कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणातील आरोपी प्रशांत कोरटकरवर वकिलानेच हल्ला केला. ‘ये पश्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतोस काय?,’ असा संताप व्यक्त करत ॲड. अमितकुमार भाेसले (रा. रुकडी, ता. हातकणंगले) यांनी धावून जात हल्ला केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत भोसले यांच्यावर झडप घातली. कोरटकरची सुटका केली. भर कोर्टाच्या आवारात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.(Attack on Koratkar)
सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. कोरटकरविरोधात कोल्हापुरात संतापाची लाट कायम आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वीही त्याला कोल्हापुरी चप्पलने मारण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणात काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिले होते. संतापाचे वातावरण कायम आहे. त्यामुळे शुक्रवारी (२८ मार्च) सकाळी लवकर कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आले. (Attack on Koratkar)
कोरटकरची पोलिस कोठडी संपत असल्याने त्याला कोर्टात हजर करायचे होते. त्यामुळे सकाळी आठलाच पोलिस त्याला घेऊन आले होते. कोर्टात त्याला उभे केल्यानंतर त्याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसाची वाढ करण्यात आली. त्यानंतर पोलिस त्याला परत पोलिस ठाण्याकडे घेऊन जात होते. कँटीनच्या पॅसेजमधून घेऊन जात असताना ॲड. भोसले यांनी कोरटकरला उद्देशून ‘तू शिवरायांचा अपमान करतोस काय,’ असे म्हणत त्याच्या अंगावर धावून गेले. त्याच्यावर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी भोसले यांच्यावर झडप घातली आणि त्यांना बाजूला नेले. त्यांना ताब्यात घेतले.(Attack on Koratkar)
पोलिसांची दक्षता
तीन दिवसांपूर्वी कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळीही कोर्टाच्या आवारात त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणातील काहीजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. हल्ल्याचा प्रयत्न आजही होईल, म्हणून पोलिसांनी दक्षता घेतली होती. पोलिसांनी कोरटकरला कोर्टाच्या आवारात आणण्याआधीच जयदीप शेळके यांना ताब्यात घेतले. शेळके यांनी परवा कोरटकरला पायताणाने मारण्याचा प्रयत्न केला होता.
हेही वाचा :
न्यायालयाकडून इम्रान प्रतापगढी विरोधातील एफआयआर रद्द
म्यानमार, थायलंडला शक्तीशाली भूकंपाचे धक्के
छत्रपती शिवाजी महाराज
Raigad Waghya Dog: औरंगजेबाच्या कबरीनंतर रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी मागणी कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. औरंगजेबाच्या कबरीनंतर महाराष्ट्रात नवा ऐतिहासिक वाद सुरू होण्याची चिन्हे त्यामुळे दिसू लागली आहेत. (Raigad Waghya Dog)
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी एक फेसबुक पोस्ट करून वाघ्या कुत्र्याची रायगडावरील समाधी हटवण्याची मागणी केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की :
संभाजीराजे छत्रपती यांची पोस्ट
हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली आहे. सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही. भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना व वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व यांबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती व पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे. (Raigad Waghya Dog)
समस्त भारतवासीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोलकल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युगप्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.
कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघ्या कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडवरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दि. ३१ मे २०२५ अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावरून व दुर्गराज रायगड वरून कायमस्वरूपी हटविण्यात यावे, याकरिता मुख्यमंत्री महोदयांकडे पत्र लिहून मागणी केली… (Raigad Waghya Dog)
भारतीय पुरातत्व विभागाच्या धोरणानुसार १०० वर्षांहून अधिक पुरातन असलेली संरचना संरक्षित स्मारक म्हणून गणली जाते. त्यामुळे वाघ्या कुत्रा समाधी संरचनेस १०० वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विहित कालमर्यादेत ही संरचना हटविणे अत्यावश्यक आहे.
संभाजी ब्रिगेडची कारवाई
वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने गेल्या काही वर्षापासून लावून धरली होती. वारंवार मागणी करुनही शासनाकडून या शिल्पासंदर्भात कसलाच निर्णय न होत नव्हता. त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी १ ऑगस्ट २०१२ रोजी ही समाधी हटवली. काही सामाजिक संघटनांनी या कुत्र्याला आपल्या अस्मितेचे प्रतिक मानले. संभाजी ब्रिगेडच्या विरोधात भूमिका घेतली. त्या सामाजिक दबावाला बळी पडूत शासनाने तात्काळ ते शिल्प पुनर्स्थापित केले. (Raigad Waghya Dog)
मुळ प्रश्न आहे तो वाघ्या शिवचरित्रात असण्याचा. समकालीन संदर्भ साधनात कसलाही त्याचा कसलाही उल्लेख नाही. हे शिल्प केवळ दंतकथेवर आधारित आहे. शिवकाळानंतर ज्यांनी ज्यांनी रायगडचा अभ्यास केला त्यांच्याही साहित्यात या कुत्र्याचा उल्लेख मिळत नाही. उदाहरणादाखल : १८६९ साली “महात्मा जोतिराव फ़ुले” स्वत: रायगडावर गेले, शिवरायांची दुर्लक्षीत झालेली समाधी शोधून काढली आणि शिवरायांवर प्रदीर्घ पोवाडा लिहिला. पण यात कुठेच वाघ्याचा उल्लेख नाही. १८८१-८२ मध्ये “जेम्स डग्लज ” हा इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला. या अधिका-यानेही त्याच्या “बुक ऑफ़ बॉम्बे” या पुस्तकात रायगडचे आणि शिव समाधीचे नकाशासहीत तपशीलवार वर्णन केले आहे. त्यांनीही वाघ्याचा कुठेही उल्लेख केला नाही.
दंतकथेतील या कुत्र्याचा सर्वप्रथम संदर्भ आला तो १९०५ साली “चिं. ग.गोगटे” यांच्या “महाराष्ट्र देशातील किल्ले” या पुस्तकात. या कुत्र्याचे ’वाघ्या’ असे नामकरण केले नाटककार ’राम गणेश गडकरी’ यांनी. त्यांच्या “राजसंन्यास” या नाटकाच्या माध्यमातून. गडकरींनी त्यांचे हे नाटक वाघ्याला अर्पण केलेले आहे. वाघ्याच्या चबुत-यावर “राजसंन्यास” या नाटकातील काही ओळी कोरल्या आहेत. विशेष म्हणजे गडकरींचे हे नाटक शिवराय आणि शंभूराजे यांच्या बदनामीने ओतप्रत भरलेले आहे. गडकरींच्या राजसंन्यास नाटकाचे लेखन २३ जून १९१६ ते ७ जानेवारी १९१७ या काळात घडले आहे. (Raigad Waghya Dog)
वाघ्या कुत्रा ऐतिहासिक असल्याचा दावा
प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांच्या मते वाघ्या कुत्रा हे ऐतिहासिक वास्तव आहे. त्यासाठी ते एक पुरावा देतात. ज्यावेळी संभाजी ब्रिगेडने वाघ्याचा पुतळा हटवला होता, तेव्हा त्याच्या पुनर्स्थापनेसाठी सोनवणी यांनी उपोषण केले होते. सोनवणी यांचे म्हणणे आहे की वाघ्याचा पुरावा जर्मनांनी जपलेला आहे. त्यासाठी ते एका सूचीचा संदर्भ देतात. त्या पुस्तकाचे नांव…”Negotiations: authors and subjects of books I-X (1834-1852) ” प्रकाशित झाल्याचे वर्ष…१९३०. हे पुस्तक म्हणजे १८३४ ते १८५२ या काळात प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची १२६ पानी सूची असुन त्यात लेखक व पुस्तकांच्या विषयांबाबत माहिती आहे. याच पुस्तकात जे लिहिले आहे की-
“शिवाजी नैसर्गिक मृत्युने रायगड येथे १६८० साली मरण पावला. त्याच्या दहनस्थळी स्मारक बांधण्यात आले. त्याबाजुलाच एक पाषाणस्तंभ असुन त्यावर दगडात ताशीवपणे बनवलेला कुत्रा (शिवस्मारकाकडे) पहात आहे. हाच वाघ्या…शिवाजीचा लाडका कुत्रा, ज्याने जळत्या चितेत उडी घेतली होती…”
या ग्रंथात फक्त १८३४ ते १८५२ या काळात प्रसिद्ध झालेल्या ऐतिहासिक पुस्तकांची नोंद आहे, म्हणजेच वाघ्याबाबतचा मजकुर याच काळात लिहिल्या गेलेल्या कोणत्यातरी पुस्तकातुन या सूचीत घेण्यात आला आहे हे उघड आहे. या सूचीचे पुनर्मुद्रण १९३० सालचे आहे. तेही जर्मनीत झालेले. वाघ्याचा नवा पुतळा पुन्हा बसवण्यात आला तो १९३६ साली.
शिवाजी महाराजांचा अपमान करण्यासाठी हा पुतळा ब्राह्मणांनी १९३६ साली बसवला असा आरोप आहे. पण मग १८३४ ते १८५२ साली अधेमधे प्रसिद्ध झालेल्या, त्याही जर्मन ग्रंथात, वाघ्या कसा आला? असा संजय सोनवणी यांचा प्रश्न आहे
याचा अर्थ एवढाच आहे कि संभाजीराजांनी शिवस्मारक बांधल्यानंतर लगेच वाघ्याचेही स्मारक बनवले होते. येथे वाघ्याच्या दगडी ताशीव पुतळ्याचा उल्लेख आहे. याचाच अर्थ असा कि मुळ पुतळा दगडीच होता. कालौघात तो नष्ट झाला…वा केला गेला. आताचा पुतळा तर पंचधातुचा आहे. १९३० साली मुळात तो अस्तित्वातच नव्हता. म्हणजेच ज्या लेखकाने वाघ्याच्या स्मारकाची माहिती दिली आहे ती मूळच्या पुतळ्याची व स्मारकाची आहे. म्हणजेच वाघ्याचे स्मारक शिवस्मारक जेंव्हा मुळात बनवले गेले तेंव्हापासूनचेच आहे. कोणा महाराणीच्या जागेवर आताचे स्मारक नाही. वाघ्या ही दंतकथा नाही. कुत्र्याचे नांव “वाघ्या” आहे असे जर्मनांनीही नोंदवलेले आहे. तसा भारताशी जर्मनांचा कसलाही राजकीय किंवा सांस्कृतिक हितसंबंध नव्हता. मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांमध्ये वाघ्याचा उल्लेख मिळत नाही म्हणून वाघ्या अस्तित्वातच नव्हता असे म्हणणे अज्ञानमूलक आहे, असे सोनवणी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. (Raigad Waghya Dog)
वादग्रस्त विषय
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचे वास्तव हा एक वादग्रस्त आणि चर्चेचा विषय आहे. वाघ्या हा कथितरित्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळीव कुत्रा होता, ज्याने महाराजांच्या मृत्यूनंतर (१६८०) त्यांच्या चितेत उडी मारून स्वतःचे जीवन संपवले, अशी दंतकथा प्रचलित आहे. या कथेनुसार, वाघ्याची समाधी रायगडावर शिवाजी महाराजांच्या समाधीशेजारी बांधण्यात आली. परंतु, या कथेच्या सत्यतेबाबत इतिहासकारांमध्ये आणि संशोधकांमध्ये मतभेद आहेत.
ऐतिहासिक पुराव्यांचा अभाव
शिवकालीन समकालीन कागदपत्रांमध्ये किंवा विश्वसनीय ऐतिहासिक स्रोतांमध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याचा किंवा त्याच्या चितेत उडी मारण्याच्या घटनेचा कोणताही उल्लेख सापडत नाही. रायगडावरील वाघ्याचा पुतळा आणि समाधी १९३६ मध्ये शिवाजी स्मारक समितीने उभारली, जी शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल २५६ वर्षांनी घडली. ही समाधी ऐतिहासिक घटनेवर आधारित नसून, लोककथा आणि नाटकातून प्रेरित असल्याचे मानले जाते. या समितीमध्ये कोण पदाधिकारी होते, याचेही संदर्भ सापडत नाहीत.
