Home » Blog » Nadda hailed Modi : मोदींची कारकीर्द सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी : नड्डा

Nadda hailed Modi : मोदींची कारकीर्द सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी : नड्डा

by प्रतिनिधी
0 comments
Nadda hailed Modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार देशाला सुशासन देत आहे. त्यांची अकरा वर्षाची कारकीर्द सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखी आहे, अशा शब्दांत भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोमवारी (९ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांच्या कारकिर्दीचे कौतुक केले. (Nadda hailed Modi)

नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी देशाची राजकीय संस्कृती बदलली आणि जबाबदार सरकार देऊन उत्कृष्ट कामगिरी आणि सुशासनाचे राजकारण सुरू केले.  काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए राजवटीने केवळ ‘‘भ्रष्टाचार, घोटाळे आणि तुष्टीकरणा’’ चे राजकारण केले.

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या ११ वर्षात केलेले काम असाधारण होते आणि ते सुवर्णाक्षरांनी लिहिले पाहिजे, असे जे. पी. नड्डा म्हणाले.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूर आणि २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरील अलिकडच्या विधानांवर टीका केली. त्यांनी निराधार प्रश्न विचारून ‘बेजबाबदार’ विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावल्याचा आरोपही नड्डा यांनी यावेळी केला.(Nadda hailed Modi)

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रीया विचारली असता, ‘देव त्यांना सद्बुद्धी देवो,’ एवढेच नड्डा म्हणाले.

२०२४ च्या निवडणुकीत पक्षाने स्वतःहून बहुमत गमावल्यानंतर भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या स्थिरतेवर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केल्याबद्दल विचारले असता, मोदी सरकार केवळ या कार्यकाळातच नाही तर पुढच्या कार्यकाळातही आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा टोमणा नड्डा यांनी मारला.

ते म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी एक जबाबदार आणि मजबूत सरकार दिले आहे आणि त्यांनी त्यांच्या सरकारने अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यामध्ये कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाक रद्द करणे, वक्फ दुरुस्ती, नोटाबंदी, महिला आरक्षण विधेयक यांचा उल्लेख नड्डा यांनी केला.(Nadda hailed Modi)

“२०१४ पूर्वी देशातील सरकार भ्रष्टाचाराने भरलेले होते आणि देशभर नकारात्मकतेची भावना होती. परंतु २०१४ नंतर, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ती भावना बदलली. आता लोक अभिमानाने म्हणतात, ‘मोदी है तो मुमकीन है’, असे नड्डा पुढे म्हणाले. पंतप्रधान मोदींनी ९ जून २०२४ रोजी तिसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. मोदी सरकारने सोमवारी तिसऱ्या कार्यकाळातील पहिला वर्धापन दिन आणि एकूण सत्ताकाळाचा ११ वा वर्धापन दिन साजरा केला.

हेही वाचा :
रेल्वेतून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू
ठाणे अपघातानंतर रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00