नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने बिहारमधील अंतिम मतदार यादी प्रकाशित केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकाशित केलेल्या या यादीमध्ये पाटण्यात १.६३ लाख मतदारांची भर पडल्याचे स्पष्ट झाले आहे. (Bihar’s final electoral roll)
मंगळवारी (३० सप्टेंबर) निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केल्याची घोषणा केली. विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) अंतर्गत प्रकाशित झालेल्या मसुदा यादीवरील सर्व दावे आणि आक्षेप विचारात घेऊन ही यादी प्रकाशित करण्यात आली आहे. (Bihar’s final electoral roll)
बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर निवडणूक आयोगाला टॅग करून ही घोषणा केली.
“विशेष सखोल पुनारवलोकनच्या पार्श्वभूमीवर, अंतिम मतदार यादी ३० सप्टेंबर २०२५ रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. voters.eci.gov.in या लिंकवर जाऊन नागरिकांना नावे शोधता येतील, ” असे या सोशल मीडिया पोस्टमध्ये आयोगाने म्हटले आहे.
“अनुपस्थित”, “स्थलांतरित” किंवा “मृत” म्हणून घोषित केलेली सुमारे ६५ लाख नावे वगळण्यात आल्यानंतर, प्रारूप यादीतील मतदारांची संख्या ७.२४ कोटी होती. (Bihar’s final electoral roll)
तथापि, पाटणा जिल्हा प्रशासनाने एक निवेदन जारी करून घोषित केले की त्यांच्या अधिकारक्षेत्रातील १४ विधानसभा मतदारसंघांमधील एकूण मतदारांची संख्या सुमारे ४८.१५ लाख होती, जी १ ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत “१.६३ लाखांनी वाढली” होती.
जिल्ह्यात एकूण महिला मतदारांची संख्या २२.७५ लाख होती आणि दिघा मतदारसंघात सर्वाधिक ४.५६ लाख मतदार होते.
बिहार विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे आणि निवडणूक आयोग योग्य वेळी देशभरात राबवण्याचा मानस असलेल्या विशाल एसआयआर मोहिमेमुळे वाद निर्माण झाला होता.
एसआयआरचा उद्देश सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मतदान करण्याची शक्यता कमी असलेल्या मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने वगळण्याचा डाव असल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या काही विरोधी पक्षांनी केला होता.
तथापि, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजप नेत्यांनी असा दावा केला आहे की एसआयआर हा “घुसखोरांना” बाहेर काढण्यासाठी आवश्यक आहे ज्यांना इंडिया आघाडी संरक्षण देऊ इच्छित होती.