वाद आणि आधुनिक दृष्टिकोन
समर्थन: काही लोकांचे मत आहे की वाघ्या ही कथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणीप्रेमाचे आणि स्वामिनिष्ठेचे प्रतीक आहे. धनगर समाजात कुत्र्याला विशेष स्थान असल्याने ही कथा त्यांच्याशी जोडली जाते. (Raigad Waghya Dog)
विरोध: इतिहास संशोधक आणि शिवप्रेमी, उदाहरणार्थ संभाजी ब्रिगेड आणि संभाजीराजे छत्रपती , यांचा असा युक्तिवाद आहे की वाघ्याची समाधी अनैतिहासिक असून ती शिवचरित्राला कलंकित करते. २०१२ मध्ये संभाजी ब्रिगेडने हा पुतळा हटवला होता, परंतु प्रशासनाने तो पुन्हा स्थापित केला. २०२५ मध्ये संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही समाधी ३१ मे २०२५ पर्यंत हटवण्याची मागणी केली आहे, कारण तिला ऐतिहासिक आधार नाही.
निष्कर्ष
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचे वास्तव हे ऐतिहासिक घटनांवर आधारित नसून, लोककथा, साहित्य आणि २०व्या शतकातील निर्मितीवर अवलंबून आहे. ती एक भावनिक आणि सांस्कृतिक प्रतीक म्हणून काहींसाठी महत्त्वाची असली, तरी तिचा शिवचरित्राशी थेट संबंध असल्याचा पुरावा नाही. सध्या या समाधीच्या सत्यतेवरून वाद सुरू असून, ती हटवावी की ठेवावी हे शासनाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
संभाजीराजे छत्रपती यांच्या मागणीनंतर हा विषय कसे वळण घेतो, हे पाहावे लागणार आहे.
हेही वाचा :
कोरटकरच्या मुसक्या आवळल्या
बुलडोझर कारवाईवर यूपी सरकारला कोर्टाने फटकारले
नवी दिल्ली : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते,’ अशी मुक्ताफळे भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी भर संसदेत उधळली. एका संताच्या भेटीचा संदर्भ देत पुरोहित यांनी हे वक्तव्य केले. त्यावर विरोधकांसह नेटिझन्सकडूनही टीकेची झोड उठवण्यात आली आहे. संसदेत काहीही बरळणाऱ्या या खासदाराने तत्काळ माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Pradeep Purohit)
पुरोहित हे भाजपचे बारगडचे खासदार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लोकसभेत भाषण करताना त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर जोरदार टीका होत आहे. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होत नाही का, असा सवालही विरोधी पक्षांसह नेटिझन्सनी केला आहे. (Pradeep Purohit)
पुरोहित यांनी लोकसभेत बोलताना सांगितले की, माझी एका संताशी भेट झाली. या संताने सांगितले होते की पंतप्रधान मोदी हे त्यांच्या मागील जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते. या दाव्याचे स्पष्टीकरण देताना या खासदाराने असे म्हटले की पंतप्रधान मोदी हे खरोखरच शिवाजी महाराज आहेत. त्यांनी महाराष्ट्र आणि देशाला प्रगती आणि विकासाकडे नेण्यासाठी पुनर्जन्म घेतला आहे.
तथापि, या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाने पुरोहित यांना चांगलेच धारेवर धरले. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या उज्ज्वल वारशाचा आणि त्यांच्या महानतेचा हा अवमान असल्याची टीका होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली असून, अशी तुलना शिवरायांसारख्या आदरणीय ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचा अवमान करणारी असल्याचे म्हटले आहे. या वक्तव्यावर खासदार पुरोहित यांनी माफी मागावी, अशी मागणीही होत आहेत. (Pradeep Purohit)
शिवाजी महाराजांचा घोर अवमान : वर्षा गायकवाड
या लोकांनी याआधी नरेंद्र मोदींच्या मस्तकावर मानाचा जिरेटोप चढवला होता. आता या खासदाराने हे घृणास्पद वक्तव्य केले आहे. शिवाजी महाराजांचा हा घेर अपमान आहे.
