नवी दिल्ली : दहशतवाद्यांचे कंबरडे मोडून काढा, पहेलगाममध्ये झालेल्या हल्ल्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे, त्याची पद्धत काय असेल, वेळ आणि लक्ष्य काय असेल ते ठरविण्याचे सर्व स्वातंत्र्य तुम्हाला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२९ एप्रिल) सुरक्षा दलांना आश्वस्त केले. (Crush terrorism)
दहशतवादावर जोरदार प्रहार करण्याचा आमचा राष्ट्रीय संकल्प आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईला आमचे सर्वोच्च राष्ट्रीय प्राधान्य आहे, याचा पुनरूच्चार पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केला.
मोदी यांनी यावेळी भारतीय सशस्त्र दलांच्या व्यावसायिक क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. तसेच दहशतवादाविरोधात कारवाया करताना सुरक्षा दलांना सरकारचा पूर्ण पाठिंबा असेल, असेही स्पष्ट केले. (Crush terrorism)
पहेलगाम येथे अलीकडे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मजबूत संदेश देशाला दिला. दहशतवादाचा पूर्ण ताकदीनिशी मुकाबला करण्याच्या देशाच्या संकल्पाला त्यामुळे मजबूत बळ मिळाले आहे. (Crush terrorism)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सशस्त्र दल प्रमुखांची बैठक मंगळवारी संध्याकाळी झाली. त्यावेळी ते बोलत होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सीडीएस जनरल उपेंद्र द्विवेदी यावेळी उपस्थित होते.
या बैठकीला प्रमुख निमलष्करी दलांचे प्रमुख आणि इतर सुरक्षा संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उपस्थितांमध्ये सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक दलजीत सिंग चौधरी, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एनएसजी) महासंचालक भृगु श्रीनिवासन आणि आसाम रायफल्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा यांचा समावेश होता. सशस्त्र सीमा दलाच्या (एसएसबी) अतिरिक्त महासंचालक अनुपमा नीलेकर चंद्रा यांनीही चर्चेत भाग घेतला.
बैठकीची विशिष्ट माहिती त्वरित जाहीर करण्यात आली नसली तरी, जम्मू आणि काश्मीरमध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
उपस्थित असलेल्या प्रत्येक दलाची भारताच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका आहे: बीएसएफला पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमा सुरक्षित करण्याचे काम सोपवण्यात आले आहे; एसएसबी नेपाळ आणि बांगलादेशच्या सीमांचे रक्षण करते; आसाम रायफल्स म्यानमारच्या सीमेवर देखरेख करते; आणि एनएसजी हे भारताचे दहशतवादविरोधी आणि ओलिस-बचाव दल आहे.
दरम्यान, दुपारी गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन; सीमा सुरक्षा दल, आसाम रायफल्स आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांचे महासंचालक; आणि केंद्रीय राखीव पोलिस दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.
हेही वाचा :
संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांसाठी ५० लाख