कोल्हापूर : प्रतिनिधी : कसबा बावडा आणि शिवसेनेचे अतूट नाते असून, कसबा बावडा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथली जनता नेहमीच माझ्या बाजूने उभी राहिली असून त्याची मला जाण आहे. त्यामुळेच कसबा बावड्याच्या विकासास नेहमीच प्राधान्य दिले आहे. कोट्यावधी रुपयांच्यावर निधी वितरीत केला आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची जाण कसबा बावडावासियांना असून, विधानसभा निवडणुकीत दबावशाहीला झिडकारून बावडावासियांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाठबळ दिले. त्यामुळे कसबा बावड्याच्या विकासाकरिता सदैव कटिबद्ध असल्याचे सांगत आमदार राजेश क्षीरसागर कसबा बावडावासियांसमोर नतमस्तक झाले. (Shirsagar)
कसबा बावडा येथील श्री कॉलनी परिसरातील विकास कामे मार्गी लावल्याबद्दल परिसरातील नागरिकांच्यावतीने आमदार राजेश क्षीरसागर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार क्षीरसागर म्हणाले, कसबा बावड्यातील नागरिकांना मुलभूत सोई सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच प्राधान्याने काम केले आहे. परंतु, काही वेळा कसबा बावडा वासीय आणि माझ्या नात्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न झाला. पण, सुज्ञ जनतेने विरोधकांची खेळी ओळखून मला या भागातून पाठबळ दिले. निवडणुका होतात जातात पण निर्माण झालेले कौटुंबिक नात टिकले पाहिजे हाच उद्देश ठेवून आगामी काळात कसबा बावड्यातील उर्वरित विकासकामांना निधी उपलब्ध करून दिला जाईल. राजाराम बंधाऱ्याच्या पर्यायी पुलाकरिता निधी, राजाराम बंधारा ते कसबा बावडा रोड करिता निधी, तिरंगा लाईट लावणे, हनुमान तलावाचे सुशोभिकरण, यासह बावड्यातील प्रमुख मार्ग आणि अंतर्गत कॉलनी, गल्ल्यामधील रस्त्याची कामे, पाणद्यांचा विकास या कामांना निधी उपलब्ध करुन दिला आहे. (Shirsagar)
आमदार क्षीरसागर म्हणाले, झूम प्रकल्पामुळे होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. यासह शुगरमिल चौकातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा, राजाराम बंधाऱ्याचा नवीन पर्यायी पुलाचे बांधकाम, हॉकी स्टेडियम सुधारणा, पाणंद रस्ते, श्री हनुमान मंदिर विकास यासाठी लवकरच निधी मंजूर करून हे प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील. कसबा बावडा नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याबद्दलही आमदार राजेश क्षीरसागर यांनी जनतेचे आभार व्यक्त केले. (Shirsagar)
यावेळी शिवसेना शहर समन्वयक सुनील जाधव, तोरणागड कार्यालय प्रमुख कृष्णा लोंढे,आदर्श जाधव,उपशहर प्रमुख जय लाड,विभाग प्रमुख रणजित शिंदे,एकनाथ खोत,किशोर घाटगे, अण्णासाहेब पिंगळे, ॲड. संजय घाटगे, काका सुनगार, धीरज पाटील, दादा कांबळे, मोहन शिंदे, विश्वनाथ आंबी, अभी मोगणी यांच्यासह भागातील मान्यवर, नागरिक, शिवसैनिक उपस्थित होते. (Shirsagar)