना त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्ल फटकारले. “तुम्ही विरोधी पक्षनेते आहात; तुम्ही सोशल मीडियावर नव्हे तर संसदेत बोला,.” असे सुनावले.
“२००० चौरस किमी जमीन चिनी लोकांनी व्यापली आहे हे तुम्हाला कसे कळते? सच्चा भारतीयाच्या तोंडी असे वक्तव्य शोभत नाही,” असेही खंडपीठाने म्हटले आहे.(SC SLAMS RAHUL GANDHI)
खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकार आणि या प्रकरणातील तक्रारदाराला नोटीसही बजावली.
२२ डिसेंबर रोजी झालेल्या भारत-चीन संघर्षाबद्दल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भारतीय सैन्याची बदनामी झाली आणि त्यांचे मनोबल खच्ची झाले, असा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. अरुणाचल प्रदेशात चिनी सैन्य भारतीय सैनिकांना “पिळून टाकत” आहे आणि मीडिया त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
हेही वाचा :
मोदी, शहांनी घेतली राष्ट्रपतींची भेट
…तर संसदेत गायी सोडू : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
Tag: