कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘समाज आणि माध्यमं’ या वैचारिक लेखसंग्रहाला वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा सन २०२६ चा मारोतराव नारायणे राज्यस्तरीय उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रमोद नारायणे यांनी ही घोषणा केली आहे. (Dr. Jatratkar’s Book Receives Narayane Smriti Award)
डॉ. जत्राटकर यांच्या ‘ब्लॅक व्हाईट अन् ग्रे’ या पुस्तकाला नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेच्या वतीने उत्कृष्ट ललित संग्रहासाठीचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर आता ‘समाज आणि माध्यमं’ या पुस्तकाला महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रात नवनव्या उपक्रमांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचा उत्कृष्ट वैचारिक साहित्यासाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रुपये ६,००० रोख रक्कम, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. (Dr. Jatratkar’s Book Receives Narayane Smriti Award)
मारोतराव नारायणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी २५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता वर्धा येथील स्थानिक सार्वजनिक बजाज वाचनालयाच्या सभागृहात सुप्रसिद्ध साहित्यिक व ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ करण्यात येईल, असे मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, सचिव हेमलता नारायणे, प्रतिष्ठानचे कार्यकारिणी सदस्य प्रभावती नारायणे, अजय भस्मे, धीरज नारायणे, राहूल भस्मे, जिगिषा नारायणे यांनी कळविले आहे. (Dr. Jatratkar’s Book Receives Narayane Smriti Award)