Home » Blog » IAS OFFICERS REMOVED : मोदींच्या सभेवेळी तांत्रिक बिघाड; आयएएस अधिकाऱ्याला हटवले

IAS OFFICERS REMOVED : मोदींच्या सभेवेळी तांत्रिक बिघाड; आयएएस अधिकाऱ्याला हटवले

by प्रतिनिधी
0 comments
IAS OFFICERS REMOVED

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजस्थानमधील बांसवाडा येथील जाहीर सभेवेळी झालेल्या तांत्रिक बिघाडाला जबाबदार धरत वरिष्ठ आयएएस अधिकारी अर्चना सिंग यांना राज्याच्या माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण विभागाच्या (आयटी अँड सी) सचिवपदावरून काढून टाकण्यात आले आहे. द इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे. (IAS OFFICERS REMOVED)

२५ सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम होता. त्याच दिवशी जारी केलेल्या आदेशात, २५ सप्टेंबर रोजी बांसवाडा येथील नापला गावात पंतप्रधानांच्या जाहीर सभेत तांत्रिक व्यवस्था करण्यासाठी प्रामुख्याने जबाबदार असलेल्या आयटी अँड सी विभागाने आपल्या निर्णयासाठी “प्रशासकीय कारणे” दिली. तथापि,  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूर आणि दिल्लीतील उच्च अधिकारी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाड झाल्याने नाराज होते. (IAS OFFICERS REMOVED)

तथापि, या प्रकरणाशी परिचित अधिकाऱ्यांनी सांगितले की गुरुवारी बांसवाडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेदरम्यान झालेल्या मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे सिंग यांची हकालपट्टी करण्यात आली. पंतप्रधान मोदी नापला गावातील सरकारी कार्यक्रमावेळी व्यासपीठावर पोहोचले. तेव्हा ऑडिओ सिस्टम कार्यरत होती, परंतु व्हिडिओ स्क्रीन जवळजवळ १० मिनिटे रिकामी राहिली. त्यामुळे प्रेक्षकांना लाईव्ह फीड पाहता आला नाही.

तत्पूर्वीही वारंवार ऑडिओ-व्हिज्युअल व्यत्ययांमुळे पंतप्रधानांच्या शेतकऱ्यांशी प्रस्तावित संवादावरही परिणाम झाला, असे या घटनेची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे तांत्रिक कामकाज आयटी अँड सी विभागाच्या अखत्यारीत होते. त्याचे नेतृत्व सिंग करत होत्या.

हेही वाचा :

लडाखमधील अपयशापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न : काँग्रेसचा आरोप

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00