शिवसेना (ठाकरे) नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘भाजपच्या या निर्लज्ज चापलूसांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना होऊच शकत नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे.(Pradeep Purohit)
पंतप्रधान नरेंद्र मोदींची देशातील महान नेत्यांशी आणि योद्ध्यांशी तुलना करण्याचा प्रयत्न या आधीही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुरोहित यांनी केलेली तुलना म्हणजे निव्वळ चापलुसगिरी असल्याची टीका एका नेटिझन्सने केली आहे. (Pradeep Purohit)
असे लोक कुठून पैदा होतात? संजय राऊतांचा हल्लाबोल
संजय राऊत म्हणाले, हे महाशय संसदेत संसदेत बोलत आहेत. नरेंद्र मोदी हे गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते, असे हे म्हणत आहेत. यांची भाजपा खऱ्या शिवाजी महाराजांना मानत नाही. त्यांचे शिवाजी केवळ नरेंद्र मोदी आहेत. असे लोक कुठून पैदा होतात? असा हल्लोबोल करत भाजपने शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा :
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही
सरकार, फडणवीस पुरस्कृत दंगल
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी कबर तोडावी
Protests against CM : मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शनावेळी कोल्हापुरात बळाचा वापर
कोल्हापूर : प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याच्यावेळी निदर्शने करणाऱ्या शिवप्रेमींना पोलिसांनी बळाचा वापर करुन ताब्यात घेतले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना दिल्याप्रकरणी कोरटकर आणि केशव वैद्य यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी शिवप्रेमींकडून निदर्शने करण्यात आली. (Protests against CM)
प्रशांत कोरटकर आणि केशव वैद्य यांच्याविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना अडवून जाब विचारणार असा इशारा शिवप्रेमींनी दिला होता. मुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी (६ मार्च) कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या हस्ते पन्हाळा येथे लाईट, साऊंड शोचे उद्घाटन झाले. तत्पूर्वी ते नागाळा पार्क येथील एका हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी येणार होते.
नागाळा पार्क येथील खानविलकर बंगला येथे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नेतेमंडळींनी केले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी (५ मार्च) रात्रीपासून पोलिसांनी प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवल्या होत्या. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून प्रमुख कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, माजी महापौर आर. के. पोवार, प्रविण पाटील, हर्षल सुर्वे, प्रविण पाटील, अर्बन बँकेचे संचालक संभाजी जगदाळे, शुभम शिरहट्टी, रवी जाधव, कॉ. चंद्रकांत यादव यांच्यासह ५० जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले. (Protests against CM)
गुरुवारी सायंकाळी खानविलकर बंगल्याजवळ शिवप्रेमी जमू लागले. त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय होती. राज्य सरकारच्या विरोधात शिवप्रेमींनी घोषणा दिल्या. प्रशांत कोरटकरच्या निषेधार्थ घोषणा देऊन कोरटकरला अटक करा, अशा घोषणा देण्यात आल्या. पण पोलिसांनी मुख्यमंत्री फडणवीस नागाळा पार्कात येण्यापूर्वी आंदोलकांना बळाचा वापर करुन ताब्यात घेतले. आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर काहीकाळ परिसरात तणाव होता. पण मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरळीत झाला. (Protests against CM)
हेही वाचा :
Agitation against Koratkar: कोरटकरांना अटक करा, अन्यथा मुख्यमंत्र्यांना रोखणार
कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकरना अटक करा, अशी जोरदार मागणी गुरुवारी (२७ फेब्रुवारी) करण्यात आली. या मागणीसाठी कोल्हापुरातील शिवप्रेमींनी शिवाजी चौकात निदर्शने केली. खासदार शाहू छत्रपती यांची आंदोलनात प्रमुख उपस्थिती होती. कोरटकरना पाच मार्चपर्यंत अटक करा अन्यथा सहा मार्च रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडवून जाब विचारु, असा इशाराही शिवप्रेमींनी यावेळी दिला.(Agitation against Koratkar)
