मुंबई : विशेष प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वादग्रस्त नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक असलेल्या पोपट व राजेंद्र धनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत केली जाण्याची शक्यता आहे.(Land enquiry)
धनवट व पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील अन्य भूमाफीयांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे, असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (८ एप्रिल) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना दिली. (Land enquiry)
राजगुरुनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची कोट्यवधीची भूमाफीयांकडून फसवणूक झाल्याची तक्रार दमानिया यांनी पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केली होती. त्यानंतर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी चर्चेनुसार या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता एसआयटी नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोपट मारुती घनवट व इतरांकडून फसवणूक झाल्याबाबत चेतन राजेंद्र चिखले यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह संबंधित शेतकरी यावेळी उपस्थित होते. तर, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि संबंधित अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. (Land enquiry)
बावनकुळे म्हणाले, या प्रकरणी जिल्हाधिकारी पुणे यांनी घनवट यांच्या नावे असलेल्या जमिनींची चौकशी केली आहे. तथापि त्यांच्या जमिनी जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्षेत्राबाहेर असण्याची सुद्धा दिसून येत आहे. त्यामुळे जमाबंदी आयुक्तांच्या माध्यमातून घनवट यांची राज्यात किती ठिकाणी जमीन आहे. त्यात निवासी, कृषी, औद्योगिक आदी किती प्रकारच्या जमिनी आहेत, तसेच यासाठी आर्थिक व्यवहार कसा झाला याबाबतही चौकशी होणे आवश्यक आहे. या चौकशीची व्याप्ती कशी असावी, याबाबत विभागाने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देऊन बावनकुळे यांनी या प्रकरणी एसआयटी नेमण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगितले. पुणे जिल्हाधिकारी डुडी यांनी याप्रकरणी आतापर्यंत केलेल्या चौकशीनुसार घनवट यांच्या नावे असलेल्या जमिनीबाबतची उपलब्ध झालेली माहिती यावेळी सादर केली.
हेही वाचा :
तामिळनाडूच्या राज्यपालांची कृती ‘बेकायदा’ आणि चुकीची
पाच वर्षांत राज्याचा संतुलित विकास दिसेल