इतिहास संशोधक सावंत यांनी त्यांना ज्या मोबाईलवर धमकी आली होती तो पोलीस ठाण्यात जमा केला आहे. कोरटकरना अटक करण्यासाठी कोल्हापूरचे पथक नागपूरमध्ये त्याचा शोध घेत आहे. कोरटकरवर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप शिवप्रेमींकडून होत आहे. (Agitation against Koratkar)
कोरटकरने सावंत यांना धमकी दिल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. कोरटकरनी छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल शिवप्रेमींत संतापाची लाट उसळली. गुरुवारी शिवाजी चौकात खासदार शाहू छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. खासदार शाहू छत्रपती यांनी या कृत्याचा निषेध केला. प्रशांत कोरटकरना अटक करुन त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
कोरटकरना पोलीस संरक्षण असताना ते नागपूरमधून कसे गायब होतात, असा प्रश्न शिवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात अडवून जाब विचारला जाईल, असा इशाराही दिला आहे. निदर्शनात विजय देवणे, व्ही. बी. पाटील, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, विक्रम जरग, दत्ता टिपुगडे, तौफिक मुल्लाणी, सतीश कांबळे, दुर्वास कदम, रियाज जमादार, हर्षल सुर्वे यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Agitation against Koratkar)
इंद्रजीत सावंत यांनी पोलिस ठाण्यात जमा केला मोबाईल
इंद्रजीत सावंत यांनी त्यांना ज्या मोबाईलवर धमकी आली होती तो मोबाईल जुना राजवाडा पोलीस ठाण्यात जमा केला. कोरटकरनी सावंत यांना ज्या भाषेत धमकी दिली त्याबाबतचा जबाबही पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी घेतला. सावंत यांच्यासह विजय देवणे, हर्षल सुर्वे यांनी तपासाची माहिती घेतली. कोरटकरना अटक करा अन्यथा तो पुरावे नष्ट करण्याचा आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी मागणी हर्षल सुर्वे यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. (Agitation against Koratkar)
कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपुरात
पोलीस उपनिरीक्षक संतोष दळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक नागपूर येथे पोचले आहे. त्यांनी प्रशांत कोरटकरांचा शोध घेतला. त्यांचे शेवटचे लोकेशन दीक्षाभूमीजवळ मिळाले होते, पण त्यानंतर मोबाईल स्वीच ऑफ झाला आहे. कोरटकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरांचे नातेवाईक आणि मित्रांकडे त्यांची माहिती घेतली. कोरटकर मध्यप्रदेशात पळून गेले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :
सिंधुदुर्गावर उभारलेला पुतळा, त्याच्या प्रतिष्ठापनेची वर्षपूर्ती आणि…
महाराष्ट्र दिनमान : प्रतिनिधी : भारतीय नौसेना दिनी भारतीय आरमाराचे जनक, शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा ४३ फुटी उंच पुतळा सिंधुदुर्गात उभारण्यात आला होता. त्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर २०२३ रोजी झाले होते. या पुतळ्याच्या प्रतिष्ठापना आणि अनावरण सोहळ्याला बुधवारी (दि.४) एक वर्ष पूर्ण झाले. (Shivaji Maharaj Statue)
पुतळ्याच्या वर्षपूर्तीनिमित्त भव्य सोहळा पार पडला असता, पण पुतळा उभारणीला वर्ष होण्याआधीच अवघ्या आठ महिन्यांत, २७ ऑगस्ट रोजी हा भव्य पुतळा कोसळला. शिल्पकार जयदीप आपटेला अटक झाली. पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर माफी मागितली. पण ज्याला अनुभव नव्हता अशा शिल्पकार जयदीप आपटेला पुतळा उभारणीचे काम कुणी दिले, पुतळा उभारणीचे काम महाराष्ट्र शासनाने केले की नौदलाने केले, हे प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहेत.
सिंधुदुर्ग-देवगड येथे पुतळा का उभारला?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वर्षे आहे. भारतीय नौसेनेचे जनक म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते. चार डिसेंबर रोजी देशभर नौसेना दिन साजरा केला जातो. नौसेना दलाने या कार्यक्रमासाठी विविध जलदुर्गांची पाहणी केली. त्यातून सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसराची निवड केली. पंतप्रधान मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे भारतीय आरमार उभारणीतील योगदान लक्षात घेऊन हा दिवस सिंधुदुर्ग येथे नौदल दिन आयोजित करण्याचे आदेश दिले होते. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा निर्णय नौदलाने घेतला. त्याला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली.
पुतळा उभारणीचे काम आपटेला
नौदलाने शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याचे काम जयदीप आपटेच्या कंपनीला दिले होते. या पुतळ्याची देखरेख आणि निगा राखण्याची जबाबदारी नौदलाची होती. यासाठी नौदलाने मेसर्स आर्टिस्ट्री कंपनीला कंत्राट दिले होते. जयदीप आपटे हा कंपनीचा प्रोप्रायटर तर डॉ. चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट आहे. शिल्पकाराची निवड, त्याचे डिझाईन ही सर्व प्रक्रिया नौदलाकडून करण्यात आली. मोठे पुतळे तयार करण्याचा अनुभव नसतानाही आपटेला नौदलाने काम कसे दिले असा प्रश्न शिल्पकारांकडून उपस्थित केला होता.
मुख्यमंत्र्यांचे जातीने लक्ष
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असल्याने गतवर्षी नोव्हेंबरमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष घातले होते. त्यासाठी अनेक बैठका घेतल्या होत्या. तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, कॅप्टन सुधीर सावंत यांच्यासह व्हॉईस ॲडमिरल डी. के. त्रिपाठी, रिअर ॲडमिरल ए. एन. प्रमोद, रिअर ॲडमिरल मनीष चढ्ढा, कमोडोर एस. के. रॉय, संदीप सरना, गोकुल दत्ता, आशिष शर्मा, विक्रम बोरा, कॅप्टन चैतन्य या अधिकाऱ्यांनी नौदल सोहळ्याचे नियोजन केले होते. महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगच्या सोयीसाठी सिंधुदुर्गातील मालवण येथे २.०३ कोटी रुपये खर्चून तात्पुरती तीन हेलिपॅड बांधली होती.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण
पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर २०२३ रोजी दुपारी सव्वा चारच्या सुमारास झाले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते. जगातील चौथ्या क्रमांकावर असलेल्या नौदलाने प्रात्यक्षिके सादर केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे , राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदी आदी उपस्थित होते.
वीस युद्धनौकांचा सहभाग
यावेळी नौदलाने शक्तिप्रदर्शनही केले होते. त्यात मिग २९ के ४० विमानांसह वीस युद्धनौकांनी सहभाग घेतला होता. भारतीय नौदलाच्या मरिन कमांडोव्दारे भर समुद्र तसेच किनाऱ्यावरील शोध आणि बचाव कार्य तसेच शत्रूवर प्राणघातक हल्ल्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सोहळ्याला कोकणासह राज्यभरातील नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती. लेझर शो ने कार्यक्रमाचा समारोप झाला होता. (Shivaji Maharaj Statue)
पुतळ्याबाबत इतिहास संशोधकाकडून शंका उपस्थित
पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर शिवप्रेमींनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर भेट दिली होती. पुतळ्याची उभारणी आणि रचना पाहिल्यावर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून पुतळा साकारताना कोणत्या उणीवा राहिल्या आहेत याची सविस्तर माहिती दिली होती. पण त्याकडे महाराष्ट्र सरकार आणि नौदलाने दुर्लक्ष केले होते.
आठ महिन्यांत पुतळा कोसळला
२६ ऑगस्ट रोजी दुपारी मुसळधार पाऊस सुरू असताना हा ४५ फूट उंचीचा भव्य पुतळा पायातून तुटून कोसळला. स्थानिकांना पुतळा पडल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रशासनाला माहिती दिली. स्थानिक शिवप्रेमींनी पुतळा उभारलेल्या राजकोट परिसरात धाव घेतली. तहसीलदार वर्षा झालटे यांनी झालेल्या घटनेची माहिती नौदलाला कळवली. या घटनेने महाराष्ट्रासह देश विदेशात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. शिवप्रेमींनी सोशल मिडियावर जाहीरपणे केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले. वादळी वाऱ्यामुळे पुतळा कोसळला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यावर त्यांच्यावर विरोधी पक्षांतील नेत्यांनी टीकेचा भडीमार केला. राज्यभर सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांची माफी (Shivaji Maharaj Statue)
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. ‘शिवाजी महाराज आपले दैवत आहे, आपली अस्मिता आहे. यावर राजकारण करू नये. विरोधक माफीची मागणी करत आहेत, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांवर एकदा नाही, शंभरवेळा डोके ठेवायला मी तयार आहे. मला त्यात कमीपणा वाटणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य आहेत,’ असे शिंदे त्यावेळी म्हणाले होते.
पंतप्रधान मोदी यांनी मागितली माफी
पुतळा कोसळल्यानंतर तीन दिवसांत म्हणजे ३० ऑगस्ट २०२४ रोजी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या पायाभरणी कार्यक्रम पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी‘”छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी केवळ एक महापुरुषच नाहीत तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आराध्य दैवताच्या चरणी नतमस्तक होत आता त्यांची माफी मागत आहे,’ या शब्दांत माफी मागितली.
जयदीप आपटे फरार
छत्रपती शिवरायाचा पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे या घटनेनंतर फरार होता. पोलिसांनी त्याच्या कल्याणमधील घरात शोध घेतला पण तो मिळाला नाही. पोलिसांनी बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याला कोल्हापुरातून अटक केली. शिल्पकार जयदीप आपटेला राज्य सरकार वाचवत असल्याचा आरोप झाल्यानंतर त्याला कल्याणमधील घरातून अटक झाली.
आपटेचा शिल्पकलेतील अनुभव किती? (Shivaji Maharaj Statue)
पुतळा कोसळल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे कोण, याचा शोध पोलिस घेत होते. २५ वर्षी जयदीप आपटे याची जयदीप आपटे मेसर्स आर्टिस्ट्री नामक कंपनी होती. तो कल्याणमध्ये रहात होता. त्याच्या शाळेजवळ सदाशिव साठे यांचा शिल्प घडवण्याचा स्टुडिओ होता. इयत्ता आठवीला असतानाच या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय आपटेने घेतला होता. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून मूर्तिकला विषयात त्याने डिप्लोमा पूर्ण केला. सिंधुदुर्ग येथील शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यापूर्वी भव्य पुतळा उभारण्याचा अनुभव आपटेकडे नव्हता. त्याने दीड ते अडीच फुटी मूर्ती किंवा पुतळे तयार केले होते. तरीही शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याचे काम आपटेला दिले. पुतळा अनावरणानंतर जयदीप आपटे याने एका दैनिकाला मुलाखत दिली होती. ब्राँझचा भव्य पुतळा बनवायला तीन वर्षांचा काळ लागतो. पण त्याने पुतळा उभारण्याचे काम जून २०२३ मध्ये सुरू केले आणि अवघ्या सात महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२३ पर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण केले. कमी वेळेत पुतळा पूर्ण करण्यासाठी त्याने थ्री डायमेन्शनल प्रिंटिंगचा आधार घेऊन करण्याचा निर्णय घेतला. पण काही गणिते चुकली आणि ठरलेल्या वेळेत काम होणार नाही, हे आपटेच्या लक्षात आले. तेव्हा अचानक पूर्ण मॉडेल थ्री डायमेन्शनल प्रिंट करायचे ठरवले. थ्री डायमेन्शनल प्रिंटिंग व्यवसायातील त्याच्या मित्रांनी एका रात्रीत १८ नवीन प्रिंटर उभे केले आणि प्रिंटिंगचे काम सुरू झाले. कास्टिंग झालेले तुकडे एकत्र करुन पूर्ण पुतळा स्टुडिओमध्ये तयार केला जातो. पण कमी वेळ आणि पुतळा नेण्यासाठी कोकणातील लहान रस्ते असल्याने त्याने जागेवरच पुतळा जोडण्याचा निर्णय घेतला. पाऊस, वारा, लोडशेडिंग अशा अडचणीना तोंड देऊन त्याने पुतळा तयार केला. शिवाजी महाराजांच्या विचारांनी उर्जा मिळाल्यानेच पुतळ्याचे काम पूर्ण केले, असे त्याने मुलाखतीत म्हटले होते.
हेही वाचा :